शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

डिजिटल फलकांवरून तणाव

By admin | Updated: October 20, 2015 00:14 IST

इचलकरंजीचा प्रकार : उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांच्या समर्थकांत वाद, उपअधीक्षकांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

इचलकरंजी : शहरात अनधिकृत डिजिटल फलकांमुळे निर्माण होणाऱ्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहापूर परिसरात लावलेल्या फलकांवरून उपनगराध्यक्ष रणजित जाधव व माजी नगरसेवक उदयसिंह पाटील या दोघांमध्ये निर्माण झालेल्या वादाने तेथे तणाव निर्माण झाला होता. दोघांच्या समर्थकांचा जमाव समोरासमोर आल्याने स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. याबाबत नगरपालिका व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, नगरपालिकेने अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत फलकांच्या विरोधात मोहीम सोमवारी सकाळपासून चालू केली. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळील एक लोखंडे खोके जप्त केले. त्यानंतर सुंदरबागेजवळील एका नगरसेवकाच्या छबीचे डिजिटल फलक जप्त केले. शिवाजी पुतळा चौकात असलेल्या एका सभापतीकडून शुभेच्छा देणारे फलक काढून टाकले. त्यानंतर हे पथक सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहापूर येथे गेले असताना तेथील माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांचा डिजिटल फलक हलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा पाटील यांचे समर्थक तेथे जमले व त्यांनी फलक हलविण्यास मज्जाव केला, तर तिथून जवळच असलेले उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांचे अनधिकृत फलक हलविण्याची मागणी केली. हा प्रकार समजताच जाधव यांचेही समर्थक तेथे जमले. त्यांनी परस्परांचे फलक हटविण्याची मागणी केली. यामुळे घटनास्थळी वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला. तेथे मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली. त्यामुळे शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार व उपअधीक्षक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक नरळे यांनी हस्तक्षेप करून दोघांचेही फलक उतरले जातील, असे सांगितले. त्याप्रमाणे अनधिकृत फलक उतरल्यानंतर तेथील दोन्ही समर्थक जमाव पांगले आणि तणावही निवळला. (प्रतिनिधी)हलगर्जी : अनधिकृत फलकांवर कारवाई नाहीशहरामध्ये यापूर्वी शुभेच्छा फलक लावण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. या प्रकारातून विक्रमनगरात खून झाल्याचा प्रकारही घडला आहे. अनधिकृत डिजिटल फलकांच्या विरोधात नगरपालिकांनी तत्परतेने कडक कारवाई करावी, अशा आशयाचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत. असे असतानाही इचलकरंजी नगरपालिकेकडून मात्र याबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.