शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कोल्हापूरची हद्दवाढ भांडणे लावण्याचा उद्योग; नेत्यांनी हात टेकले

By भारत चव्हाण | Updated: February 4, 2025 11:56 IST

शब्द पाळता आला नाही

भारत चव्हाणकोल्हापूर : सरकार बदलले, पालकमंत्री बदलले, नेत्यांच्या भूमिका बदलल्या; परंतु कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न आजही अधांतरीच राहिलेला आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या दबावामुळे प्रश्नाला पद्धतशीरपणे बगल दिली जात आहे. हद्दवाढीच्या राजकारणातून नेते मंडळी एकमेकांना शह देत असल्याने कोल्हापूरचे सामाजिक स्वास्थ्य मात्र बिघडत चालले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा जेव्हा सरकार, पालकमंत्री बदलले आणि हद्दवाढीचा प्रश्न समोर आला की, त्यातून ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव करून भांडणे लावण्याचाच प्रयत्न झाला आहे. तसा प्रयत्न आत्ताही होत आहे. या प्रश्नात सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्याला सोयीची भूमिका घेतली आहे.सत्ता बदलल्यानंतर हा प्रश्न सुटला तर सरकार पक्षाकडून श्रेय घेतले जाईल या हेतूने प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापर्यंत केवळ विरोधाचीच भूमिका घेतली. राज्यातील अनेक शहरांची हद्दवाढ झाली आहे, त्या त्या शहरातील, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी हद्दवाढीच्या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेत हद्दवाढीचे समर्थन केले, परंतु कोल्हापूर हा एकच जिल्हा आहे की तेथे या प्रश्नावर मार्ग निघालेला नाही.

हद्दवाढीच्या बाजूने कोण नाही?हद्दवाढ झाली पाहिजे आणि ती केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सांगितले. एवढेच नाही तर लवकरच याबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल, अशी ग्वाहीसुद्धा दिली आहे. तरीही त्यांना निर्णय घेता आला नाही. जाहीर सभेत दिलेला शब्द पाळता आला नाही.

दिशाच बदललीसन २०१७ मध्ये हद्दवाढ करायला निघालेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न वेगळ्याच टाेकावर नेऊन ठेवला. हद्दवाढीऐवजी त्यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले. आता हेच प्राधिकरण ग्रामीण जनतेची डोकेदुखी झाली आहे. या प्राधिकरणास आतापर्यंत एक रुपयाचा निधी मिळालेला नाही.

हद्दवाढ होता होता थांबलीआमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेच्या पायरीवर बेमुदत उपोषण सुरू केले, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावावर सही करण्याचे ठरविले होते; परंतु त्याची कुणकुण लागताच भाजपच्या आमदारांनी त्यास विरोध केला आणि हद्दवाढ होता होता थांबली.

एकदाच काय तो निर्णय घ्याशहरी आणि ग्रामीण जनतेत या प्रश्नावरून कटूता निर्माण होताना पहायला मिळत आहे. शहरालगतच्या गावांचा पाणी पुरवठा बंद करा, बससेवा खंडित करा, रुग्णालयातील सेवा देऊ नका, भाजी मंडईत शेतकऱ्यांना बसू देऊ नका, अशा मागण्या शहरी भागातून होऊ लागल्या आहेत. भाजीपाला तसेच दूध पुरवठा बंद करु, असे इशारे ग्रामीण भागातून दिले जाऊ लागले आहेत. यातून कटूता वाढण्याची शक्यता आहे. काय निर्णय घ्यायचा तो एकदाच घ्या. हद्दवाढ शक्य असेल तर करा, नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणून तरी सांगा. विरोध करणाऱ्यांची नावेही सांगा, अशाच भावना आता ग्रामीण व शहरी भागातून व्यक्त होताना पहायला मिळत आहे.

याला काय म्हणावं?

  • आमदार चंद्रदीप नरके राहणार शहरात, सर्व सुविधा वापरणार शहरातील. पण तरीही शहराच्या हद्दवाढीला विरोध !
  • आमदार अमल महाडिक राहतात शिरोलीत, त्यांची कार्यालये शहरात. यांना शहरातील दीड लाख मतं चालतात, पण हद्दवाढीला विरोध!
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण