शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

तिची उदंड लेकरं - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

'अनुबंध ', पत्रकार नगर, कै. बाळ पळसुले पथ, सांगली. -- "वहिनी, एक विचारलं तर राग नाही ना येणार?" "विचारा ...

'अनुबंध ', पत्रकार नगर, कै. बाळ पळसुले पथ, सांगली.

--

"वहिनी, एक विचारलं तर राग नाही ना येणार?"

"विचारा की हो. रागबिग कशाला येणार? तुम्ही काय वाईट साईट सांगणारेय का?"

"इडलीचं पीठ माझ्याकडून जरा जास्त भिजवलं गेलंय. त्यातलं थोडं नेताय का?"

" अय्ययो, तुम्ही ते मिक्सरमधी वाटतो. आम्ही रगड्यात रुबतो. आम्माला नाही चालत. असं करा, अर्धअधिक फ्रीजमधील ठेवून सोडा की. दोन-तीन दिवसांनी आप्पे नाहीतर डोसे घालून सोडा. चालतंय की"

सुब्बाराव वहिनीनी सुचवलं. निमाताईंनी कपाळाला हात लावला. पीठ संपवण्याची त्यांची आशा संपली होती.

"अहो, फ्रीजमध्ये काय ठेवताय वहिनी, फ्रीज इतका भरलाय, की आणखी काही ठेवलं तर पडेल खाली. बरं त्या पोपटानी भाभीना विचारते. त्या भाभी खिडकीतून ऐकतच होत्या. त्या दार उघडून बाहेर आल्या. ओढणी सावरत म्हणाल्या, "क्या हुवा निमाभाभी? फ्रीज बिघडला क्या? काय ठेवायचं है ?माझ्या फ्रीजमंदीभी जगह नही. नायतर ठेवलं असतं. प्रॉब्लेम तर काय तो सांग". तेवढ्यात त्यांची कामवाली तिथे धडकली. कमरेवर हात ठेवून म्हणाली, "इडलीच्या पिठाचं काय झालंय? फसफसलंय? फोहं घाला जरा भिजवून. नायतर कांदा ठेवा मधी."

"तू आता आम्हाला शिकव. तुमच्यामुळेच होतेय आमची अशी पंचाईत. तुम्हाला मोठे गर्व चढलेत ना. थांब, आता मोदी सायबाना पत्रच लिहिते." निमा वहिनींनी तिला फटकारलं. कामवाली गप्प बसणार होय? ती लागली तडातडा फुटाणे फोडायला. लिवा, लिवा, पत्र कशाला? फोन करा. आमच्यासारख्यांशी बोलतात ते. परवा भिशीवाल्या बायासंगं बोलले म्हनं फोनवरून."

" तू काम कर गं. नीट कर सफाई. तर निमाभाभी, तुझा प्रॉब्लेम कळला. दोन-तीन वाट्या पीठ माझ्याकडे दे."

"बापरे . तुम्ही इडली करणार? साहेबांना आवडतील का?" म्हणत पडत्या फळाची आज्ञा म्हणून का होईना निमा वहिनींनी पीठ आणलं.

"नही, मी इडली नाही बनवणार. मी त्यात डाळीचं पीठ, बटाटा, कांदा घालून पकोडे डीप फ्राय करणार. न्यू रेसिपी." "वावा, बरं झालं बाई." म्हणत निमा वहिनींनी सुस्कारा सोडला नि त्या आत गेल्या.

कॉलनीचं नाव 'शिल्प चिंतामणी.' इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफची म्हणून शिल्प नि सांगलीचं ग्रामदैवत गणपती म्हणून चिंतामणी. कॉलनी तशी मोठीच. प्राचार्य, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, एच. ओ. डी. वगैरेंचे दहाबारा बंगले नि बाकीची अपार्टमेंट्स. भारतभरचे निरनिराळ्या विषयांचे, डबल, तिबल पदव्यांवाले इंजिनिअर इथे लेक्चरर, प्रोफेसर म्हणून नोकरीला लागलेले. त्यामुळे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्व प्रांतीय मंडळी एकत्र राहत होती. निरनिराळ्या जातिधर्माची, कोणी रिटायर्ड, कोणी अजून नोकरीत असलेले, व्हरायटी होती तरी छान एकोप्याने राहत होती मंडळी. बरीच वर्षं महाराष्ट्रात राहिल्यामुळे सगळ्यांना मराठी चांगलं समजत होतं. राज ठाकरेंची दहशत होतीच. बोलताना मात्र त्यांच्या भाषेचा टोन यायचा. काही शब्द त्यांच्या भाषेतले यायचे. उत्तरेतला करवा चौक, दक्षिणेतला पोंगल, गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गा पूजा आणि महाराष्ट्रातला गणपती. सगळ्या सणात सगळी भाग घ्यायची. आठ-दहा बायका नोकरीवाल्या होत्या. बाकीच्या हाऊस वाईफ. बाईच्या मदतीने घरातलं काम, मुलांचा अभ्यास घेणं, बाहेर जाणाऱ्यांना डबे करून देणं, वाढदिवस साजरे करणं, हळदी कुंकवं, लग्न, डोहाळे जेवणं, बारशी असे समारंभ, त्यासाठी एकमेकांकडे जाणं सगळी दैनंदिनी आखीव रेखीव.

" हॅलो, दाते काकूच बोलताय ना? जेवणं झाली का? संध्याकाळी जरा मंडईत फेरी मारायची का?”

"भाजी घ्यायचीय? येते कंपनी म्हणून. पण मला तर काहीच घ्यायचं नाहीये. पाव किलोची भाजीसुद्धा संपत नाही. कशी संपणार चार माणसात? पूर्वी कसं थोडी उरली तर यमुनाबाई नेत होत्या.

म्हणायच्या, ठेवा वयनी. लक्ष्मीला नाकारायचं न्हाई. पण आता अजिबात नेत नाहीत."

"तर काय. आमची शांता, चार मुलं आहेत बरका तिला. एखादी भाकरी उरली ती ने म्हटलं तर नको म्हणते. बरं उरलेलं घालायचं तरी कोणाला? मुलं लहान. आजी-आजोबा म्हातारे. नवरा घरचा धनी.

शेवटी मलाच शिळवड संपवावी लागते. दिलीप म्हणतो, 'जेवढ्यास तेवढं करावं.' ह्याला काय सांगायला. सासूबाईंना पटत नाही त्याचं जुनं तत्त्व. सगळ्या भांड्यांचा खडखडाट करायचा नाही. मध्यरात्री दमून भागून कोणी आलं तरी त्याला चार घास घालता आले पाहिजेत."

"हल्ली असं कोणी येत नाही म्हणावं त्यांना. लॉजमध्ये उतरतात. अहो वहिनी, मी जेवायच्या आधी प्रत्येकाला विचारते, 'तू किती पोळ्या खाणार'?’ तर सासरे मला कसले रागावले. अगदी माझ्या कोकणस्थी जातीचा उद्धार केला त्यांनी."

"बरं, उरलेलं कचऱ्यात टाकायची आपली संस्कृती नाही. अन्नाला आपण पूर्णब्रम्ह म्हणतो."