शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

पंधराशे रुपयाला पाण्याचा एक टँकर

By admin | Updated: May 25, 2017 00:10 IST

शाहूवाडीतील आंबर्डेत पाणीटंचाई : नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ; आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे गावातील नागरिक व महिला यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावातील नागरिकांना पंधराशे रुपये पाण्याचा टँकर, तर दोनशे रुपये पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. शासनाच्या तहसील व पंचायत समिती कार्यालयात निवेदन देऊनदेखील दखल घेतलेली नाही. ग्रामस्थ व महिला जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आंबर्डे गाव आहे. या गावात चार वाड्या व दोन धनगरवाडे मिळून गाव वसले आहे. गावची लोकसंख्या २७०० एवढी आहे. गावातील नागरिकांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४९ लाख रुपयांची पाणी योजना बांधली होती. मात्र, ठेकेदाराने सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे योजना बंद आहे. डोंगरातून सायफन पद्धतीच्या योजनेचे गाव पाणी पित होते; मात्र या योजनेचे पाणी कमी झाले आहे.आंबर्डे गावासह करपेवाडी, वाणेवाडी, रणवरेवाडी, आंबेवाडी आदींसह दोन धनगरवाडे यांचा समावेश आहे. गावासाठी दोन पाणी योजना असूनदेखील एक नादुरुस्त, तर दुसरी पाणी कमी झाल्यामुळे बंद आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तरीदेखील पिण्याचे पाणी मिळत नाही. गेले पंधरा दिवस गावात पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना दररोज पंधराशे रुपये मोजून पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे. दोनशे रुपयांना पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांना निवेदने : तरीही दखल नाही१ धनगरवाडे, वाड्या-वस्त्यांतील नागरिकांना पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावर वणवण भटकावे लागत आहे. धनगरवाड्यावरील नागरिक व महिला यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. या नागरिकांना उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवत आहे.२ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय यांना वेळोवेळी निवेदने देऊनदेखील संबंधित अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही. ३ शासनाने तहसील कार्यालय यांना पाणीटंचाई असणाऱ्या गावात पाण्याचे टँकर पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील लाल फितीच्या कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. शासनाच्या संबंधित विभागाने आमची दखल घेतली नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशारा सरपंच लक्ष्मी भोसले यांनी दिला आहे.गेले आठ दिवस शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदने देऊनही आमची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार. - सूर्यकांत पाटील, माजी सरपंच