शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

एकसष्टीत गाजली राजकीय टोलेबाजी

By admin | Updated: June 27, 2016 00:36 IST

परस्परांना काढले चिमटे : कुरघोड्यांमुळे झाले कार्यकर्त्यांचे मनोरंजन

इचलकरंजी : माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम असला तरी आजी-माजी आमदारांच्या राजकीय टोलेबाजीनेच गाजला. आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हसन मुश्रीफ व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी आपल्या भाषणातून गत राजकीय इतिहासाचा पाढा वाचत परस्परांचे चिमटे काढले.श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाच्या सांस्कृतिक मंचावर झालेल्या कुरघोड्यांमुळे शनिवारी राजकीय क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांचे चांगले मनोरंजन झाले. कार्यक्रमात जांभळे यांचे राजकीय क्षेत्रातील सहकारी हिंदुराव शेळके यांनी टोलेबाजीला सुरुवात केली. ते म्हणाले, माझी दीर्घकालीन राजकीय कारकीर्द राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेली असली तरी हाळवणकरांमुळे मी भाजपमध्ये गेलो. त्यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, एकदमच ट्रॅक कसा बदललास. त्यावर मी त्यांना म्हणालो, दादा तुमच्याकडे आलो तर पुन्हा कार्यकर्ताच व्हायला पाहिजे; पण विरोधी पार्टीत जाऊन आता नेता झालो.अशोक स्वामी यांनी, राजकारणात आता मध्येच लटकत असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रवादीतून निलंबित झालोय आणि हाळवणकर काही भाजपत घेत नाहीत.प्रकाश आवाडे म्हणाले, नगरपालिकेत आम्हाला (कॉँग्रेसला) निसटे बहुमत मिळाले; पण जांभळे असे किमयागार आहेत की, ते दोन-तीन नगरसेवकांची उलथापालथ केव्हाही करू शकतात. म्हणून आम्ही त्यांनाच (राष्ट्रवादीला) सत्तेत घेतले.आवाडे यांच्या भाषणातील धागा पकडत सुरेश हाळवणकर म्हणाले, शहराच्या विकासाची मोट बांधावयाची संधी मिळाली तर जांभळे आमच्याबरोबर असतील आणि भाजपमध्ये आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे निश्चितच चीज होते.आमदार मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील गटा-तटाच्या राजकारणाचा उल्लेख करताना आवाडेंना चिमटा काढला. ते म्हणाले, नगरपालिकेच्या राजकीय बेरजेत आवाडेंनी जांभळेंना आपलेसे केले आणि मला तोंडघशी पाडले.सुनील तटकरे यांनी जांभळे यांना आवाडे व हाळवणकर दोघेही आपलेसे करण्यासाठी चढाओढ करताहेत, कारण नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, असे म्हणत कोपरखळी मारली. मात्र, इचलकरंजीत या व्यासपीठावर राजकारणाचे चांगलेच वस्तुपाठ मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आवाडेंनी हायजॅक केले, हाळवणकरांनी पळविलेलोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवेळचा अनुभव सांगताना निवेदिता माने म्हणाल्या, विधानसभेचा उमेदवार कोण, या स्पर्धेत जांभळेंनी बाजी मारली आणि शेळके आम्हाला (राष्ट्रवादीला) कायमचेच दुरावले. नगरपालिकेच्या राजकारणात आवाडेंनी शेळकेंना हायजॅक केले, तर आता हाळवणकरांनी त्यांना पळवून नेले.नगराध्यक्षांचे बंड ही आमची चूकनगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडाबाबत प्रकाश आवाडे म्हणाले, नगराध्यक्षा आमच्या पक्षाच्या असल्या तरी आमच्या नाहीत. यामागे मात्र आमची चूक आहे; मात्र जांभळे यांच्या किमयेमुळे त्या विरोधकांच्याही नाहीत.