शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

तिरूपतीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिराचा विकास नको

By admin | Updated: June 14, 2016 00:47 IST

मूर्तिशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या : आदिशक्तीचे स्थान म्हणून हवे प्राधान्य

कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरूपतीच्या देवस्थानाशी जोडत त्याच धर्तीवर मंदिराचा विकास करण्याचे नियोजन अत्यंत चुकीचे आहे. ही देवी साडेतीन शक्तिपीठांतील एक देवता असून, तिचे मूळ स्वरूप आदिशक्तीचे आहे. उलट तिच्या आशीर्वादामुळे तिरूपती-बालाजी या क्षेत्राची निर्मिती झाली. त्यामुळे अन्य देवस्थानांच्या प्रथा, परंपरा सुरू करण्याचा आणि त्याचप्रमाणे विकासाचा अट्टाहास करण्यापेक्षा स्वतंत्रपणे विकास केला पाहिजे. मंदिराचा आराखडा हा केवळ आर्किटेक्चरच्या पद्धतीने बनविण्यात आलेला आहे; पण आर्किटेक्ट म्हणजे मंदिर अभ्यासक नव्हे किंवा मंदिरशास्त्राचा जाणकार नव्हे; त्यामुळे मंदिरासंबंधी कोणताही निर्णय घेताना आधी मंदिररचना आणि मूर्तिशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिराची जागा अनावश्यक गोष्टींनी व्यापून अडचणी निर्माण करायच्या आणि जागा नाही म्हणून ओरड करायची, अशी अवस्था आहे; कारण मंदिराच्या अंतर्गत भागात आणि बाह्ण परिसरात सुधारणांच्या नावाखाली अनेक अनावश्यक बाबी करण्यात आल्या आहेत. ज्यात रथाची जागा, केबिन्स, गरुड मंडपाला ग्रिल, पत्र्याची केबिन्स, फॅब्रिकेशन्स अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. हे सगळे काढून टाकले तर मंदिर प्रशस्त होईल. महाद्वाराबाहेर असलेली सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत व महाद्वारसह नगारखान्याचे जतन संवर्धन केले गेले पाहिजे; कारण या परिसराचे बांधकाम गेल्या काही दिवसांत ढासळत आहे. त्याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. ज्यांनी मंदिराची रचना केली त्यांनी त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेतली आहे. त्यामुळे मूळ मंदिरासह महाद्वार, घाटी दरवाजा हाही दुमजली आहे. येथूनही मंदिराची सुरक्षा करता येते. - उमाकांत राणिंगामंदिर व मूर्तिशास्त्र अभ्यासकमनकर्णिका कुंड खुले करण्यात यावे...मनकर्णिका कुंड खुले करण्यात यावे. स्वच्छतागृहासाठी दक्षिण दरवाजाबाहेरील व विद्यापीठ हायस्कूलच्या मधील जागा योग्य आहे. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यालाही बाधा येणार नाही. जे.पी. नाईक यांचा आराखडा राबवा जे. पी. नाईक यांनी मंदिराच्या चारीही दरवाजांबाहेर मोठे रस्ते असा आराखडा केला होता, तो आजही महापालिकेकडे आहे. त्यानुसार निर्मिती केली जावी. ओवऱ्या विश्रांतीसाठीच...देवस्थानांच्या ठिकाणी असलेल्या ओवऱ्यांना विशेष महत्त्व असते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला प्रसन्न शांततेची अनुभूती मिळावी, देवीच्या दारात काही काळ विश्रांती घेता यावी यासाठी ओवऱ्यांची बांधणी केली जाते. मात्र अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांत दुकाने थाटल्याने दर्शन घेतलेल्या भाविकाला सरळ बाहेरचा रस्ता धरावा लागतो. यामुळे या ओवऱ्या भाविकांसाठी खुल्या करून दुकानदारांचे अन्यत्र पुनर्वसन करावे.