शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

सांगा, आम्ही जगायचं तरी कसं !

By admin | Updated: October 5, 2016 00:39 IST

उपचारासाठी डोलीतून प्रवास : पाठारचा धनगरवाडा मूलभूत सुविधांपासून वंचित

राजाराम कांबळे--मलकापूर -शाहूवाडी तालुक्यातील येळवणजुगाईपैकी पाठारचा धनगरवाडा येथे स्वातंत्र्याच्या सत्तरीतही कोणत्याच मूलभूत सुविधा पाहोचलेल्या नाहीत. अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच रस्ते, वाहतुकीच्या सुविधा पोहोचल्या नसल्याने रुग्णाला उपचारासाठी डोलीतून न्यावे लागत आहे. सांगा आम्ही जगायचे कसं? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारत आहेत.शाहूवाडी तालुका १४१ गावे व २५० वाड्यावस्त्यांतून विभागला आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई पैकी पाठारचा धनगरवाडा डोंगरकपारीत वसला आहे. या वाड्यावर सुमारे पंचवीस कुटुंबे राहत आहेत. आजपर्यंत त्यांना शासनाच्या मूलभूत सुविधांचा लाभ झालेला नाही. वाड्यावर जायला रस्ता नाही, जंगलातून नागरिकांना व शाळकरी मुलांना प्रवास करावा लागतो. मुलांना शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई येथे जावे लागते. गेले चार महिने वाड्यावर लाईट नाही. पाणी योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था आहे. ओढ्याच्या दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. लाईट नसल्यामुळे शालेय मुलांना रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागतो.पाचवीपर्यंत शाळा असूनदेखील शासनाच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली आहे. नागरिकांना उपचारासाठी डोलीतून दहा किलोमीटर मांजरे दवाखान्यात न्यावे लागते. उपचाराअभावी येथील चार ते पाच माणसे दगावली आहेत. पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही, रोजगाराच्या संधी नाहीत. तरुणांना मुंबई, पुणे येथे पोटाची खळगी भरण्यासाठी जावे लागते.नागरिक जंगलातील औषधी वनस्पती, करवंदे, आळू, जांभूळ, आदी रानमेवा विकून आपली गुजराण करीत आहेत. पावसाळ्यात लागण केलेली भातशेती जंगली प्राणी फस्त करीत आहेत. निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडण्यासाठी नेतेमंडळी भेट देतात. अठरा विश्वे दारिद्र्य घेऊन आम्ही जन्माला आलो ही आमची चूक आहे का? आम्हाला नाहीतर आमच्या मुलाबाळांना तरी शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. पाठारचा धनगरवाडा, माणेचा धनगरवाडा, मालाईचा धनगरवाडा या तीन धनगरवाड्यांवर अशी अवस्था आहे.शासनाने आमची दखल घेतली नाही, तर येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकणार.- राया विठू कस्तुरे