शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नामदेवराव व्हटकर यांचा 'महापरिनिर्वाण' लवकरच झळकणार, डॉ. आंबेडकरांचा अखेरचा प्रवास पाहायला मिळणार

By संदीप आडनाईक | Updated: December 6, 2024 13:24 IST

घरदार विकून केले चित्रिकरण, कोल्हापुरातील नामवंत दिग्दर्शक

संदीप आडनाईक कोल्हापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास कोल्हापूरचे कवी, लेखक, नाटककार आणि आमदार नामदेवराव लक्ष्मण व्हटकर यांनी चित्रित केला होता. त्यांनी या चित्रिकरणासाठी स्वत: चे घरदार, प्रेस विकून साडेतीन हजार फुटाचे चित्रिकरण करून ठेवले होते. पुढे ते सरकारकडे जमा केले. हा एकमेव ठेवा व्हटकर यांनी जतन करून ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण : एक कथा, दोन इतिहास' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.महामानवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरिता आणि अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरिता प्रचंड जनसागर उसळला होता. त्यांचा हा अखेरचा प्रवास कोल्हापूरचे दिग्दर्शक नामदेवराव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला होता. या दरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहीत नाहीत, त्या या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. हा मन सुन्न करणारा प्रसंग व्हटकर यांच्या नजरेतून पहायला मिळणार आहे, अशी माहिती त्यांच्या नात प्रा. नीलिमा शरद व्हटकर यांनी दिली.हा चित्रपट डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित व्हावा, यासाठी प्रयत्न होता, परंतु त्याला अजून तीन महिने वेळ लागणार आहे. व्हटकर यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे. शिवाय अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही झळकत आहेत. मात्र डॉ. आंबेडकर यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे असून, अमर कांबळे डीओपी आहेत. या चित्रपटाची पटकथा चेतक घेगडमल यांनी लिहिली आहे.कोल्हापुरातील नामवंत दिग्दर्शकनामदेव व्हटकर हे मराठीतील ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक होते. सुलोचना अभिनित 'आहेर' हा १९५७ मधील चित्रपट, हंसा वाडकर अभिनित 'मुलगा' हा १९५६ मधील चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते. राम गबाले यांच्या 'घरधनी' या पु. ल. देशपांडे यांच्यासोबतच्या १९५२ मधल्या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर