गारगोटी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाकडून घरगुती मीटरचे वीज रीडिंग घेण्याकरिता नेमलेला ठेकेदार घरामध्ये रीडिंग घ्यावयास जात नसून, अंदाजे रीडिंग घेतले जात आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत असून, त्याच बरोबर नेमून दिलेल्या ठिकाणी वायरमन राहत नसल्याने ग्रामीण भागातील सायंकाळी ५ नंतर खंडित वीजपुरवठा सुरू होत नाही. नोकरीच्या ठिकाणी राहत नसलेल्या कमर्चाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांनी मासिक सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी विलासराव कांबळे होते.वीज वितरण कंपनीच्या लाईनमननी दिलेल्या ठिकाणी त्वरित हजर राहण्याचे व गळती लागलेल्या शाळांच्या खोल्यांची पावसाळ्यापूर्वी गळती काढावी, नादुरुस्त झालेल्या शाळांची दुरुस्ती त्वरित करण्याच्या सूचना सभापती विलासराव कांबळे यांनी दिल्या. पावसाळ्यात डांबरीकरण करू नये, अशा सूचना देखील संबंधित ठेकेदारांना द्याव्या, अशी सूचना माजी उपसभापती विजयमाला चव्हाण यांनी मांडली.पावसाळ्यात एस.टी.च्या छताना गळती लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्या गोष्टीकडे एस.टी. खात्याने वेळेत लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वन विभागाच्यावतीने जास्तीत जास्त लोकांना देण्यात येणारीे गेस एजन्सी जिल्हा स्तरावर न देता तालुका स्तरावर पुरवठाधारकांना द्यावी, अशी मागणी विश्वनाथ कुंभार यांनी केली. यावेळी वाहन निरीक्षक ए. एन. देसाई, शाखा अभियंता डी. के. मोहिते, वन विभाग निरीक्षक के. आर. पोतदार. एम. के. पोवार, एल. एस. जाधव, एस. एच. भोसले यांनी आपल्याला खात्यांचा आढावा सादर केला. या सभेस पं. स. सदस्या वैशाली घोरपडे, शिवाजी देसाई, गट विकासधिकारी जी. आर. कांबळे व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नोकरीच्या ठिकाणी राहत नसलेल्यांवर कारवाई करा
By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST