शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

मंदिर फलकावरून अंबाबाई नाव हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 18:20 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई हे नाव काढून टाकले आहे. देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबाबत आकस का आहे असा जाब मंगळवारी आई अंबाबाई भक्तांनी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना विचारला.

ठळक मुद्दे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला भक्तांनी विचारला जाबदेवीच्या नावाबाबत आकस आहे कादेवस्थान समितीने याबाबत तातडीने खुलासा करावा करवीरनिवासिनीतून उलट संभ्रमच...

कोल्हापूर,10 : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई हे नाव काढून टाकले आहे. देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबाबत आकस का आहे असा जाब मंगळवारी आई अंबाबाई भक्तांनी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना विचारला.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाई मंदिराच्या परिसरात तसेच चारही दरवाज्यांवर विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर अंबाबाई मंदिर तसेच महालक्ष्मी मंदिर असा उल्लेख आहे. मात्र देवस्थान समितीने लावलेल्या फलकांवर करवीरनिवासिनी देवस्थान असा उल्लेख करण्यात आला आहे.

अंबाबाई नावाला कधीच कोणाचीही हरकत नाही. सर्व प्रसारमाध्यमांनी देवीचा अंबाबाई असा उल्लेख केला. असे असताना देवीने नाव हटवण्यामागे शासनाच्या म्हणजेच देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबद्दल आकस का आहे असा प्रश्न पडतो.

उत्सव काळात मंदिराच्या नावलौकिकाला बाधा येवून नये व मंदिराची शांतता भंग होवू नये म्हणून या प्रकाराबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. देवस्थान समितीने याबाबत तातडीने खुलासा करावा आणि नाव पूर्वी होते तसेच अंबाबाई मंदिर करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बाबा पार्टे, सुशांत चव्हाण, अशोक पोवार, स.ना. जोशी, सुरेश साबळे, धनंजय चव्हाण, रघुनाथ गवळी, गौरव भागवत, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

करवीरनिवासिनीतून उलट संभ्रमच...आदिशक्ती स्वरुप असलेल्या देवीचा काही ठिकाणी महालक्ष्मी तर काही ठिकाणी अंबाबाई असा उल्लेख आहे. कोल्हापुरकरांनी देवीला अंबाबाई रुपात पूजले. आजही कोल्हापुरचे लोक अंबाबाई मंदिर म्हणूनच संबोधतात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कागदपत्रांवर करवीरनिवासनी असा उल्लेख असल्याने समितीकडून बदल करण्यात आला आहे.

करवीरनिवासिनी म्हणजे करवीरात निवास करणारी मात्र या शब्दातून हे मंदिर नेमके कोणत्या देवतेचे आहे हे समजत नाही. परस्थ भाविकांना किंवा जगभरातून येणाºया पर्यटकांना देवीचे मुळ स्वरुप कळण्याऐवजी ही नेमकी कोणती देवी असा संभ्रमच होणार आहे. त्यामुळे या शब्दाला विरोध होत आहे.