शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

...तर सदाभाऊंना पुन्हा ‘स्वाभिमानी’मध्ये घेऊ सावकर मादनाईक : टीकेला उत्तर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:51 IST

सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत

ठळक मुद्देउसाला साडेतीन हजारांचा दर द्यायला सांगा

उदगाव (जि. कोल्हापूर) : सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत घेऊन त्यांचा ऊस परिषदेत जाहीर सत्कार करू, असे प्रतिउत्तर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी मंत्री खोत यांना दिले.

भाजप सरकारने यावर्षी उसाच्या एफआरफीमध्ये मोठी वाढ केली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी बारा टक्के उताºयाला तीन हजार ५७५ रुपये इतका दर मिळणार आहे. काही साखर कारखान्यांनीही तशी तयारी दाखविली आहे. त्यामुळे आंदोलनाचे नाटक करू नका, अशी टीका कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली होती. त्या पार्श्वभूमीवर मादनाईक उदगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, आम्हाला प्रत्येक वर्षी चांगल्या ऊसदरासाठी संघर्ष करावा लागतो. गत हंगामात राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यांच्याकडे जवळपास ४६५ कोटींची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचे केवळ कागदी घोडे नाचविले आहेत.खोत यांच्याकडून पोरखेळचशेतकºयांना आश्वासनांची गाजरे दाखवीत शेतकºयांना फसवल्याची कामे आता जनतेसमोर आली आहेत. सदाभाऊ खोत यांच्यासारखा नेता जर शेतकºयांच्या पुढे एक आणि पोटात एक अशी भावना ठेवून पोरखेळच सुरू केला आहे. त्यामुळे आता तुम्ही बोलल्याप्रमाणेच तीन हजार ५७५ रुपये दर देऊन दाखवाच, असेही आव्हानही मादनाईक यांनी दिले आहे.