शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

विनातारण कर्जही नाही अन् अनामत रकमेचे पैसेही बुडले, कोल्हापुरातील एका निधी बँकेचा अनेकांना गंडा

By विश्वास पाटील | Updated: July 19, 2024 14:18 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या काही टक्के अनामत रक्कम रोख आमच्या बँकेत भरा, असे आमिष दाखवून नव्यानेच स्थापन झालेल्या एका निधी बँकेने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पैसे भरलेल्या एकाही व्यक्तीला कर्ज मिळालेले नाही आणि अनामत म्हणून घेतलेली रक्कमही परत मिळत नसल्याने कर्ज मागणारे हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार फसवणुकीचा आकडा काही लाखांत आहे.तारण द्यायला काहीच नसते; परंतु विविध कारणांसाठी कर्जाची गरज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नावावर घर नसते, शेतीचा सातबारा एकत्रित असतो. नोकरी खासगी असते, सोनेनाणे नसते मग तारण काय द्यायचे, असा प्रश्न असतो. त्यांना कर्ज हवे असते, त्याचे नियमित हप्ते परत करण्याचीही त्यांची तयारी असते. ही अगतिकता ओळखूनच या बँकेने विनातारण कर्जाचा जाहिरात केली. करवीर तालुक्यातील पश्चिमेकडील एका तरुणाचे लग्न ठरत नव्हते. त्यासाठी घराची डागडुजी त्याला करायची होती. त्यासाठी कर्ज हवे होते म्हणून त्याला कुणीतरी या बँकेचा पत्ता दिला. त्यानुसार तो मित्राला घेऊन बँकेत गेला. बँकेने तीनच नव्हे, तर पाच लाख देतो, असे आश्वासन त्यांना दिले. त्यानुसार त्यांनी १३,५०० रुपये ३ एप्रिल २०२४ ला बँकेत रोख भरले. सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला महिनाभर लागेल असे सांगितले; परंतु आता तीन महिने उलटून गेले तरी अजून कर्जाचा पत्ता नाही. कर्ज कधी मिळणार म्हणून मित्रासह तो हेलपाटे मारून दमला आहे. आता या बँकेचे कार्यालय रंकाळ्याजवळ आले आहे. तिथे अनेक लोक कर्ज तरी द्या किंवा आमची अनामत तरी परत द्या म्हणून गर्दी करीत आहेत. काहींनी ३५ हजार, काहींनी त्याहून जास्त रक्कम भरली आहे. जेवढी कर्ज जास्त तेवढी अनामत जास्त असा त्यांचा नियम आहे. आता तुमचे खाते अपडेट करण्यासाठी २ हजार रुपयांची एनईएफटी करा, असे त्याला सांगितले आहे; परंतु अनामत व नंतर एनईएफटी करूनही सहा-सहा महिने झाले तरी कुणाला कर्ज मिळालेले नाही.

भेटायचे कुणाला..?बँकेत कोणही जबाबदार अधिकारी भेटत नाही. लिपिक काम करणारे दहा ते बारा तरुण असतात. तेही सतत बदलतात. साहेब दिल्लीला गेले होते. त्यामुळे कर्जमंजुरी लांबली असल्याचे कारण बँकेतील लोक देत आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकfraudधोकेबाजी