शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

सीमाप्रश्न सोडवणूकीचा विषय जाहीरनाम्यात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:32 IST

महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे.

ठळक मुद्देसीमाप्रश्न सोडवणूकीचा विषय जाहीरनाम्यात घ्यामहाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे राजकीय पक्षांना आवाहन

बेळगाव :महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे. यासंदर्भात समितीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष, नेते, मंत्री, आणि सीमाप्रश्नी आत्मीयता असलेल्या मंडळींना पत्राद्वारे आवाहन केले आहे.भाषावार प्रांतरचनेनुसार सर्व भाषिकांना त्यांच्या त्यांच्या भाषेची राज्य मिळाले, पण महाराष्ट्रावर सुरुवातीपासूनच अन्याय झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगाव येथून संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. पण १९५६ पासून बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी सह ८६५ गावांचा प्रदेश अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. त्यासाठी कित्येकजण हुतात्मे झाले, अनेक आंदोलने झाली, अनेकांनी तुरुंगवास भोगला पण सीमाप्रश्न जशास तसाच आहे. म्हणून २00४ साली महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.हा खटला वेगाने चालावा आणि १९५६ पासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी स्वत: पुढाकार घेउन सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि सीमाप्रश्न सोडवणूक हा विषय आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा असे आवाहन समितीने आपल्या पत्रात केले आहे.

समितीने यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापचे जेष्ठ नेते एन. डी. पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते संजय राऊत, नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, आमदार बच्चू कडू, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नारायण राणे, रिपाईचे रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, नितेश राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, भाई जगताप, संध्याताई कुपेकर, सुप्रिया सुळे, अजित पवार, अमोल कोल्हे, अशोक चव्हाण,आदी नेत्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत.

टॅग्स :belgaonबेळगावkolhapurकोल्हापूर