शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

संपामुळे वस्त्रोद्योग उद्ध्वस्त

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

इचलकरंजीतील बैठकीत सायझिंगधारक प्रतिनिधींचा आरोप

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित किमान वेतनाचा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना इचलकरंजीत संप करून येथील वस्त्रोद्योगाला वेठीस धरण्याचे काम कामगार संघटना करीत आहे. हा प्रश्न राज्याचा असतानासुद्धा फक्त येथेच संप करून येथील उद्योग का उद्ध्वस्त केला जात आहे, अशी टीका करणारा प्रश्न पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत उपस्थित करण्यात आला.यंत्रमाग कामगार सुधारित किमान वेतनासाठी लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. संप काळात शहरातील काही कारखान्यांवर दगडफेकीचे प्रकार घडल्याने दहशत निर्माण झाली आहे. तरी सायझिंग कारखान्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्यावतीने करण्यात आली होती. त्यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक विनायक नराळे यांनी शहरातील तिन्ही पोलीस ठाणी व सायझिंगधारक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.बैठकीमध्ये सायझिंगधारकांची बाजू मांडताना बाळ महाराज म्हणाले, सायझिंग उद्योगामध्ये किमान वेतन दिले जात आहे. तरीसुद्धा कामगार संघटनेकडून वारंवार याच उद्योगामध्ये संप घडवून आणला जात आहे. ज्यामुळे सायझिंगधारकांबरोबरच येथील वस्त्रोद्योगाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. प्रकाश गौड म्हणाले, कामगार संघटनेने कोणत्याही प्रकारची सूचना न देता अचानक संप घडवून आणला. त्यामुळे सायझिंग कारखान्यांमध्ये लाखो रुपयांचे सूत पडून राहिले आहे. कोणतेही कारण नसताना सेक्शन वार्पिंग क्षेत्रात दबाव टाकून संप घडविला जात आहे. कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी कामगार व सायझिंग कारखान्यांना पोलीस संरक्षण मिळावे. यावेळी वसंतराव पाटील, दिलीप ढोकळे, आदींनीही काही मुद्दे मांडले. बैठकीच्या शेवटी आंदोलन काळात दोन्ही बाजूंकडून शांतता राखली पाहिजे. चर्चेने हा विषय संपवावा, असे आवाहन करून उपअधीक्षक नराळे यांनी सर्वांना पोलीस संरक्षणाचे आश्वासन दिले आणि बैठक संपुष्टात आली. (प्रतिनिधी)