शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रावर राजकीय नजर, नांदेडला उद्या मेळावा; नेतृत्वाचा शोध

By विश्वास पाटील | Updated: February 4, 2023 11:35 IST

संभाजीराजेही कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे

विश्वास पाटीलकोल्हापूर : भारत राष्ट्र समिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीही सक्षम नेतृत्वाचा शोध त्यांच्याकडून सुरू आहे. माजी खासदार संभाजीराजे यांना त्याच हेतूने चर्चेसाठी हैदराबादला बोलवले होते, असे समजते.मुख्यमंत्री राव यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला मेळावा येत्या रविवारी (दि. ५ फेब्रुवारी) नांदेड येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी जनमानसांत स्थान असलेल्या नेत्याचा शोध सुरू आहे. देशाच्या राजकारणात भाजपच्या विरोधात व काँग्रेसला पर्यायी आघाडी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी तेलंगणाच्या सीमेवरील कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रदेश तेलंगणाचा आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री राव यांनी गेल्या आठ वर्षांत एक कोरडवाहू राज्य ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले राज्य अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मुख्यत: शेती, सिंचन या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणून तेथील शेतकऱ्याचे जीवनमान बदलून टाकले आहे. त्यांचे सरकार शेतकऱ्यांना सरसकट एकरी दहा हजार रुपये तोट्याच्या शेतीबद्दल अनुदान देते. त्यामध्ये कोणतेही स्लॅब नाहीत. 

अठरा ते साठ वर्षांपर्यंतचा शेतकरी मृत झाला तर त्याला पाच लाखांचा विमा संरक्षण मिळते. त्याचा हप्ता तेलंगणा सरकार भरते. अशा अनेक योजनांमुळे त्यांनी तेलंगणामध्येही पक्षीय पकड मजबूत केली आहे. शेती, सहकार, साखर कारखानदारीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, सत्तेवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच शेतीशी आणि चळवळीशी संबंधित नेतृत्वच त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून हवे आहे.दोन नवे भिडू...प्रस्थापित पक्षांसोबतच आता भारत राष्ट्र समिती व आप हे दोन नवे भिडू महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात उतरू पाहत आहेत. या दोघांत साम्य हे आहे की त्यांनी आपापल्या राज्यात चांगले काम करून दाखविले आहे व तो पॅटर्न घेऊन ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ पाहत आहेत.संभाजीराजे यांची अडचणराव यांच्याकडून महाराष्ट्रातील जनमानसांत स्थान असलेल्या नेत्यांशी संपर्क सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांना त्यांनी भेटीसाठी बोलविले होते. संभाजीराजेही हैदराबादला जाऊन आले आहेत. ते आता कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे. राव यांची भाजपला टोकाचा विरोध ही देशपातळीवरील राजकीय दिशा आहे. संभाजीराजे यांची भूमिका मात्र अजूनही भाजपपासून फार लांब जाण्याची किंवा त्या पक्षाला अंगावर घेण्याची दिसत नाही. ही एक अडचण ते एकत्र येण्यात येऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती