शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादेत वाढ होणार, २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार

By समीर देशपांडे | Updated: March 1, 2023 17:20 IST

रिक्त पदांचा आकडा निश्चित झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यावेळी शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारांच्या वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे.याआधी अंगणवाडी सेविकेसाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. ती आता १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची आधीची पात्रता रद्द करून ती देखील १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे.तसेच याआधी उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३० अशी होती. यामध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना आता यासाठी अर्ज करता येणार आहे. विधवा महिलांना वयाच्या चाळीशीपर्यंत अर्ज करता येईल. सध्या सर्व जिल्हा परिषदांकडून मदतनीसांमधून सेविकांची पदोन्नतीने भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून यानंतर मदतनीसांच्या रिक्त पदांचा आकडा निश्चित झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

बारावीच्या गुणांना मोठे महत्त्वया निवड प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना १२ वीला ८० टक्केहून अधिक गुण आहेत त्यांना १०० पैकी ६० गुण देण्यात येणार आहेत. ७०.०१ ते ८० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५५ तर ६०.०१ ते ७० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५० गुण देण्यात येतील. त्याखाली गुण असणाऱ्यांना ४५, ४० आणि ४० टक्केहून कमी गुण असणाऱ्या सरासरी ३५ गुण देण्यात येणार आहेत. पदवीधर आणि त्यातूनही अधिक शिक्षण घेतले असल्यास त्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत.

यांनाही अधिक गुणविधवा आणि अनाथ, अनुसूचित जाती जमाती यांना १० गुण, इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग आणि सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास प्रत्येकी ५ गुण जादा देण्यात येणार आहेत.मोबाइल नीट वापरता यावाआता अंगणवाड्यांसंबंधित सर्व अहवाल, शालेय पोषण आहार वाटप, मुलामुलींच्या वजनांची नोंद ही सर्व कामे मोबाइलवरच करावी लागतात. त्यामुळे ॲन्ड्रॉईड मोबाइल सुलभपणे वापरता येणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता असल्याने शैक्षणिक पात्रता १० वी व सातवीवरून १२वी करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर