शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

वस्त्रनगरी अतिक्रमणाच्या विळख्यात (भाग १)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST

मालिकेचे मुख्य लीड इचलकरंजी : दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या वस्त्रनगरीचे हळूहळू विद्रुपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी व अपघात घडत आहेत. ...

मालिकेचे मुख्य लीड

इचलकरंजी : दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या वस्त्रनगरीचे हळूहळू विद्रुपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी व अपघात घडत आहेत. त्यामुळे डिजिटल फलकमुक्त शहर केले. त्याप्रमाणेच अतिक्रमणमुक्त शहर करावे, अशी मागणी जोर धरत आहे. परंतु नगरपालिकेला याचे काहीच सोयरसुतक राहिले नाही. परिणामी नगरपालिकेच्या अशा ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरात मोठ्या इमारतींचे तळमजले पार्किंगऐवजी इतर वापरात, अनावश्यक फूटपाथ, फूटपाथवर पथविक्रेत्यांचे अतिक्रमण, मुव्हेबल गाळ्यांच्या नावे झालेली अतिक्रमणे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालले आहेत. त्यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका देत आहोत...

मोठमोठ्या इमारतींचा तळमजला पार्किंगऐवजी इतर वापरासाठी

मुख्य रस्त्यालगत पार्किंगचा बोजा

अतिक्रमणामुळे वस्त्रनगरीचे होत आहे विद्रुपीकरण

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर वेळीच कठोर निर्णय घेणे आवश्यक असताना नगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे महापुरुषांचे पुतळे व परिसर नूतनीकरण करून शहराचे सुशोभीकरण करत असल्याचे सांगितले जाते, परंतु अतिक्रमणाच्या विळख्यामुळे सुशोभीकरणाऐवजी विद्रुपीकरण सुरू झाले आहे. अनेक मिळकतधारक व वाणिज्य वापरासाठीच्या इमारती बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून बांधकाम करीत आहेत. पार्किंगसाठीचे तळमजले व जागा अतिक्रमण करून बांधकाम केल्याने रस्त्यावर पार्किंगचा ताण वाढत आहे.

शहरातील मुख्य मार्गासह मध्यवर्ती ठिकाणांलगत उभारण्यात आलेल्या मोठमोठ्या इमारतींचे पार्किंगच्या नावाखाली बेसमेंट (तळमजला) खुदाई करून त्याची मोठ्या प्रमाणात मुरूम विक्री करून तेथे पार्किंगऐवजी गोडावून, हॉल करून ते भाड्याने देण्यात आले आहे. तसेच त्या इमारतींमधील वरील दोन-तीन मजलेही वाणिज्य वापरासाठी विविध दुकाने, शोरूम यांना भाड्याने देऊन चांगले अर्थार्जन करण्याचा उद्योग फार्मात सुरू झाला आहे. परंतु त्या सर्व दुकानगाळ्यांचे पार्किंग त्या इमारतींभोवती असलेल्या मुख्य मार्गावरच केले जाते. ग्राहकही रस्त्यालगत वाहने पार्किंग करून दुकानात जातात. त्यामुळे शहरातील सर्व वर्दळींच्या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली असते. अशा ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसही नसतात. त्यामुळे वाहनधारकच वादावादी करत हॉर्न वाजवत मार्ग काढून निघून जातात. या प्रकारांमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चौकट

तक्रार आल्यास चर्चेतून तोडगा

अशा बेकायदेशीर उत्खननाबाबत अथवा बांधकामाबाबत नगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर ‘चर्चेतून मार्ग’ काढणारी एक कारभाऱ्यांची टोळी कार्यरत असते. ज्याप्रमाणे चर्चा करून हा प्रश्न सोडविला जाऊ शकतो, तो प्रकार वापरून संबंधिताला मार्ग काढून दिला जातो. या गंभीर प्रश्नांवर अनेक सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्रे वेळोवेळी आवाज उठवितात. मात्र, त्याकडेही निर्लज्जपणे दुर्लक्ष करून सोडून दिले जाते.

(फोटो ओळी)

१६१२२०२०-आयसीएच-०३

१६१२२०२०-आयसीएच-०४

इचलकरंजीत अशा अनेक व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्याचे पार्किंग रस्त्यावरच केले जाते.

(छाया - उत्तम पाटील)