लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : महामानवांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केले. सर्वांची एकजूट ठेवली; मात्र प्रस्थापित व्यवस्था व राज्यकर्त्यांनी सोयीसाठी महामानवांना जातिबंधनात अडकविण्याचे काम केले, असा घणाघात बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी केला.
येथील बंडखोर सेना पक्षाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने शपथ परिषद घेण्यात आली.
यावेळी आवळे पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळातील सामान्य जनतेची वीज बिले माफ करून दिलासा देण्याची गरज आहे. याउलट नोटीस न देता गोरगरिबांची वीज पुरवठा खंडित करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.
शिवाली आवळे यांनी प्रास्ताविक केले, तर योगिता बागे यांनी आभार मानले.
यावेळी भीमराव साठे, दगडू माने, इंदुताई कोरपाळे, सुभाष शिलेवंत, सुशांत दिगे, चंद्रकांत वाकसे, प्रकाश काशीळकर, सूर्यकांत हजारे, रामचंद्र बेलेकर यांची भाषणे झाली.
फोटो ओळ : पेठवडगाव : येथील बंडखोर सेनेच्या वतीने शपथ परिषद बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी संबोधित केले. शेजारी भीमराव साठे, दगडू माने, इंदुताई कोरपाळे, सुभाष शिलेवंत, सुशांत दिगे, आदी उपस्थित होते.