शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेमध्ये गोंधळ, विकासकामांचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: November 2, 2016 00:55 IST

काही प्रकल्प ठप्पच : महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय नाही; कामांची गती मंदावली

 कोल्हापूर : आघाड्यांतर्गत कुरघोड्या, एकमेकांना शह देण्याचे राजकारण, काही मूठभर नगरसेवकांची दादागिरी, अधिकाऱ्यांना होत असलेली शिवीगाळ आणि कामे होत नसल्याने हतबल झालेल्या काही नगरसेवकांनी अधिकारी पैसे खात असल्याचे केलेले आरोप, त्याला आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलेले उघड आव्हान या साऱ्या गोंधळाच्या कारभारामुळे महानगरपालिका हद्दीतील नागरी समस्या जटील बनत चालल्या आहेत. त्याचा विकासकामांवर परिणाम होऊन कामांची गती मंदावली आहे. अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि काही नवी उमेद घेऊन निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उत्साहाला वर्षभरातच ओहोटी लागली आहे. पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून हेच अनुभवायला येथे आलो काय, असा प्रश्न आता अनेक होतकरी नगरसेवकांना पडला आहे. महानगरपालिकेची जी काही बदनामी व्हायची होती, ती वर्षभरात झाली. आता नवे ठेकेदार महानगरपालिकेचे काम घेतील का, अशीही भीती व्यक्त करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडी-भाजप असा सामना रंगला. त्यातून जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकीय संघर्षाची बीजे पुन्हा एकदा रोवली गेली. त्यामुळेच महापालिका निवडणूक संपल्यानंतरही हा संघर्ष संपला नाही. सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत बऱ्याच उचापती केल्या. राजकारण : ‘सेफ सिटी’चे उद्घाटन का नाही? ४कोल्हापुरात राबविण्यात आलेला ‘सेफ सिटी’ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यातील काही त्रुटी वगळता त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात आला आहे. ४एरवी दोन- पाच लाखांच्या विकासकामांची उद्घाटने करून त्यांचे फोटो काढले जातात; परंतु तब्बल साडेसात कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन अद्यापही झालेले नाही. ४जर कार्यक्रम करायचा ठरविले तर त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलवावे लागेल, या एकाच भीतीने हा प्रकल्प उद्घाटनाशिवाय सुरू झाल्याचे नगरसेवक सांगतात. ४महानगरपालिकेच्या शाळेला प्रथमच ‘आयएसओ ९००१’ हे जागतिक दर्जाचे मानांकन मिळाले. त्याबद्दल या शाळेचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम नगरसेवकाने ठेवला होता. ४या कार्यक्रमास महापौर अश्विनी रामाणे या अनुपस्थित होत्या. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला, ते ताराराणी आघाडीचे आहेत, या एकमेव कारणाने त्या अनुपस्थित राहिल्याची चर्चा इथे होती.