शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तिरूपतीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिराचा विकास नको

By admin | Updated: June 14, 2016 00:47 IST

मूर्तिशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या : आदिशक्तीचे स्थान म्हणून हवे प्राधान्य

कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरूपतीच्या देवस्थानाशी जोडत त्याच धर्तीवर मंदिराचा विकास करण्याचे नियोजन अत्यंत चुकीचे आहे. ही देवी साडेतीन शक्तिपीठांतील एक देवता असून, तिचे मूळ स्वरूप आदिशक्तीचे आहे. उलट तिच्या आशीर्वादामुळे तिरूपती-बालाजी या क्षेत्राची निर्मिती झाली. त्यामुळे अन्य देवस्थानांच्या प्रथा, परंपरा सुरू करण्याचा आणि त्याचप्रमाणे विकासाचा अट्टाहास करण्यापेक्षा स्वतंत्रपणे विकास केला पाहिजे. मंदिराचा आराखडा हा केवळ आर्किटेक्चरच्या पद्धतीने बनविण्यात आलेला आहे; पण आर्किटेक्ट म्हणजे मंदिर अभ्यासक नव्हे किंवा मंदिरशास्त्राचा जाणकार नव्हे; त्यामुळे मंदिरासंबंधी कोणताही निर्णय घेताना आधी मंदिररचना आणि मूर्तिशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिराची जागा अनावश्यक गोष्टींनी व्यापून अडचणी निर्माण करायच्या आणि जागा नाही म्हणून ओरड करायची, अशी अवस्था आहे; कारण मंदिराच्या अंतर्गत भागात आणि बाह्ण परिसरात सुधारणांच्या नावाखाली अनेक अनावश्यक बाबी करण्यात आल्या आहेत. ज्यात रथाची जागा, केबिन्स, गरुड मंडपाला ग्रिल, पत्र्याची केबिन्स, फॅब्रिकेशन्स अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. हे सगळे काढून टाकले तर मंदिर प्रशस्त होईल. महाद्वाराबाहेर असलेली सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत व महाद्वारसह नगारखान्याचे जतन संवर्धन केले गेले पाहिजे; कारण या परिसराचे बांधकाम गेल्या काही दिवसांत ढासळत आहे. त्याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. ज्यांनी मंदिराची रचना केली त्यांनी त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेतली आहे. त्यामुळे मूळ मंदिरासह महाद्वार, घाटी दरवाजा हाही दुमजली आहे. येथूनही मंदिराची सुरक्षा करता येते. - उमाकांत राणिंगामंदिर व मूर्तिशास्त्र अभ्यासकमनकर्णिका कुंड खुले करण्यात यावे...मनकर्णिका कुंड खुले करण्यात यावे. स्वच्छतागृहासाठी दक्षिण दरवाजाबाहेरील व विद्यापीठ हायस्कूलच्या मधील जागा योग्य आहे. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यालाही बाधा येणार नाही. जे.पी. नाईक यांचा आराखडा राबवा जे. पी. नाईक यांनी मंदिराच्या चारीही दरवाजांबाहेर मोठे रस्ते असा आराखडा केला होता, तो आजही महापालिकेकडे आहे. त्यानुसार निर्मिती केली जावी. ओवऱ्या विश्रांतीसाठीच...देवस्थानांच्या ठिकाणी असलेल्या ओवऱ्यांना विशेष महत्त्व असते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला प्रसन्न शांततेची अनुभूती मिळावी, देवीच्या दारात काही काळ विश्रांती घेता यावी यासाठी ओवऱ्यांची बांधणी केली जाते. मात्र अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांत दुकाने थाटल्याने दर्शन घेतलेल्या भाविकाला सरळ बाहेरचा रस्ता धरावा लागतो. यामुळे या ओवऱ्या भाविकांसाठी खुल्या करून दुकानदारांचे अन्यत्र पुनर्वसन करावे.