शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...तर सदाभाऊंना पुन्हा ‘स्वाभिमानी’मध्ये घेऊ सावकर मादनाईक : टीकेला उत्तर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:51 IST

सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत

ठळक मुद्देउसाला साडेतीन हजारांचा दर द्यायला सांगा

उदगाव (जि. कोल्हापूर) : सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत घेऊन त्यांचा ऊस परिषदेत जाहीर सत्कार करू, असे प्रतिउत्तर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी मंत्री खोत यांना दिले.

भाजप सरकारने यावर्षी उसाच्या एफआरफीमध्ये मोठी वाढ केली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी बारा टक्के उताºयाला तीन हजार ५७५ रुपये इतका दर मिळणार आहे. काही साखर कारखान्यांनीही तशी तयारी दाखविली आहे. त्यामुळे आंदोलनाचे नाटक करू नका, अशी टीका कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली होती. त्या पार्श्वभूमीवर मादनाईक उदगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, आम्हाला प्रत्येक वर्षी चांगल्या ऊसदरासाठी संघर्ष करावा लागतो. गत हंगामात राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यांच्याकडे जवळपास ४६५ कोटींची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचे केवळ कागदी घोडे नाचविले आहेत.खोत यांच्याकडून पोरखेळचशेतकºयांना आश्वासनांची गाजरे दाखवीत शेतकºयांना फसवल्याची कामे आता जनतेसमोर आली आहेत. सदाभाऊ खोत यांच्यासारखा नेता जर शेतकºयांच्या पुढे एक आणि पोटात एक अशी भावना ठेवून पोरखेळच सुरू केला आहे. त्यामुळे आता तुम्ही बोलल्याप्रमाणेच तीन हजार ५७५ रुपये दर देऊन दाखवाच, असेही आव्हानही मादनाईक यांनी दिले आहे.