शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

खड्डे पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:14 IST

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.

ठळक मुद्देखड्डे पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टीअखेर पॅचवर्कच्या कामाला मिळाला मुहूर्त

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.शहरामध्ये असा कोणताही चौक नाही की तेथे खड्डे नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना वाहने चालविणे सोडाच, चालणेही जिकिरीचे झाले आहे. विविध पक्ष, संघटनांकडून महापालिकेला धारेवर धरण्यात येत आहे.

यानंतर आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी तातडीची बैठक घेऊन रस्ते त्वरित पॅचवर्क करण्याचे आदेश दिले. सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्येही आयुक्तांनी खराब रस्त्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्याचे समजते. यामुळे दुपारनंतर सर्व यंत्रणा कामाला लागली.पॅचवर्कचे काम सुरू केलेले रस्ते

  1. बिंदू चौक ते अयोध्या टॉकीज
  2. संभाजीनगर ते नंगीवली तालीम
  3. उमा टॉकीज परिसर
  4. धैर्यप्रसाद कार्यालय ते पितळी गणपती मंदिर

 

मुदतीपूर्वी खराब झालेल्या रस्त्यांचे गुरुवारपासून पॅचवर्कसततच्या पावसामुळे पॅचवर्कचे काम रखडले होते. बहुतांशी रस्ते ठेकेदाराला दिलेल्या मुदतीपूर्वीच खराब झाले आहेत. संबंधित ठेकेदारांना समज दिली असून, तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे १८ प्रमुख रस्ते खराब झाले असून, गुरुवार (दि. ७)पासून त्यांचे पॅचवर्क करण्यास सुरू होणार आहे.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

 

 

पॅचवर्क नको, नव्याने रस्ते करण्याची गरजशहरामध्ये आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महापूर आला. यामुळे रस्ते खराब झाले. महापालिकेने सध्या पॅचवर्क केले जात आहे. मात्र, काही दिवसाने पुन्हा रस्ते खराब होणार आहेत. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा नवीनच रस्ते करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.केंद्र, राज्य शासन आता तरी कोल्हापूरकडे लक्ष देणार कायमहापुरामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये रस्त्यांचाही समावेश आहे. शासनाकडून निधी मिळण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात करण्यात आली. त्यामुळे शासनाने आता तरी कोल्हापूरच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर