शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मळी वाहतूक परवान्यासाठी टनाला ५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:46 IST

कोपार्डे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई मळी नियम १९५५ अंतर्गत नियम १३(१)१५(१)व १९(१)मध्ये केलेल्या सुधारणांचे परिपत्रक सर्वच साखर कारखान्यांना पाठवण्यात आले असून, यामध्ये मळी वाहतूक परवाना शुल्क (ट्रान्स्पोर्ट परमिशन) म्हणून आकारण्यात येणारे प्रतिटन एक रुपया शुल्क तब्बल पाचशे पट वाढवून प्रतिटन ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून या ...

कोपार्डे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई मळी नियम १९५५ अंतर्गत नियम १३(१)१५(१)व १९(१)मध्ये केलेल्या सुधारणांचे परिपत्रक सर्वच साखर कारखान्यांना पाठवण्यात आले असून, यामध्ये मळी वाहतूक परवाना शुल्क (ट्रान्स्पोर्ट परमिशन) म्हणून आकारण्यात येणारे प्रतिटन एक रुपया शुल्क तब्बल पाचशे पट वाढवून प्रतिटन ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून या सुधारित परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या फतव्याने साखर कारखानदारांत खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. पैकी २१ कारखान्यांकडून दोन, सव्वा दोन लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात येते. या गाळपातून साखरेबरोबरच उपउत्पादन मळी निर्माण होते. एक टन ऊसगाळपापासून सर्वसाधारण १२ टक्के सरासरी उताºयाप्रमाणे १२० किलो साखर तर ४ टक्के म्हणजे ४० किलो मळी (मोलॅसिस) निर्माण होते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून दोन सव्वा दोन कोटी उसाचे गाळप होते.यातून ४ टक्के मळीला मिळणाºया सरासरी उताºयाप्रमाणे आठ ते नऊ लाख टन मळीची निर्मिती होते. या मळीच्या वाहतूक परवानगीसाठी शुल्क आकारले जाते. ते प्रतिटन एक रुपया होते. यात सुधारणा करत मुंबई मळी नियम १९५५ अंतर्गत नियम १९(१)मधील नमुना एस-६ मळी वाहतुकीच्या परवानगीकरिता प्रति मे.टन ५०० रुपये शुल्क आकारण्यात यावे.तसेच आयात व निर्यात होणाºया मळीची वाहतूक करताना ५०० रुपये प्रति मे.टन इतके अतिरिक्त वाहतूक शुल्क (नमुना ए-६) आकरण्यात यावे. ही अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली असली तरी या अगोदर मळीच्या आयात निर्यातीला परवानगी दिलेली असेल आणि उचल १ नोव्हेंबरपासून सुरु केली असली तरी प्रतिटन वाहतूक शुल्क ५०० रुपये भरावे लागणार आहेत.जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून निर्माण होणाºया आठ लाख टन मळीसाठी पूर्वी एक रुपयाप्रमाणे ५-८ लाख रुपये वाहतूक परवाना शुल्क भरावे लागत होते. आता नवीन सुधारित परिपत्रकाप्रमाणे हे शुल्क ५०० रुपये केल्याने ४० कोटी रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे कारखानदारांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.व्हँटचे उत्पन्न भरून काढण्यासाठी शासनाचा फंडा१ जीएसटी पूर्वी केंद्र शासनाला एक्साईज ड्युटी तर राज्य सरकारला २० टक्के व्हॅट मिळत होता. जर ५ हजार प्रतिटन मळीचा दर असेल तर २० टक्के प्रमाणे ११५० रुपये राज्य सरकारला मिळत होते.२ पण जीएसटी आल्यानंतर व्हॅट बंद झाला असून २८ टक्के जीएसटीप्रमाणे होणारा १४०० रुपये करापैकी ५० टक्के राज्य शासनाच्या हिश्श्याप्रमाणे ७०० रुपये मिळाले तरी व्हॅटपेक्षा ४५० रुपये कमी मिळतात.३ हे बुडणारे उत्पन्न भरून काढण्यासाठीच मळी वाहतूक परवाना शुल्कात वाढ करून बडगा उगारल्याचे या उद्योगातील एका तज्ञाने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :agricultureशेती