शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भावा, आलाय गवा; करु नको गवगवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 10:53 IST

माणसांचे जंगल परिसरातील वाढते अतिक्रमण पाहता आता आपल्याला या वन्यप्राण्यांसह राहावे लागेल. त्यामुळे गव्याला स्वीकारा. थोडा संयम बाळगा.

संदीप आडनाईक

कोल्हापूर : भुयेवाडीजवळ एक युवक गव्याच्या हल्ल्यात ठार झाला आणि पुन्हा एकदा मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष उफाळून आला आहे. गवेच काय, पण हत्ती, बिबट यासारखे वन्यप्राणी मानवी वस्तीत येणे आता नवीन राहिले नाही. माणसांचे जंगल परिसरातील वाढते अतिक्रमण पाहता आता आपल्याला या वन्यप्राण्यांसह राहावे लागेल. त्यामुळे गव्याला स्वीकारा. थोडा संयम बाळगा.

जंगलात राखीव गवताळ परिसराची गरज

गव्यासारख्या वन्यप्राण्यांविषयी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे नेमके प्रबोधन करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राण्यांमुळे होणारे अपघात, जीवित हानी वाढेल आणि पुन्हा त्यांच्याबरोबरचा संघर्ष पेटू शकतो. वनविभागाने जंगलात बफर झोनमध्येच त्यांना खाद्य उपलब्ध होईल, असे राखीव गवताळ शेतीक्षेत्र तयार केले पाहिजे. नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी ग्रीन फेन्सिंग निर्माण केले पाहिजेत, तरच ते तेेथून शहरात येण्याचे थांबतील.

बघ्यांची गर्दी, पाठलाग, डिवचणे घातक

अतिशय महाकाय पण लाजाळू असणाऱ्या गव्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सध्या शेतातील ऊस, मका आणि पाण्याच्या शोधात शहरापर्यंत यावे लागत आहे, हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे गावातील, शहरातील प्रवेशानंतर त्यांच्या पाठीमागे होणारी बघ्यांची गर्दी, पाठलाग, त्यांना डिवचणे हे सर्व प्रकार घातक आहेत. अशा गर्दीमुळे, पाठलाग केल्यामुळे, सततच्या धावण्यामुळे घाबरल्यामुळे गव्यांच्या स्नायूंमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. जास्त धावल्याने रक्तस्राव वाढून ‘कॅप्चर मायोपॅथी’मुळे ती दगावतात. पुष्कळ वेळा असे तणावग्रस्त प्राणी पशुवैद्यकाच्या मदतीने बेशुद्ध करणे व त्याच्यावर ताबा मिळवणे कठीण बनते. त्यांना योग्य मात्रेत भुलीचे औषध देऊनदेखील ते बेशुद्ध होत नाहीत. पण जास्तीच्या तणावामुळे व ‘कॅप्चर मायोपॅथी’ मरण पावले तर तो दोष पशुवैद्यकाच्या माथी मारला जातो.

म्हणून सुटला त्यांचा मूळ अधिवास

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे मूळ अधिवास असलेला हा प्राणी जिल्ह्यातील आजरा, कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर तालुक्यात सातत्याने दिसतो. म्हशीप्रमाणेच रवंथ करणारा गवा सकाळी, पहाटे किंवा सायंकाळी उशिरा चरायला बाहेर पडतो. त्याला मका, उसाच्या लावणीवरील कोंब, गवत, झाडपाला, कोवळ्या फांद्या विशेषतः कोवळे बांबू खायला आवडतात. विशेषत: त्यांना मीठ, खारट माती, खडक चाटायला आवडते. त्यामुळे रासायनिक खते वापरून खारफुटी वाढलेल्या शेतांमध्येही या गव्याचा वावर वाढलेला आढळत आहे. शिवाय वाघ आणि बिबट्या यांची संख्याही कमी झाल्याने गव्यांची संख्या वाढून ते आपल्या अधिवासाच्या बाहेर येत आहेत.

समंजसपणा गरजेचा

खरंतर कोल्हापुरात आलेला गवा तीन-चार दिवसांपासून जवळच्या शेतात आणि मानवी वस्तीत मुकाटपणे वावरत होता. अगदी शिवाजी पुलावर आजूबाजूला वाहने जात असतानाही त्याने कोणालाही इजा केलेली नव्हती. पण बघ्यांच्या गर्दीमुळे आणि तरुणांच्या उत्साहामुळे तो पळून पळून आक्रमक झाला. यात एकाचा बळी गेला. हा संघर्ष टाळण्यासाठी आता माणसालाच त्याच्याबद्दल समजून घ्यावे लागेल, वन्यजीव वाचवले पाहिजेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर