शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पंधराशे रुपयाला पाण्याचा एक टँकर

By admin | Updated: May 25, 2017 00:10 IST

शाहूवाडीतील आंबर्डेत पाणीटंचाई : नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ; आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे गावातील नागरिक व महिला यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावातील नागरिकांना पंधराशे रुपये पाण्याचा टँकर, तर दोनशे रुपये पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. शासनाच्या तहसील व पंचायत समिती कार्यालयात निवेदन देऊनदेखील दखल घेतलेली नाही. ग्रामस्थ व महिला जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आंबर्डे गाव आहे. या गावात चार वाड्या व दोन धनगरवाडे मिळून गाव वसले आहे. गावची लोकसंख्या २७०० एवढी आहे. गावातील नागरिकांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४९ लाख रुपयांची पाणी योजना बांधली होती. मात्र, ठेकेदाराने सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे योजना बंद आहे. डोंगरातून सायफन पद्धतीच्या योजनेचे गाव पाणी पित होते; मात्र या योजनेचे पाणी कमी झाले आहे.आंबर्डे गावासह करपेवाडी, वाणेवाडी, रणवरेवाडी, आंबेवाडी आदींसह दोन धनगरवाडे यांचा समावेश आहे. गावासाठी दोन पाणी योजना असूनदेखील एक नादुरुस्त, तर दुसरी पाणी कमी झाल्यामुळे बंद आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तरीदेखील पिण्याचे पाणी मिळत नाही. गेले पंधरा दिवस गावात पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना दररोज पंधराशे रुपये मोजून पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे. दोनशे रुपयांना पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांना निवेदने : तरीही दखल नाही१ धनगरवाडे, वाड्या-वस्त्यांतील नागरिकांना पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावर वणवण भटकावे लागत आहे. धनगरवाड्यावरील नागरिक व महिला यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. या नागरिकांना उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवत आहे.२ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय यांना वेळोवेळी निवेदने देऊनदेखील संबंधित अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही. ३ शासनाने तहसील कार्यालय यांना पाणीटंचाई असणाऱ्या गावात पाण्याचे टँकर पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील लाल फितीच्या कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. शासनाच्या संबंधित विभागाने आमची दखल घेतली नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशारा सरपंच लक्ष्मी भोसले यांनी दिला आहे.गेले आठ दिवस शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदने देऊनही आमची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार. - सूर्यकांत पाटील, माजी सरपंच