शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल फलकांवरून तणाव

By admin | Updated: October 20, 2015 00:14 IST

इचलकरंजीचा प्रकार : उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांच्या समर्थकांत वाद, उपअधीक्षकांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

इचलकरंजी : शहरात अनधिकृत डिजिटल फलकांमुळे निर्माण होणाऱ्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहापूर परिसरात लावलेल्या फलकांवरून उपनगराध्यक्ष रणजित जाधव व माजी नगरसेवक उदयसिंह पाटील या दोघांमध्ये निर्माण झालेल्या वादाने तेथे तणाव निर्माण झाला होता. दोघांच्या समर्थकांचा जमाव समोरासमोर आल्याने स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. याबाबत नगरपालिका व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, नगरपालिकेने अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत फलकांच्या विरोधात मोहीम सोमवारी सकाळपासून चालू केली. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळील एक लोखंडे खोके जप्त केले. त्यानंतर सुंदरबागेजवळील एका नगरसेवकाच्या छबीचे डिजिटल फलक जप्त केले. शिवाजी पुतळा चौकात असलेल्या एका सभापतीकडून शुभेच्छा देणारे फलक काढून टाकले. त्यानंतर हे पथक सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहापूर येथे गेले असताना तेथील माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांचा डिजिटल फलक हलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा पाटील यांचे समर्थक तेथे जमले व त्यांनी फलक हलविण्यास मज्जाव केला, तर तिथून जवळच असलेले उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांचे अनधिकृत फलक हलविण्याची मागणी केली. हा प्रकार समजताच जाधव यांचेही समर्थक तेथे जमले. त्यांनी परस्परांचे फलक हटविण्याची मागणी केली. यामुळे घटनास्थळी वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला. तेथे मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली. त्यामुळे शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार व उपअधीक्षक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक नरळे यांनी हस्तक्षेप करून दोघांचेही फलक उतरले जातील, असे सांगितले. त्याप्रमाणे अनधिकृत फलक उतरल्यानंतर तेथील दोन्ही समर्थक जमाव पांगले आणि तणावही निवळला. (प्रतिनिधी)हलगर्जी : अनधिकृत फलकांवर कारवाई नाहीशहरामध्ये यापूर्वी शुभेच्छा फलक लावण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. या प्रकारातून विक्रमनगरात खून झाल्याचा प्रकारही घडला आहे. अनधिकृत डिजिटल फलकांच्या विरोधात नगरपालिकांनी तत्परतेने कडक कारवाई करावी, अशा आशयाचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत. असे असतानाही इचलकरंजी नगरपालिकेकडून मात्र याबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.