शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ रस्त्याप्रश्नी आठवड्यात बैठक घेऊ: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:58 IST

उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देविमानतळ रस्त्याप्रश्नी आठवड्यात बैठक घेऊ: जिल्हाधिकारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूरविमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिले. यावेळी आ. सतेज पाटील व कृती समितीचे अध्यक्ष नारायण पोवार म्हणाले, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी हा रस्ता विस्तारीकरणासाठी समाविष्ट झाला आहे. याला पर्यायी मार्ग हा गोकुळ शिरगावच्या हद्दीतील जमिनीच्या काही गटांमधून देण्यात आला आहे. हा रस्ता अव्यवहार्य आहे. कारण पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४ वर गोकुळ शिरगाव हद्दीत कोंडुस्कर पेट्रोल पंप व सुदर्शन पेट्रोल पंप यांच्यामध्ये निघतो.

हा मार्ग ज्या ठिकाणी महामार्गाशी संलग्न होतो. तेथून कोल्हापूरकडे जाण्याकरीता मयूर पेट्रोल पंपाच्या भुयारी मार्गापर्यंत विरुध्द व चुकीच्या दिशेने ७०० मीटरपर्यंत गोकुळ शिरगावकडे जाताना ओढ्याच्या सेवा रस्त्यावरील पुलावरुन जाणारा आहे.

हा पुल जुना ब्रिटीशकालिन असून त्याची वैधताही संपली आहे. तसेच त्याचा आकार हा वक्राकार असल्याने व उंचीची वाहने येथून जाऊ शकत नसल्याने ते त्रासदायक होणार आहे. त्यामुळे नेर्ली, तामगाव रस्ता व गोकुळ शिरगाव हद्दीत मयूर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्ग जोडून मिळावा.यावर जिल्हाधिकारऱ्यांनी आठवड्यात बैठक घेऊन या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. तसेच या प्रशनावर संबंधित अभियंत्याशीही चर्चा करु असेही त्यांनी सांगितले.त्याचबरोबर विमानळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने नोकरी द्यावी, शेतकऱ्यांना विमानतळ प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा अशा विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.यावेळी समितीचे निमंत्रक राजू माने, प्रकाश् पाटील, तम्मा शिरोळे, सर्जेराव मिठारी, भैरु केसरकर, शशिकांत खोत, मोहन खोत, संजय चौगले, हंबीरराव पाटील, अजित पाटील, शितल खोत, मधुकर कांबळे, यांच्यासह नेर्ली,तामगाव, हालसवडे, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर