शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तावडे हॉटेलप्रश्नी कायद्याची पायमल्ली : दिलीप देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:01 IST

कोल्हापूर : शासनाने निर्माण केलेले कायदे, प्रसिद्ध केलेली परिपत्रके यांची तावडे हॉटेल परिसरप्रश्नी शासनाकडूनच पायमल्ली होत असल्याचा आरोप करत कायदे पाळायचे नसतील

कोल्हापूर : शासनाने निर्माण केलेले कायदे, प्रसिद्ध केलेली परिपत्रके यांची तावडे हॉटेल परिसरप्रश्नी शासनाकडूनच पायमल्ली होत असल्याचा आरोप करत कायदे पाळायचे नसतील तर महापालिका बरखास्त करून सर्व कामकाज राज्य सरकारने पाहावे, असे आवाहन प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

देसाई म्हणाले, शहरात अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असताना तावडे हॉटेल परिसरातील धनदांडग्यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामधारकांवर कायद्याने गुन्हे नोंदविणे क्रमप्राप्त असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नोटिसा रद्दबादल ठरवून बांधकामांना परवानगी देत आहेत. शासनानेच निर्माण केलेल्या कायद्यात शासन ढवळाढवळ करीत असेल तर महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी देसाई यांनी केले.वळवींच्या कार्यकाळातील सनदी रद्द करासेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या सन २००४ ते २००८ या कार्यकाळातील किरकोळ अर्ज, औद्योगिक वापरास परवानगी, बिनशेती एस.आर. असे आदेश दिले; पण एकाच क्रमांकाचे दोन, एकाच गटाचे दोन आदेश अथवा खरी नक्कल असे खोटे शिक्के मारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दस्त नोंदविण्यात आले. त्यामुळे या कालावधीतील दस्त नोंदवू नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तावडे हॉटेल परिसरात अनेक परवानग्याही त्यांनीच दिल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगून वळवी यांनी दिलेल्या सनदी रद्द कराव्यात, अशी मागणी देसाई यांनी केली.