शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

सांगा, आम्ही जगायचं तरी कसं !

By admin | Updated: October 5, 2016 00:39 IST

उपचारासाठी डोलीतून प्रवास : पाठारचा धनगरवाडा मूलभूत सुविधांपासून वंचित

राजाराम कांबळे--मलकापूर -शाहूवाडी तालुक्यातील येळवणजुगाईपैकी पाठारचा धनगरवाडा येथे स्वातंत्र्याच्या सत्तरीतही कोणत्याच मूलभूत सुविधा पाहोचलेल्या नाहीत. अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच रस्ते, वाहतुकीच्या सुविधा पोहोचल्या नसल्याने रुग्णाला उपचारासाठी डोलीतून न्यावे लागत आहे. सांगा आम्ही जगायचे कसं? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारत आहेत.शाहूवाडी तालुका १४१ गावे व २५० वाड्यावस्त्यांतून विभागला आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई पैकी पाठारचा धनगरवाडा डोंगरकपारीत वसला आहे. या वाड्यावर सुमारे पंचवीस कुटुंबे राहत आहेत. आजपर्यंत त्यांना शासनाच्या मूलभूत सुविधांचा लाभ झालेला नाही. वाड्यावर जायला रस्ता नाही, जंगलातून नागरिकांना व शाळकरी मुलांना प्रवास करावा लागतो. मुलांना शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई येथे जावे लागते. गेले चार महिने वाड्यावर लाईट नाही. पाणी योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था आहे. ओढ्याच्या दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. लाईट नसल्यामुळे शालेय मुलांना रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागतो.पाचवीपर्यंत शाळा असूनदेखील शासनाच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली आहे. नागरिकांना उपचारासाठी डोलीतून दहा किलोमीटर मांजरे दवाखान्यात न्यावे लागते. उपचाराअभावी येथील चार ते पाच माणसे दगावली आहेत. पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही, रोजगाराच्या संधी नाहीत. तरुणांना मुंबई, पुणे येथे पोटाची खळगी भरण्यासाठी जावे लागते.नागरिक जंगलातील औषधी वनस्पती, करवंदे, आळू, जांभूळ, आदी रानमेवा विकून आपली गुजराण करीत आहेत. पावसाळ्यात लागण केलेली भातशेती जंगली प्राणी फस्त करीत आहेत. निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडण्यासाठी नेतेमंडळी भेट देतात. अठरा विश्वे दारिद्र्य घेऊन आम्ही जन्माला आलो ही आमची चूक आहे का? आम्हाला नाहीतर आमच्या मुलाबाळांना तरी शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. पाठारचा धनगरवाडा, माणेचा धनगरवाडा, मालाईचा धनगरवाडा या तीन धनगरवाड्यांवर अशी अवस्था आहे.शासनाने आमची दखल घेतली नाही, तर येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकणार.- राया विठू कस्तुरे