शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

खड्डे पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:14 IST

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.

ठळक मुद्देखड्डे पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टीअखेर पॅचवर्कच्या कामाला मिळाला मुहूर्त

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.शहरामध्ये असा कोणताही चौक नाही की तेथे खड्डे नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना वाहने चालविणे सोडाच, चालणेही जिकिरीचे झाले आहे. विविध पक्ष, संघटनांकडून महापालिकेला धारेवर धरण्यात येत आहे.

यानंतर आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी तातडीची बैठक घेऊन रस्ते त्वरित पॅचवर्क करण्याचे आदेश दिले. सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्येही आयुक्तांनी खराब रस्त्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्याचे समजते. यामुळे दुपारनंतर सर्व यंत्रणा कामाला लागली.पॅचवर्कचे काम सुरू केलेले रस्ते

  1. बिंदू चौक ते अयोध्या टॉकीज
  2. संभाजीनगर ते नंगीवली तालीम
  3. उमा टॉकीज परिसर
  4. धैर्यप्रसाद कार्यालय ते पितळी गणपती मंदिर

 

मुदतीपूर्वी खराब झालेल्या रस्त्यांचे गुरुवारपासून पॅचवर्कसततच्या पावसामुळे पॅचवर्कचे काम रखडले होते. बहुतांशी रस्ते ठेकेदाराला दिलेल्या मुदतीपूर्वीच खराब झाले आहेत. संबंधित ठेकेदारांना समज दिली असून, तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे १८ प्रमुख रस्ते खराब झाले असून, गुरुवार (दि. ७)पासून त्यांचे पॅचवर्क करण्यास सुरू होणार आहे.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

 

 

पॅचवर्क नको, नव्याने रस्ते करण्याची गरजशहरामध्ये आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महापूर आला. यामुळे रस्ते खराब झाले. महापालिकेने सध्या पॅचवर्क केले जात आहे. मात्र, काही दिवसाने पुन्हा रस्ते खराब होणार आहेत. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा नवीनच रस्ते करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.केंद्र, राज्य शासन आता तरी कोल्हापूरकडे लक्ष देणार कायमहापुरामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये रस्त्यांचाही समावेश आहे. शासनाकडून निधी मिळण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात करण्यात आली. त्यामुळे शासनाने आता तरी कोल्हापूरच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर