शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

...तर लोकसभा, राज्यसभेत दुरुस्ती विधेयक आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या १०२ व्या घटना दुरुस्तीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तर लोकसभा ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या १०२ व्या घटना दुरुस्तीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तर लोकसभा व राज्यसभेत दुरुस्ती विधेयक आणण्यास भाजप तयार आहे, असा शब्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात सकल मराठा समाजाला दिला. मराठा आरक्षण देणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

सकल मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय नेत्यांना आरक्षणासाठी ते काय मदत करू शकतात, याची विचारणा करण्यासाठी भेटीगाठी सुरू आहेत. आमदार पाटील यांनी भाजपची भूमिका सांगताना, राज्य सरकारवर आरक्षणाच्या भूमिकेवरून टीकेची झोड उठवली. या वेळी प्रा. जयंत पाटील, निवास साळोखे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, महेश जाधव प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, राज्याचे मागास ठरवण्याचे अधिकार १०२ व्या घटना दुरुस्तीने केले गेले हे खरे नाही. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देतानाही तसे नमूद केले आहे. निवाडा दिलेल्या न्यायाधीशातील पाचपैकी तिघांनीदेखील ही मान्य केले आहे. निकालाचा अर्थ लावण्यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे. माहिती अपुरी असल्याने तसे झाले असावे, पण आता पुनर्विचार याचिकेत ते मान्य करतील, असा विश्वास आहे. तरीदेखील त्यांनी ते मान्य केले नाही, तर मात्र केंद्र सरकार राज्य सरकारांना अधिकार देण्याच्या बाबतीत सकारात्मक असून, संसदेच्या दोन्ही सभागृहांत मूळ कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक आणण्याचे काम भाजप करेल.

चौकट

माझे नेतृत्व रुचणारे नाही..

बैठकीत बाबा इंदूलकर यांनी चंद्रकांत पाटील यांनीच आरक्षण लढ्याचे नेतृत्व करावी, अशी मागणी केली. यावर पत्रकार परिषदेत खुलासा करताना मला प्रश्न सुटण्यात रस आहे, नेतृत्वात नाही. माझे नेतृत्व मराठा समाजाच्या काही गटांना रुचणारेही नाही. संभाजीराजे छत्रपती यांनीच नेतृत्व करावे, अशी समाजाची भूमिका आहे. ते आता सरकार सकारात्मक असल्याची भूमिका घेत असलेतरी त्यांनाही सत्य कळल्यावर योग्य मार्गावर येतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी केली.

चौकट

दिल्लीचा रस्ता मुंबईतूनच

राज्याला अधिकार नाहीत असे म्हटले तरी दिल्लीचा रस्ता मुंबईतून जातो हे विसरता कामा नये, असा सल्ला देताना पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे म्हटले तरी, आधी मराठा समाज मागास ठरवावे लागणार आहे. त्यासाठी मागास आयोग नेमावा लागणार, त्यांचा अहवाल मंत्रिमंडळ, विधिमंडळ, राज्यपालांकरवी राष्ट्रपतीकडे जाणार. तेथून राष्ट्रीय मागास आयोगाच्या शिफारशीने ते पुन्हा राज्यपालांकडे येणार. मग यात राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असणार असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

चौकट

तिघांची हकालपट्टी करा

मागास आयोगातील तीन सदस्य लोणावळ्याला झालेल्या ओबीसी परिषदेत कसे गेले. त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, असे पाठिंबा दर्शवण्यासाठी हात कसे वर केले, अशी विचारणा करत पाटील यांनी समितीतील सदस्यांनी अशी भूमिका घेतल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.