शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरची महापालिका सरकारच चालवते.. दाबून करते बदल्या; स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह 

By भारत चव्हाण | Updated: July 11, 2025 19:17 IST

नव्याने वारंवार हस्तक्षेप सुरू

भारत चव्हाणकोल्हापूर : महापालिकेत हर्षजित घाटगे कार्यकारी अभियंता असून सेवा ज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असल्याने त्यांच्याकडे शहर अभियंतापदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे, असा वस्तुनिष्ठ अभिप्राय दिल्यानंतरही त्यांचा कार्यभार काढून घेऊन रमेश मस्कर यांच्याकडे तो देण्याचा आदेश राज्य सरकारने दिला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिका कामकाजात सरकारने हस्तक्षेप करून चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा आक्षेप माजी महापौरांनी घेतला.महानगरपालिका स्वायत्त संस्था असून त्याचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन यांनी पाहावे असे संविधानाला अपेक्षित आहे. परंतु आता लोकप्रतिनिधी नसले तरी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांना सर्वाधिकार प्रदान करण्यात आले आहेत. राजकीय पातळीवर जेव्हा शहर अभियंतापदावर रमेश मस्कर यांची नेमणूक करावी अशी मागणी झाली, तेव्हा नगरविकास विभागाने महापालिकेकडे अहवाल मागितला. दि. २३ जून रोजी शासनाच्या पत्रानुसार महापालिकेने अहवाल पाठविला. परंतु, त्यामध्ये हर्षजित घाटगे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून ते कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यात त्यांना बदलले जावे असे कोठेही म्हटलेले नाही.कायदा काय सांगतो ?१९९२ मधील ७४ वा संविधान दुरुस्ती अधिनियम भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्यासाठी करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकांना अधिक स्वायत्तता देण्याचा उद्देश आहे. या दुरुस्तीने महापालिकांना घटनात्मक दर्जा दिला तसेच त्यांच्या अस्तित्वाची व कार्यक्षमतेची हमी दिली आहे. महापालिकांना स्वशासन संस्था म्हणून सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार व जबाबदाऱ्या सोपविण्याचा आदेश या अधिनियमाने दिला आहे. या तरतुदींमुळे महापालिकांच्या कामकाजामधील शासकीय हस्तक्षेप कमी होऊन विकेंद्रीकरण व स्थानिक स्वराज्याला चालना मिळेल अशी हमी दिली आहे.

सरकार नवीन प्रथा पाडत आहे. आतापर्यंत पालिकेच्या कामकाजात सरकारने कधी हस्तक्षेप केला नाही. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आधीच बेबंदशाही सुरू आहे. आता सरकारकडून आदेश आणले जाऊ लागल्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. - राजू शिंगाडे, माजी महापौरमहापौर, स्थायी समिती सभापती यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला आहे. आता अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये हस्तक्षेप होत आहे. निर्णय वरून लादले जाणार असतील तर चुकीचे आहे. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे अधिकार अबाधित राखले पाहिजेत. - आर. के. पोवार, माजी महापौर