शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:28 IST

राजकारणाच्या पलिकडे कार्यकर्त्यांशी आपले नाते आहे. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याच पाप कधीच करणार नाही. विचार करायला चार दिवसांचा अवधी द्या, सर्वजण एकत्र बसूनच निर्णय घेवूया. जो निर्णय होईल, त्याबरोबरच मी राहिन, असा शब्द डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कार्यकर्त्यांना नेसरीत झालेल्या मेळाव्यात दिला.

ठळक मुद्देचार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकरनेसरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला फेरविचाराचा शब्द

गडहिंग्लज : राजकारणाच्या पलिकडे कार्यकर्त्यांशी आपले नाते आहे. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याच पाप कधीच करणार नाही. विचार करायला चार दिवसांचा अवधी द्या, सर्वजण एकत्र बसूनच निर्णय घेवूया. जो निर्णय होईल, त्याबरोबरच मी राहिन, असा शब्द डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कार्यकर्त्यांना नेसरीत झालेल्या मेळाव्यात दिला.चार दिवसापूर्वी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण व नंदाताईदेखील यावेळी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय अचानकपणे जाहीर केल्यामुळे चंदगड मतदारसंघात तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वत:हून मेळावा भरवून आपल्या भावना मांडल्या. यावेळी नंदातार्इंचे पती डॉ. सुश्रूत बाभूळकर हेदेखील आवर्जून उपस्थित होते.तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार म्हणाले, कुपेकरांच्यामुळे मोठे झालेले विरोधात गेले तरीही निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे संघटना अभेद्य राहिली. कुपेकरांचा विचार व वारसा पुढे नेण्यासाठी नंदातार्इंनी फेरविचार करावा. ‘गोकुळ’चे संचालक रामराज कुपेकर म्हणाले, नंदातार्इंच्या उमेदवारीला विरोध करणारे एव्हीएच विरोधातील लढाईत कुठे होते?उदय जोशी म्हणाले, स्व. कुपेकरांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नंदातार्इंनी पुढे यावे. यावेळी महाबळेश्वर चौगुले, दीपक जाधव, बी. डी. पाटील, तानाजी शेंडगे, रघुनाथ पाटील, ज्ञानप्रकाश रेडेकर, संभाजी पाटील, अनिता भोगण, विद्या पाटील, दत्तू विंझणेकर, गणेश फाटक, रामलिंग पाटील, तजमल फणीबंद, बबन देसाई, राजू होलम, सुभाष देसाई, विकास मोकाशी, जुबेर काझी, जब्बार मुल्ला, आप्पासाहेब पाटील, शंकर कांबळे, सिकंदर नाईक, सदानंद पाटील, बाबासाहेब पाटील, नामदेव निट्टूरकर, नामदेव पाटील, भैरू खांडेकर, बाबासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दशरथ कुपेकर यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले. अभिजीत पाटील यांनी आभार मानले.

कुणाकडूनही लढा, पण लढा..!नंदातार्इंनी फेरविचार करावा आणि निवडणूक लढवतो असे जाहीर करावे. त्यांनी कुठल्याही पक्षाकडून लढावे. परंतु, निवडणूक लढवावी. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशीच भावना बहुतेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीसंदर्भातील निर्णयाचे सर्वाधिकारही नंदातार्इंनाच देण्यात आले. व्यासपीठावर पक्षाचा बॅनरदेखील न लावता झालेल्या मेळाव्याला चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कुणाचाही दबाव नाही !सासऱ्यांनी शून्यातून विश्व निर्माण केल्यामुळे आपल्याला ‘ईडी’ची भिती नाही. आपल्यावर कुणाचाही दबाब नाही, असे स्पष्ट करतानाच अत्यंत कठीण काळात बंधू रामराज आणि जीवाभावाच्या कार्यकर्त्यांमुळेच आपण आर्इंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा बाबांना मृत्यूसमयी दिलेला शब्द पाळू शकले, असे सांगून नंदातार्इंनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. ‘राष्ट्रवादी’तूनच लढा !शरद पवारांनीच बाबांना मोठ केलं, कठीण काळात त्यांची साथ सोडू नका, असे मसणू सुतार यांनी तर पुरोगामी विचार सोडू नका, राष्ट्रवादीतूनच लढा, अशी विनंती तालुकाध्यक्ष करिगार यांनी नंदातार्इंना हात जोडून केली.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड