शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परिक्षेत्रात नियमबाह्य वाहनधारकांवर कारवाई करा : विश्वास नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:07 IST

परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच ठेवावे. अपघाताचे वाढते प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर द्यावा,

ठळक मुद्देवाहतूक नियोजनासाठी पाच जिल्ह्यांची बैठक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून सर्व खटले न्यायालयात दाखल करा

कोल्हापूर : परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच ठेवावे. अपघाताचे वाढते प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर द्यावा, शहरात रहदारीस अडथळे ठरतील अशा अतिक्रमणधारकांवर महापालिका प्रशासनाच्या मदतीने कारवाई करा, अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पाचही जिल्ह्यांच्या वाहतूक निरीक्षकांना दिल्या.

वाहतूक नियोजन आढावा बैठक विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा ते दोन यावेळी घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत वाहतुकीचे नियोजन काय केले आहे, वाहनांवर केलेली कारवाई, वाहनांचा सर्व्हे आणि उपाययोजना यासंबंधीचा आढावा नांगरे-पाटील यांनी घेतला. बैठकीस पाचही जिल्ह्यांच्या अप्पर पोलीस अधीक्षकांसह वाहतूक निरीक्षक उपस्थित होते. यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, पाचही शहरांत वाहनांची संख्या वाढल्याने शहरासह उपनगरांत वाहतुकीची कोंडी होत आहे.

काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे दिसते. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बेशिस्तपणे लोक रस्त्यावर वाहने चालवित असतात. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असते.

परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रीपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, मोबाईलवर बोलत वाहन चालविण्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी संवाद साधा, बैठका घेऊन त्यांच्याकडून वाहतूक नियोजनासाठी काही मदत किंवा सुविधा घेता येते का, त्यासाठी प्रयत्न करा. शहरात रस्त्यावर, फुटपाथवर फेरीवाले, हातगाड्यांवरील खाद्य विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. अशा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून सर्व खटले न्यायालयात दाखल करा, अशा सूचनाही नांगरे-पाटील यांनी दिल्या. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPolice Stationपोलीस ठाणे