शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीमाप्रश्न सोडवणूकीचा विषय जाहीरनाम्यात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:32 IST

महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे.

ठळक मुद्देसीमाप्रश्न सोडवणूकीचा विषय जाहीरनाम्यात घ्यामहाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे राजकीय पक्षांना आवाहन

बेळगाव :महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे. यासंदर्भात समितीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष, नेते, मंत्री, आणि सीमाप्रश्नी आत्मीयता असलेल्या मंडळींना पत्राद्वारे आवाहन केले आहे.भाषावार प्रांतरचनेनुसार सर्व भाषिकांना त्यांच्या त्यांच्या भाषेची राज्य मिळाले, पण महाराष्ट्रावर सुरुवातीपासूनच अन्याय झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगाव येथून संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. पण १९५६ पासून बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी सह ८६५ गावांचा प्रदेश अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. त्यासाठी कित्येकजण हुतात्मे झाले, अनेक आंदोलने झाली, अनेकांनी तुरुंगवास भोगला पण सीमाप्रश्न जशास तसाच आहे. म्हणून २00४ साली महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.हा खटला वेगाने चालावा आणि १९५६ पासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी स्वत: पुढाकार घेउन सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि सीमाप्रश्न सोडवणूक हा विषय आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा असे आवाहन समितीने आपल्या पत्रात केले आहे.

समितीने यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापचे जेष्ठ नेते एन. डी. पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते संजय राऊत, नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, आमदार बच्चू कडू, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नारायण राणे, रिपाईचे रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, नितेश राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, भाई जगताप, संध्याताई कुपेकर, सुप्रिया सुळे, अजित पवार, अमोल कोल्हे, अशोक चव्हाण,आदी नेत्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत.

टॅग्स :belgaonबेळगावkolhapurकोल्हापूर