शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

विमानतळ रस्त्याप्रश्नी आठवड्यात बैठक घेऊ: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:58 IST

उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देविमानतळ रस्त्याप्रश्नी आठवड्यात बैठक घेऊ: जिल्हाधिकारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूरविमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिले. यावेळी आ. सतेज पाटील व कृती समितीचे अध्यक्ष नारायण पोवार म्हणाले, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी हा रस्ता विस्तारीकरणासाठी समाविष्ट झाला आहे. याला पर्यायी मार्ग हा गोकुळ शिरगावच्या हद्दीतील जमिनीच्या काही गटांमधून देण्यात आला आहे. हा रस्ता अव्यवहार्य आहे. कारण पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४ वर गोकुळ शिरगाव हद्दीत कोंडुस्कर पेट्रोल पंप व सुदर्शन पेट्रोल पंप यांच्यामध्ये निघतो.

हा मार्ग ज्या ठिकाणी महामार्गाशी संलग्न होतो. तेथून कोल्हापूरकडे जाण्याकरीता मयूर पेट्रोल पंपाच्या भुयारी मार्गापर्यंत विरुध्द व चुकीच्या दिशेने ७०० मीटरपर्यंत गोकुळ शिरगावकडे जाताना ओढ्याच्या सेवा रस्त्यावरील पुलावरुन जाणारा आहे.

हा पुल जुना ब्रिटीशकालिन असून त्याची वैधताही संपली आहे. तसेच त्याचा आकार हा वक्राकार असल्याने व उंचीची वाहने येथून जाऊ शकत नसल्याने ते त्रासदायक होणार आहे. त्यामुळे नेर्ली, तामगाव रस्ता व गोकुळ शिरगाव हद्दीत मयूर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्ग जोडून मिळावा.यावर जिल्हाधिकारऱ्यांनी आठवड्यात बैठक घेऊन या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. तसेच या प्रशनावर संबंधित अभियंत्याशीही चर्चा करु असेही त्यांनी सांगितले.त्याचबरोबर विमानळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने नोकरी द्यावी, शेतकऱ्यांना विमानतळ प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा अशा विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.यावेळी समितीचे निमंत्रक राजू माने, प्रकाश् पाटील, तम्मा शिरोळे, सर्जेराव मिठारी, भैरु केसरकर, शशिकांत खोत, मोहन खोत, संजय चौगले, हंबीरराव पाटील, अजित पाटील, शितल खोत, मधुकर कांबळे, यांच्यासह नेर्ली,तामगाव, हालसवडे, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर