शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

‘हमीदवाडा’वर कारवाई करा

By admin | Updated: December 9, 2014 23:17 IST

वायू, पाणी प्रदूषणाचा आरोप : चौकशी होईपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची मोर्चाद्वारे मागणी

कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्यामुळे वायू व पाणी प्रदूषण होत आहे. या कारखान्यांवर कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन उभे करू, असा इशारा हमीदवाडा परिसरातील नागरिकांनी आज, मंगळवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला. चौकशी होईपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा आग्रहही शिष्टमंडळाने प्रदूषण मंडळाकडे धरला. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सहा महिने बॉयलरमधून फवारल्या जाणाऱ्या काजळीमुळे परिसरात काजळीचे आच्छादन तयार होते. ही काजळी पिण्याचे पाणी व घरात येत असल्याने नागरिकांना टीबी, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागत आहे. शेतीवरही याचा अनिष्ट परिणाम झाला आहे. वारणा कारखान्यांप्रमाणे ‘ई.सी.पी.’ प्रणाली बसवण्यासाठी कारखान्याला सक्ती करावी, अशी मागणी विकास पाटील यांनी केली. कारखान्याच्या स्पेंट वॉशमुळे होणारे पाणीप्रदूषण अतिशय गंभीर आहे. कारखान्यापासून वेदगंगा व चिकोत्रा नदी जवळ असल्याने या दोन्ही नद्यांतून प्रदूषित पाण्याचा पुरवठा होतो. परिणामी गॅस्ट्रोसारखे गंभीर रोग पसरत आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्रकल्पाची स्पेंट वॉश डिस्चार्ज बंद करण्यासाठी तशी यंत्रणा बसवावी, पंधरा दिवसांत हा परिसर प्रदूषणमुक्त करावा व ही यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत कारखाना बंद ठेवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. आपण कारखान्यावर कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागूच पण रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शिष्टमंडळाने यावेळी दिला. या मागणीचे निवेदन उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांना देण्यात आले. शिष्टमंडळात बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, अरुण भोसले, नंदकुमार पाटील, प्रवीण भोसले, ज्ञानदेव पाटील, महादेव पाटील, प्रदीप पाटील, हणमंत माने, रणजित पाटील, मुन्ना पिरजादे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)दूषित पाण्यासह निवेदननिवेदन देण्यासाठी कागल तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उद्योग भवन येथील प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात आले होते. नागरिकांची संख्या अधिक असल्याने उपप्रादेशिक अधिकारी होळकर निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर आले. त्यांना निवेदनाबरोबर दूषित पाण्याची बाटलीही देण्यात आली. आठ दिवसांत चौकशी करणार : होळकरहमीदवाडा कारखान्यातून नदी व परिसरात प्रदूषण होत असलेल्या तक्रारीनुसार येत्या आठ दिवसांत संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यामध्ये कारखाना प्रशासन दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.