शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

तिची उदंड लेकरं - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

'अनुबंध ', पत्रकार नगर, कै. बाळ पळसुले पथ, सांगली. -- "वहिनी, एक विचारलं तर राग नाही ना येणार?" "विचारा ...

'अनुबंध ', पत्रकार नगर, कै. बाळ पळसुले पथ, सांगली.

--

"वहिनी, एक विचारलं तर राग नाही ना येणार?"

"विचारा की हो. रागबिग कशाला येणार? तुम्ही काय वाईट साईट सांगणारेय का?"

"इडलीचं पीठ माझ्याकडून जरा जास्त भिजवलं गेलंय. त्यातलं थोडं नेताय का?"

" अय्ययो, तुम्ही ते मिक्सरमधी वाटतो. आम्ही रगड्यात रुबतो. आम्माला नाही चालत. असं करा, अर्धअधिक फ्रीजमधील ठेवून सोडा की. दोन-तीन दिवसांनी आप्पे नाहीतर डोसे घालून सोडा. चालतंय की"

सुब्बाराव वहिनीनी सुचवलं. निमाताईंनी कपाळाला हात लावला. पीठ संपवण्याची त्यांची आशा संपली होती.

"अहो, फ्रीजमध्ये काय ठेवताय वहिनी, फ्रीज इतका भरलाय, की आणखी काही ठेवलं तर पडेल खाली. बरं त्या पोपटानी भाभीना विचारते. त्या भाभी खिडकीतून ऐकतच होत्या. त्या दार उघडून बाहेर आल्या. ओढणी सावरत म्हणाल्या, "क्या हुवा निमाभाभी? फ्रीज बिघडला क्या? काय ठेवायचं है ?माझ्या फ्रीजमंदीभी जगह नही. नायतर ठेवलं असतं. प्रॉब्लेम तर काय तो सांग". तेवढ्यात त्यांची कामवाली तिथे धडकली. कमरेवर हात ठेवून म्हणाली, "इडलीच्या पिठाचं काय झालंय? फसफसलंय? फोहं घाला जरा भिजवून. नायतर कांदा ठेवा मधी."

"तू आता आम्हाला शिकव. तुमच्यामुळेच होतेय आमची अशी पंचाईत. तुम्हाला मोठे गर्व चढलेत ना. थांब, आता मोदी सायबाना पत्रच लिहिते." निमा वहिनींनी तिला फटकारलं. कामवाली गप्प बसणार होय? ती लागली तडातडा फुटाणे फोडायला. लिवा, लिवा, पत्र कशाला? फोन करा. आमच्यासारख्यांशी बोलतात ते. परवा भिशीवाल्या बायासंगं बोलले म्हनं फोनवरून."

" तू काम कर गं. नीट कर सफाई. तर निमाभाभी, तुझा प्रॉब्लेम कळला. दोन-तीन वाट्या पीठ माझ्याकडे दे."

"बापरे . तुम्ही इडली करणार? साहेबांना आवडतील का?" म्हणत पडत्या फळाची आज्ञा म्हणून का होईना निमा वहिनींनी पीठ आणलं.

"नही, मी इडली नाही बनवणार. मी त्यात डाळीचं पीठ, बटाटा, कांदा घालून पकोडे डीप फ्राय करणार. न्यू रेसिपी." "वावा, बरं झालं बाई." म्हणत निमा वहिनींनी सुस्कारा सोडला नि त्या आत गेल्या.

कॉलनीचं नाव 'शिल्प चिंतामणी.' इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफची म्हणून शिल्प नि सांगलीचं ग्रामदैवत गणपती म्हणून चिंतामणी. कॉलनी तशी मोठीच. प्राचार्य, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, एच. ओ. डी. वगैरेंचे दहाबारा बंगले नि बाकीची अपार्टमेंट्स. भारतभरचे निरनिराळ्या विषयांचे, डबल, तिबल पदव्यांवाले इंजिनिअर इथे लेक्चरर, प्रोफेसर म्हणून नोकरीला लागलेले. त्यामुळे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्व प्रांतीय मंडळी एकत्र राहत होती. निरनिराळ्या जातिधर्माची, कोणी रिटायर्ड, कोणी अजून नोकरीत असलेले, व्हरायटी होती तरी छान एकोप्याने राहत होती मंडळी. बरीच वर्षं महाराष्ट्रात राहिल्यामुळे सगळ्यांना मराठी चांगलं समजत होतं. राज ठाकरेंची दहशत होतीच. बोलताना मात्र त्यांच्या भाषेचा टोन यायचा. काही शब्द त्यांच्या भाषेतले यायचे. उत्तरेतला करवा चौक, दक्षिणेतला पोंगल, गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गा पूजा आणि महाराष्ट्रातला गणपती. सगळ्या सणात सगळी भाग घ्यायची. आठ-दहा बायका नोकरीवाल्या होत्या. बाकीच्या हाऊस वाईफ. बाईच्या मदतीने घरातलं काम, मुलांचा अभ्यास घेणं, बाहेर जाणाऱ्यांना डबे करून देणं, वाढदिवस साजरे करणं, हळदी कुंकवं, लग्न, डोहाळे जेवणं, बारशी असे समारंभ, त्यासाठी एकमेकांकडे जाणं सगळी दैनंदिनी आखीव रेखीव.

" हॅलो, दाते काकूच बोलताय ना? जेवणं झाली का? संध्याकाळी जरा मंडईत फेरी मारायची का?”

"भाजी घ्यायचीय? येते कंपनी म्हणून. पण मला तर काहीच घ्यायचं नाहीये. पाव किलोची भाजीसुद्धा संपत नाही. कशी संपणार चार माणसात? पूर्वी कसं थोडी उरली तर यमुनाबाई नेत होत्या.

म्हणायच्या, ठेवा वयनी. लक्ष्मीला नाकारायचं न्हाई. पण आता अजिबात नेत नाहीत."

"तर काय. आमची शांता, चार मुलं आहेत बरका तिला. एखादी भाकरी उरली ती ने म्हटलं तर नको म्हणते. बरं उरलेलं घालायचं तरी कोणाला? मुलं लहान. आजी-आजोबा म्हातारे. नवरा घरचा धनी.

शेवटी मलाच शिळवड संपवावी लागते. दिलीप म्हणतो, 'जेवढ्यास तेवढं करावं.' ह्याला काय सांगायला. सासूबाईंना पटत नाही त्याचं जुनं तत्त्व. सगळ्या भांड्यांचा खडखडाट करायचा नाही. मध्यरात्री दमून भागून कोणी आलं तरी त्याला चार घास घालता आले पाहिजेत."

"हल्ली असं कोणी येत नाही म्हणावं त्यांना. लॉजमध्ये उतरतात. अहो वहिनी, मी जेवायच्या आधी प्रत्येकाला विचारते, 'तू किती पोळ्या खाणार'?’ तर सासरे मला कसले रागावले. अगदी माझ्या कोकणस्थी जातीचा उद्धार केला त्यांनी."

"बरं, उरलेलं कचऱ्यात टाकायची आपली संस्कृती नाही. अन्नाला आपण पूर्णब्रम्ह म्हणतो."