शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

भावा, आलाय गवा; करु नको गवगवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 10:53 IST

माणसांचे जंगल परिसरातील वाढते अतिक्रमण पाहता आता आपल्याला या वन्यप्राण्यांसह राहावे लागेल. त्यामुळे गव्याला स्वीकारा. थोडा संयम बाळगा.

संदीप आडनाईक

कोल्हापूर : भुयेवाडीजवळ एक युवक गव्याच्या हल्ल्यात ठार झाला आणि पुन्हा एकदा मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष उफाळून आला आहे. गवेच काय, पण हत्ती, बिबट यासारखे वन्यप्राणी मानवी वस्तीत येणे आता नवीन राहिले नाही. माणसांचे जंगल परिसरातील वाढते अतिक्रमण पाहता आता आपल्याला या वन्यप्राण्यांसह राहावे लागेल. त्यामुळे गव्याला स्वीकारा. थोडा संयम बाळगा.

जंगलात राखीव गवताळ परिसराची गरज

गव्यासारख्या वन्यप्राण्यांविषयी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे नेमके प्रबोधन करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राण्यांमुळे होणारे अपघात, जीवित हानी वाढेल आणि पुन्हा त्यांच्याबरोबरचा संघर्ष पेटू शकतो. वनविभागाने जंगलात बफर झोनमध्येच त्यांना खाद्य उपलब्ध होईल, असे राखीव गवताळ शेतीक्षेत्र तयार केले पाहिजे. नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी ग्रीन फेन्सिंग निर्माण केले पाहिजेत, तरच ते तेेथून शहरात येण्याचे थांबतील.

बघ्यांची गर्दी, पाठलाग, डिवचणे घातक

अतिशय महाकाय पण लाजाळू असणाऱ्या गव्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सध्या शेतातील ऊस, मका आणि पाण्याच्या शोधात शहरापर्यंत यावे लागत आहे, हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे गावातील, शहरातील प्रवेशानंतर त्यांच्या पाठीमागे होणारी बघ्यांची गर्दी, पाठलाग, त्यांना डिवचणे हे सर्व प्रकार घातक आहेत. अशा गर्दीमुळे, पाठलाग केल्यामुळे, सततच्या धावण्यामुळे घाबरल्यामुळे गव्यांच्या स्नायूंमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. जास्त धावल्याने रक्तस्राव वाढून ‘कॅप्चर मायोपॅथी’मुळे ती दगावतात. पुष्कळ वेळा असे तणावग्रस्त प्राणी पशुवैद्यकाच्या मदतीने बेशुद्ध करणे व त्याच्यावर ताबा मिळवणे कठीण बनते. त्यांना योग्य मात्रेत भुलीचे औषध देऊनदेखील ते बेशुद्ध होत नाहीत. पण जास्तीच्या तणावामुळे व ‘कॅप्चर मायोपॅथी’ मरण पावले तर तो दोष पशुवैद्यकाच्या माथी मारला जातो.

म्हणून सुटला त्यांचा मूळ अधिवास

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे मूळ अधिवास असलेला हा प्राणी जिल्ह्यातील आजरा, कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर तालुक्यात सातत्याने दिसतो. म्हशीप्रमाणेच रवंथ करणारा गवा सकाळी, पहाटे किंवा सायंकाळी उशिरा चरायला बाहेर पडतो. त्याला मका, उसाच्या लावणीवरील कोंब, गवत, झाडपाला, कोवळ्या फांद्या विशेषतः कोवळे बांबू खायला आवडतात. विशेषत: त्यांना मीठ, खारट माती, खडक चाटायला आवडते. त्यामुळे रासायनिक खते वापरून खारफुटी वाढलेल्या शेतांमध्येही या गव्याचा वावर वाढलेला आढळत आहे. शिवाय वाघ आणि बिबट्या यांची संख्याही कमी झाल्याने गव्यांची संख्या वाढून ते आपल्या अधिवासाच्या बाहेर येत आहेत.

समंजसपणा गरजेचा

खरंतर कोल्हापुरात आलेला गवा तीन-चार दिवसांपासून जवळच्या शेतात आणि मानवी वस्तीत मुकाटपणे वावरत होता. अगदी शिवाजी पुलावर आजूबाजूला वाहने जात असतानाही त्याने कोणालाही इजा केलेली नव्हती. पण बघ्यांच्या गर्दीमुळे आणि तरुणांच्या उत्साहामुळे तो पळून पळून आक्रमक झाला. यात एकाचा बळी गेला. हा संघर्ष टाळण्यासाठी आता माणसालाच त्याच्याबद्दल समजून घ्यावे लागेल, वन्यजीव वाचवले पाहिजेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर