शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

श्रीक्षेत्र आदमापूर येथे बाळूमामाच्या भंडारा यात्रेत घेतला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 19:25 IST

महाराष्ट्र तसेच  कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता.भुदरगड)  येथे सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेत शनिवार (दि. ६)रोजी हजारो  भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बाजीराव जठार वाघापूर : महाराष्ट्र तसेच  कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता.भुदरगड)  येथे सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेत शनिवार (दि. ६)रोजी हजारो  भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी ११ टन तांदूळ, ५ टन गहू व ४ टन गूळ, डाळी, अशा एकूण २० टन धान्यांचा वापर करण्यात आला.  देवस्थान प्रशासनाने एकूण तेरा काहिलीचा प्रसाद तयार केला होता.

प्रारंभी मानकरी कर्णसिंह भोसले, कृष्णात डोणे यांच्या हस्ते महाप्रसादावर भंडारा व दूध अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद सुरू करण्यात आला. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसाद वाटपाचे आणि घेण्याचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला. उन्हापासून भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी भव्य मंडप घालण्यात आला होता. प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्तांना प्रसाद घरी नेण्यासाठी   स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली होती. स्वतंत्र दोन काहीली ठेवून भांड्यामध्ये घरी नेण्यासाठी प्रसाद दिला जात होता. संध्याकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता.

बिद्री साखर कारखाना,हमीदवाडा साखर कारखाना, गोकुळ दुध संघ व स्वयंसेवी संस्था व आदमापूर गावातील व भागातील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तर मुरगूड नगरपालिका यांचेकडून फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली होती.स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट प्रसाद वाटपामुळे गोंधळ झाला नाही.

तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलिस निरीक्षक सचिन पाटील,गटविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्धन, आरटीओ स्नेहा देसाई,ग्रामसेवक बोंगार्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख डी.एस.मिरजकर,भुदरगड एस.टी.आगार प्रमुख प्रशांत नाईक ,राधानगरी आगाराचे विकास वर्णे,देवस्थान प्रशासकीय समिती सदस्य रागिणी खडके, शिवराज नायकवडी, ग्रामस्थ यांच्या नेटक्या नियोजनामुळे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला.