शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

महापालिकेमध्ये गोंधळ, विकासकामांचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: November 2, 2016 00:55 IST

काही प्रकल्प ठप्पच : महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय नाही; कामांची गती मंदावली

 कोल्हापूर : आघाड्यांतर्गत कुरघोड्या, एकमेकांना शह देण्याचे राजकारण, काही मूठभर नगरसेवकांची दादागिरी, अधिकाऱ्यांना होत असलेली शिवीगाळ आणि कामे होत नसल्याने हतबल झालेल्या काही नगरसेवकांनी अधिकारी पैसे खात असल्याचे केलेले आरोप, त्याला आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलेले उघड आव्हान या साऱ्या गोंधळाच्या कारभारामुळे महानगरपालिका हद्दीतील नागरी समस्या जटील बनत चालल्या आहेत. त्याचा विकासकामांवर परिणाम होऊन कामांची गती मंदावली आहे. अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि काही नवी उमेद घेऊन निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उत्साहाला वर्षभरातच ओहोटी लागली आहे. पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून हेच अनुभवायला येथे आलो काय, असा प्रश्न आता अनेक होतकरी नगरसेवकांना पडला आहे. महानगरपालिकेची जी काही बदनामी व्हायची होती, ती वर्षभरात झाली. आता नवे ठेकेदार महानगरपालिकेचे काम घेतील का, अशीही भीती व्यक्त करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडी-भाजप असा सामना रंगला. त्यातून जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकीय संघर्षाची बीजे पुन्हा एकदा रोवली गेली. त्यामुळेच महापालिका निवडणूक संपल्यानंतरही हा संघर्ष संपला नाही. सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत बऱ्याच उचापती केल्या. राजकारण : ‘सेफ सिटी’चे उद्घाटन का नाही? ४कोल्हापुरात राबविण्यात आलेला ‘सेफ सिटी’ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यातील काही त्रुटी वगळता त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात आला आहे. ४एरवी दोन- पाच लाखांच्या विकासकामांची उद्घाटने करून त्यांचे फोटो काढले जातात; परंतु तब्बल साडेसात कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन अद्यापही झालेले नाही. ४जर कार्यक्रम करायचा ठरविले तर त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलवावे लागेल, या एकाच भीतीने हा प्रकल्प उद्घाटनाशिवाय सुरू झाल्याचे नगरसेवक सांगतात. ४महानगरपालिकेच्या शाळेला प्रथमच ‘आयएसओ ९००१’ हे जागतिक दर्जाचे मानांकन मिळाले. त्याबद्दल या शाळेचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम नगरसेवकाने ठेवला होता. ४या कार्यक्रमास महापौर अश्विनी रामाणे या अनुपस्थित होत्या. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला, ते ताराराणी आघाडीचे आहेत, या एकमेव कारणाने त्या अनुपस्थित राहिल्याची चर्चा इथे होती.