शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

थॅलेसेमिया सेंटर सुरू होण्याआधीच पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:02 IST

रक्तातील आनुवंशिकतेमुळे होणारा थॅलेसेमिया आजार हळूहळू पाय पसरत असताना, त्याच्या प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या सेंटरनाच आता कुलूप लागण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाकडून सेंटर मंजूर झाली; पण त्यासाठी लागणारी साधने व मनुष्यबळाची उपलब्धताच करून दिलेली नसल्यामुळे याचे नुसतेच सांगाडे उभे राहिले आहेत.

ठळक मुद्देथॅलेसेमिया सेंटर सुरू होण्याआधीच पडले बंदमनुष्यबळ, साधनांचा तुटवडा : सात लाख खर्च वाया

नसिम सनदीकोल्हापूर : रक्तातील आनुवंशिकतेमुळे होणारा थॅलेसेमिया आजार हळूहळू पाय पसरत असताना, त्याच्या प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या सेंटरनाच आता कुलूप लागण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाकडून सेंटर मंजूर झाली; पण त्यासाठी लागणारी साधने व मनुष्यबळाची उपलब्धताच करून दिलेली नसल्यामुळे याचे नुसतेच सांगाडे उभे राहिले आहेत.

कोल्हापुरात तर सात लाख रुपये खर्चून सेवा रुग्णालयातच तयार केलेले हे सेंटर बंदच असल्यामुळे हा सर्व खर्च वाया गेला आहे. केंद्र सरकारने मनावर घेतले तरीदेखील पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

आनुवंशिक आणि जन्मजात आजार म्हणून थॅलेसेमियाकडे पाहिले जाते. लाल पेशी कमी होऊन शरीरातील हिमोग्लोबिन तयार होण्याची प्रक्रियाच थांबते. या आजाराची लागण झाल्यास रुग्ण जास्तीत २५ ते ३० वर्षेच जगू शकतो. देशभरात दरवर्षी या आजाराशी संबंधित १० हजार रुग्ण आढळतात.

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २०० च्या वर रुग्ण आढळून आले आहेत. महागडे उपचार, रक्ताची अनियमित उपलब्धता, बरे होण्याची संभावना कमी असल्याने प्रबोधनावर अधिक भर देणे महत्त्वाचे ठरत असल्यानेच केंद्र सरकारने डे केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार कोल्हापुरात कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील एका हॉलमध्ये पार्टिशन तयार करून त्याचे रूपांतरण सेंटरमध्ये करण्यात आले. त्यासाठी मंजूर झालेल्या आठ लाखांच्या निधीपैकी सात लाख खर्च करण्यात आले. या घटनेलाही आता दीड वर्ष होऊन गेले आहे; तथापि आतापर्यंत येथे कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्या होताना दिसत नाहीत.या संदर्भात याच्यासंबंधित घटकांशी संपर्क साधला असताना कोणी उघडपणे बोलण्यासही तयार नाहीत. हे सेंटर सुरू करायचे तर रक्ताची उपलब्धता आणि त्याची तपासणी करण्यासाठी अद्ययावत लॅबची गरज आहे, शिवाय हेमॅटॉलॉजिस्टची अत्यंत गरज आहे; पण शासनाकडून सेंटरचा सांगाडा उभा करण्यापलीकडे गेल्या दीड वर्षात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. कर्मचारी भरती आणि साधनसामग्रीच्या बाबतीत ब्रही काढला गेलेला नाही.

रुग्णांसाठी उपयुक्तचहिमोग्लोबिनचे प्रमाण नऊ टक्क्यांच्याही खाली गेले तर औषधे व रक्त चढवून प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला तरी ते फार काळ टिकत नाही. त्यामुळे दर सहा आठवड्यांनी अशा रुग्णांना रक्त चढवावे लागते. शिवाय हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफरेसिसच्या तपासणीसह बोन मारो ट्रान्स्प्लान्ट शस्त्रक्रियाही करावी लागते.

हे उपचार खूपच महागडे असतात. शासनाकडून हे सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले तर अशा प्रकारच्या रुग्णांवर वेळीच उपचार व तपासण्या होऊन त्यांचे आयुर्मान पाच ते १० वर्षांनी वाढविणे शक्य आहे.राज्यात १८ सेंटर्सराष्ट्रीय बालस्वास्थ्य अभियानांतर्गत एकट्या महाराष्ट्रात १८ सेंटर सुरू केली, त्यात सातारा, ठाणे, नाशिक, मुंबई,अमरावती येथे प्रत्यक्षात त्यांची सुरुवात झाली. याशिवाय कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड या १० ठिकाणी जिल्हा रुग्णालयातच हे सेंटर उभारण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर