शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सीमाप्रश्न सोडवणूकीचा विषय जाहीरनाम्यात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:32 IST

महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे.

ठळक मुद्देसीमाप्रश्न सोडवणूकीचा विषय जाहीरनाम्यात घ्यामहाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे राजकीय पक्षांना आवाहन

बेळगाव :महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे. यासंदर्भात समितीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष, नेते, मंत्री, आणि सीमाप्रश्नी आत्मीयता असलेल्या मंडळींना पत्राद्वारे आवाहन केले आहे.भाषावार प्रांतरचनेनुसार सर्व भाषिकांना त्यांच्या त्यांच्या भाषेची राज्य मिळाले, पण महाराष्ट्रावर सुरुवातीपासूनच अन्याय झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगाव येथून संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. पण १९५६ पासून बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी सह ८६५ गावांचा प्रदेश अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. त्यासाठी कित्येकजण हुतात्मे झाले, अनेक आंदोलने झाली, अनेकांनी तुरुंगवास भोगला पण सीमाप्रश्न जशास तसाच आहे. म्हणून २00४ साली महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.हा खटला वेगाने चालावा आणि १९५६ पासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी स्वत: पुढाकार घेउन सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि सीमाप्रश्न सोडवणूक हा विषय आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा असे आवाहन समितीने आपल्या पत्रात केले आहे.

समितीने यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापचे जेष्ठ नेते एन. डी. पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते संजय राऊत, नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, आमदार बच्चू कडू, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नारायण राणे, रिपाईचे रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, नितेश राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, भाई जगताप, संध्याताई कुपेकर, सुप्रिया सुळे, अजित पवार, अमोल कोल्हे, अशोक चव्हाण,आदी नेत्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत.

टॅग्स :belgaonबेळगावkolhapurकोल्हापूर