शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

शिक्षक संघात मानापमान नाट्यातून फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:29 IST

कोल्हापूर : शिक्षकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आल्याची घोषणा करणारे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्यात दोन दिवसांत मानापमान नाट्य सुरू झाले आहे. गोव्यात होणाºया राष्टÑीय अधिवेशनावरून दोन्ही नेत्यांत मतभेद सुरू झाले असून, रविवारी कोल्हापुरात होणाºया महामंडळ सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय थोरात यांनी घेतल्याने ...

कोल्हापूर : शिक्षकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आल्याची घोषणा करणारे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्यात दोन दिवसांत मानापमान नाट्य सुरू झाले आहे. गोव्यात होणाºया राष्टÑीय अधिवेशनावरून दोन्ही नेत्यांत मतभेद सुरू झाले असून, रविवारी कोल्हापुरात होणाºया महामंडळ सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय थोरात यांनी घेतल्याने पाटील यांनी येलूर (ता. वाळवा) येथे सभा घेतल्याने दोन्ही नेत्यांतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.महाराष्टÑातील शिक्षक संघटनांमधील सर्वांत ताकदवान संघटना म्हणून प्राथमिक शिक्षक संघाकडे पाहिले जाते. या संघटनात्मक ताकदीच्या बळावर शिक्षकांच्या प्रश्नांवर सत्ताधाºयांना वाकविण्याचे काम केले. शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुतांशी शिक्षकांची मोट बांधून सरकारवर एक दबाव ठेवला होता. त्याचे फळ म्हणून पाटील यांना आमदारकी मिळाली होती; पण संघात नवीन नेतृत्व तयार होत गेले तसे पाटील यांची संघटनेवरील पकड ढिली होत गेली. काळानुरूप गुरुजींच्या वेतनश्रेणीत सुधारणा झाली आणि संघटनेकडे मोठ्या प्रमाणात निधी गोळा होऊ लागला. प्रमुख शहरात संघाच्या मालमत्ता उभ्या राहिल्या आणि यातूनच संघात ठिणगी पडली. शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात या दोन नेत्यांत संघाची फाळणी झाली. मध्यंतरी अनेकवेळा दोन नेत्यांत मनोमिलन झाले; पण ते फारकाळ टिकले नाही.मध्यंतरी दोघांनी एकत्र येऊन पुन्हा संघाची बांधणी करावी, असे प्रयत्न झाले. पुणे येथे झालेल्या बैठकीत पाटील व थोरात यांनी एकसंधपणे काम करण्याचा निर्णय घेतला. मालमत्तेचा विषय सामंजस्याने मिटविण्यावर एकमत झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्यावतीने गोव्यात महाअधिवेशन घेण्याचा निर्णयही झाला. त्यानुसार पाटील व थोरात यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन शिक्षकांच्या भल्यासाठी एकत्र आल्याचे जाहीर केले होते.गोवा महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापुरात एकसंधपणे महामंडळ सभा घेतली जाणार होती. शिक्षकांना अद्याप रजा मंजूर नसताना महामंडळ सभा घेऊन अधिवेशनाची तयारी करणे चुकीचे असल्याचे थोरात यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून दोघांत दुरावा झाला आणि पाटील यांच्या गटाने येलूर येथे सभा घेतल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे.पवार यांची शिष्टाईही व्यर्थशिक्षक संघाने नेहमीच राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साथ दिली. त्यामुळे संघाच्या फुटीचा फटका राष्टÑवादीला बसला होता. माजी मंत्री जयंत पाटील यांनी मनोमिलनासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. गेल्या महिन्यात जवाहर साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी आले असताना खुद्द शरद पवार यांनी पाटील व थोरात यांना एकत्र राहण्याचा सल्ला देत शिष्टाई केली होती.पुन्हा पैशांसाठीच भांडण?रजेचे कारण पुढे केले असले तरी खरे कारण पैशांचे आहे. महाअधिवेशन त्यातून जमा होणाºया पैशाचा विनियोग कसा व कोण करायचा? हा खरा मुद्दा आहे. वर्गणीचे पैसे राज्य, जिल्हा व तालुक्यासाठी किती व देशपातळीवरील संघटनेसाठी किती यावरूनच दोन नेत्यांत भांडण झाल्याचे समजते.मगच मी मरणार...येलूर येथील सभेत शिवाजीराव पाटील यांनी आक्रमक भाषण केले. मोठ्या हिमतीने संघाची ताकद वाढविली. काही मंडळी माझ्या मरणाची वाट पाहत आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आपण मरणार नाही, असा टोला त्यांनी थोरात यांचे नाव न घेता लगावत आपली दिशा स्पष्ट केली. पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोरात यांनी काम करावे, ते आले तर ठीक, अन्यथा त्यांना सोडून महाअधिवेशनाचे नियोजन करा, असा आग्रह पदाधिकाºयांचा होता.