शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

...तर लोकसभा, राज्यसभेत दुरुस्ती विधेयक आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या १०२ व्या घटना दुरुस्तीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तर लोकसभा ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या १०२ व्या घटना दुरुस्तीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तर लोकसभा व राज्यसभेत दुरुस्ती विधेयक आणण्यास भाजप तयार आहे, असा शब्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात सकल मराठा समाजाला दिला. मराठा आरक्षण देणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

सकल मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय नेत्यांना आरक्षणासाठी ते काय मदत करू शकतात, याची विचारणा करण्यासाठी भेटीगाठी सुरू आहेत. आमदार पाटील यांनी भाजपची भूमिका सांगताना, राज्य सरकारवर आरक्षणाच्या भूमिकेवरून टीकेची झोड उठवली. या वेळी प्रा. जयंत पाटील, निवास साळोखे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, महेश जाधव प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, राज्याचे मागास ठरवण्याचे अधिकार १०२ व्या घटना दुरुस्तीने केले गेले हे खरे नाही. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देतानाही तसे नमूद केले आहे. निवाडा दिलेल्या न्यायाधीशातील पाचपैकी तिघांनीदेखील ही मान्य केले आहे. निकालाचा अर्थ लावण्यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे. माहिती अपुरी असल्याने तसे झाले असावे, पण आता पुनर्विचार याचिकेत ते मान्य करतील, असा विश्वास आहे. तरीदेखील त्यांनी ते मान्य केले नाही, तर मात्र केंद्र सरकार राज्य सरकारांना अधिकार देण्याच्या बाबतीत सकारात्मक असून, संसदेच्या दोन्ही सभागृहांत मूळ कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक आणण्याचे काम भाजप करेल.

चौकट

माझे नेतृत्व रुचणारे नाही..

बैठकीत बाबा इंदूलकर यांनी चंद्रकांत पाटील यांनीच आरक्षण लढ्याचे नेतृत्व करावी, अशी मागणी केली. यावर पत्रकार परिषदेत खुलासा करताना मला प्रश्न सुटण्यात रस आहे, नेतृत्वात नाही. माझे नेतृत्व मराठा समाजाच्या काही गटांना रुचणारेही नाही. संभाजीराजे छत्रपती यांनीच नेतृत्व करावे, अशी समाजाची भूमिका आहे. ते आता सरकार सकारात्मक असल्याची भूमिका घेत असलेतरी त्यांनाही सत्य कळल्यावर योग्य मार्गावर येतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी केली.

चौकट

दिल्लीचा रस्ता मुंबईतूनच

राज्याला अधिकार नाहीत असे म्हटले तरी दिल्लीचा रस्ता मुंबईतून जातो हे विसरता कामा नये, असा सल्ला देताना पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे म्हटले तरी, आधी मराठा समाज मागास ठरवावे लागणार आहे. त्यासाठी मागास आयोग नेमावा लागणार, त्यांचा अहवाल मंत्रिमंडळ, विधिमंडळ, राज्यपालांकरवी राष्ट्रपतीकडे जाणार. तेथून राष्ट्रीय मागास आयोगाच्या शिफारशीने ते पुन्हा राज्यपालांकडे येणार. मग यात राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असणार असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

चौकट

तिघांची हकालपट्टी करा

मागास आयोगातील तीन सदस्य लोणावळ्याला झालेल्या ओबीसी परिषदेत कसे गेले. त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, असे पाठिंबा दर्शवण्यासाठी हात कसे वर केले, अशी विचारणा करत पाटील यांनी समितीतील सदस्यांनी अशी भूमिका घेतल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.