शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ताई-माई’मुळे भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराला ऊत

By admin | Updated: July 3, 2015 00:43 IST

भाई जगताप : गेल्या सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कोपार्डे : ‘अच्छे दिन’ची वल्गना करणाऱ्या भाजप सरकारमधील ‘ताई-माई’च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांना ऊत आला आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यातील १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेसच शेतकऱ्यांचे तारणहार असून, कॉँग्रेस सत्तेत असताना कर्जमुक्त करण्यासाठी केंद्राने ७२ हजार, तर राज्यातील अशोक चव्हाण यांच्या सरकारने सहा हजार २०० कोटी दिले. मात्र, आता भूमिअधिग्रहण कायदा आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप कॉँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केला.यवलूज (ता. पन्हाळा) येथे नागरिका स्पिनिंग मिल येथील कर्मचारी व प्रशासनामधील वाद मिटविण्यासाठी ते मुंबईहून आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर ताशेरे ओढले.जगताप म्हणाले, सध्या साखर कारखाने अडचणीत असल्याने चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे थकीत आहेत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेण्यासाठी पैसा नाही, अशावेळी शेती कर्जाचे पुणर्गठण करायला निघाले आहे. हा प्रकार पुन्हा शेतकऱ्यांचीमान कर्जाच्या कचाट्यात घालण्याचा हा प्रकार आहे. भाजप सरकारच्या काळात केवळ सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्या भाजपने शेतकऱ्यांच्या कॉँग्रेसच्या कार्यकाळातील आत्महत्येचे भांडवल केले ते आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला.भूमिअधिग्रहणाचा १८९४ चा कायदा अंमलात आणण्यासाठी ११२ वर्षे लागली. मात्र, सुषमा स्वराज व अरुण जेटली या सरकारच्या वकील जोडगळीने तो एका वर्षात अंमलात आणण्यास घाई करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप केला.