शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प 'या' गावात होणार कार्यान्वित, वीज बिलात होईल बचत

By समीर देशपांडे | Updated: July 23, 2024 17:37 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ...

समीर देशपांडेकोल्हापूर: यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. हेच महत्त्व ओळखून माणगाव (ता. हातकणंगले) येथे ५० लाख रुपये खर्चून ‘गोबरधन’ प्रकल्प उभारण्यात आला असून, लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण निधी केंद्र शासनाने दिला आहे.बायाेगॅस प्रकल्प उभारण्यात कोल्हापूर जिल्हा गेली २० वर्षे देशात अव्वल आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या गावातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर विद्युत उपकरणे चालविण्याचा विचार केंद्र शासनाकडून सुरू होता. यातूनच मग गोबरधन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या माणगावची या केंद्र शासनाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीने गावाबाहेरील जागा यासाठी उपलब्ध करून दिली.गॅससाठीची टाकी, स्लरीचा हौद यासह आवश्यक यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली असून, सध्या यामध्ये ओला कचरा टाकण्याचे काम सुरू आहे. कचरा जर कमी पडला तर शेजारच्या ज्या गावात आठवडा बाजार असतो तेथील भाज्यांचा कचरा गोळा करून या प्रकल्पावर आणण्यात येणार आहे. या ठिकाणी रोज १५०० किलो कचरा टाकण्यात येणार असून, त्यातून रोज १०० ते १२० युनिट वीज निर्मिती होणार आहे. यातून माणगावातील १०० हून अधिक असणारे पथदिवे सुरू ठेवण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.

बायोगॅस प्रकल्पापासून आवश्यक तितके खांब टाकण्यात आले असून, येथून निर्माण झालेली ऊर्जा वहन करण्यासाठी तीन ठिकाणी कन्व्हरटर बसविण्यात येणार आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार असून, त्याचा फायदा ग्रामपंचायतीला होऊन वीज बिलात बचत होणार आहे. - माधुरी परीट प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद, कोल्हापूर. 

ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सध्या या ठिकाणी ओला कचरा टाकण्याचे काम सुरू असून, गॅस निर्मिती सुरू आहे. येत्या पंधरवडयात पूर्ण क्षमतेने गॅस निर्मिती होणार असून, याचवेळी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असून, यातून वीज बचतीचा फायदा होणार आहे. - राजू मगदूम, सरपंच, माणगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत