शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादेत वाढ होणार, २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार

By समीर देशपांडे | Updated: March 1, 2023 17:20 IST

रिक्त पदांचा आकडा निश्चित झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यावेळी शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारांच्या वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे.याआधी अंगणवाडी सेविकेसाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. ती आता १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची आधीची पात्रता रद्द करून ती देखील १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे.तसेच याआधी उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३० अशी होती. यामध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना आता यासाठी अर्ज करता येणार आहे. विधवा महिलांना वयाच्या चाळीशीपर्यंत अर्ज करता येईल. सध्या सर्व जिल्हा परिषदांकडून मदतनीसांमधून सेविकांची पदोन्नतीने भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून यानंतर मदतनीसांच्या रिक्त पदांचा आकडा निश्चित झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

बारावीच्या गुणांना मोठे महत्त्वया निवड प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना १२ वीला ८० टक्केहून अधिक गुण आहेत त्यांना १०० पैकी ६० गुण देण्यात येणार आहेत. ७०.०१ ते ८० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५५ तर ६०.०१ ते ७० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५० गुण देण्यात येतील. त्याखाली गुण असणाऱ्यांना ४५, ४० आणि ४० टक्केहून कमी गुण असणाऱ्या सरासरी ३५ गुण देण्यात येणार आहेत. पदवीधर आणि त्यातूनही अधिक शिक्षण घेतले असल्यास त्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत.

यांनाही अधिक गुणविधवा आणि अनाथ, अनुसूचित जाती जमाती यांना १० गुण, इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग आणि सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास प्रत्येकी ५ गुण जादा देण्यात येणार आहेत.मोबाइल नीट वापरता यावाआता अंगणवाड्यांसंबंधित सर्व अहवाल, शालेय पोषण आहार वाटप, मुलामुलींच्या वजनांची नोंद ही सर्व कामे मोबाइलवरच करावी लागतात. त्यामुळे ॲन्ड्रॉईड मोबाइल सुलभपणे वापरता येणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता असल्याने शैक्षणिक पात्रता १० वी व सातवीवरून १२वी करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर