शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प 'या' गावात होणार कार्यान्वित, वीज बिलात होईल बचत

By समीर देशपांडे | Updated: July 23, 2024 17:37 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ...

समीर देशपांडेकोल्हापूर: यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. हेच महत्त्व ओळखून माणगाव (ता. हातकणंगले) येथे ५० लाख रुपये खर्चून ‘गोबरधन’ प्रकल्प उभारण्यात आला असून, लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण निधी केंद्र शासनाने दिला आहे.बायाेगॅस प्रकल्प उभारण्यात कोल्हापूर जिल्हा गेली २० वर्षे देशात अव्वल आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या गावातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर विद्युत उपकरणे चालविण्याचा विचार केंद्र शासनाकडून सुरू होता. यातूनच मग गोबरधन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या माणगावची या केंद्र शासनाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीने गावाबाहेरील जागा यासाठी उपलब्ध करून दिली.गॅससाठीची टाकी, स्लरीचा हौद यासह आवश्यक यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली असून, सध्या यामध्ये ओला कचरा टाकण्याचे काम सुरू आहे. कचरा जर कमी पडला तर शेजारच्या ज्या गावात आठवडा बाजार असतो तेथील भाज्यांचा कचरा गोळा करून या प्रकल्पावर आणण्यात येणार आहे. या ठिकाणी रोज १५०० किलो कचरा टाकण्यात येणार असून, त्यातून रोज १०० ते १२० युनिट वीज निर्मिती होणार आहे. यातून माणगावातील १०० हून अधिक असणारे पथदिवे सुरू ठेवण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.

बायोगॅस प्रकल्पापासून आवश्यक तितके खांब टाकण्यात आले असून, येथून निर्माण झालेली ऊर्जा वहन करण्यासाठी तीन ठिकाणी कन्व्हरटर बसविण्यात येणार आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार असून, त्याचा फायदा ग्रामपंचायतीला होऊन वीज बिलात बचत होणार आहे. - माधुरी परीट प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद, कोल्हापूर. 

ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सध्या या ठिकाणी ओला कचरा टाकण्याचे काम सुरू असून, गॅस निर्मिती सुरू आहे. येत्या पंधरवडयात पूर्ण क्षमतेने गॅस निर्मिती होणार असून, याचवेळी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असून, यातून वीज बचतीचा फायदा होणार आहे. - राजू मगदूम, सरपंच, माणगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत