शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

‘ई-पास’साठी कारणं दोनचं; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवासासाठी ‘ई-पास’ची आवश्यकता असून, त्यासाठी जिल्ह्याच्या ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवासासाठी ‘ई-पास’ची आवश्यकता असून, त्यासाठी जिल्ह्याच्या सायबर सेलकडे हजारो अर्ज येत आहेत. पाससाठी रुग्णालय अथवा अंत्यसंस्कार या दोन कारणांशिवाय ई-पास मंजूरच होत नसल्याचे प्रत्येकाच्या लक्षात आले. त्यामुळे हीच दोन कारणे बहुतांशी पाससाठी अर्जदारांकडून दिली जात आहेत.

कोरोना महामारीचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर झाला असताना, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदी पुकारली आहे. या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर ई-पास अनिवार्य आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी ‘ई-पास’साठी अर्ज केले जात आहेत. जिल्ह्यातून मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी रोज ई-पासची मागणी होते. आतापर्यंत सुमारे २४ हजार ८०३ लोकांनी त्यासाठी अर्ज केले तर त्यापैकी योग्य कारण असलेल्या ५,०६४ जणांनाच ई-पास मंजूर केले, इतरांचे सबळ कारण अगर अपुरी कागदपत्रे असल्यामुळे ई-पास नामंजूर केले आहेत.

प्रवासासाठीची कारणे...

रक्तातील प्रथम नातेवाईकांचा नजीक काळात अचानक मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार लग्न समारंभासाठी जाणाऱ्या मोजक्या लोकांसाठी, अत्यंत गंभीर रुग्णाचे उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी ई-पास मंजूर केला जातो. पण त्याशिवाय बाहेरगावी शिकणाऱ्या मुलाला आणण्यासाठी जाणे, गावी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी जाणे, आदी कारणांसाठीही नागरिक अर्ज करत आहेत.

ही कागदपत्र आवश्यकच...

हॉस्पिटलचे काम असेल तर त्यांची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल आवश्यक आहे. शिवाय प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड सोबत जोडावे लागते.

अवघ्या तीन ते चार तासात मिळतो पास...

‘ई-पास’साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते. तसेच सोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे जर योग्य असतील तर अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात पासबाबत मंजूर अथवा नामंजूर अशी निर्गती होते.

‘ई-पास’साठी असा करावा अर्ज

ई-पास आवश्यक असलेल्या नागरिकांनी कोल्हापूर पोलीस दलाचे http//covid19.mhpolice.in / या वेबसाईटवर जावून ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी.

- आतापर्यत ई-पाससाठी आलेले अर्ज : २४,८०३

- आठवड्यात ई-पाससाठी आलेले अर्ज : ८,७२४

- आतापर्यंत मंजूर केलेले ई-पास : ५,०६४

- प्रलंबित अर्ज : ००