शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

‘ताई-माई’मुळे भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराला ऊत

By admin | Updated: July 3, 2015 00:43 IST

भाई जगताप : गेल्या सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कोपार्डे : ‘अच्छे दिन’ची वल्गना करणाऱ्या भाजप सरकारमधील ‘ताई-माई’च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांना ऊत आला आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यातील १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेसच शेतकऱ्यांचे तारणहार असून, कॉँग्रेस सत्तेत असताना कर्जमुक्त करण्यासाठी केंद्राने ७२ हजार, तर राज्यातील अशोक चव्हाण यांच्या सरकारने सहा हजार २०० कोटी दिले. मात्र, आता भूमिअधिग्रहण कायदा आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप कॉँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केला.यवलूज (ता. पन्हाळा) येथे नागरिका स्पिनिंग मिल येथील कर्मचारी व प्रशासनामधील वाद मिटविण्यासाठी ते मुंबईहून आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर ताशेरे ओढले.जगताप म्हणाले, सध्या साखर कारखाने अडचणीत असल्याने चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे थकीत आहेत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेण्यासाठी पैसा नाही, अशावेळी शेती कर्जाचे पुणर्गठण करायला निघाले आहे. हा प्रकार पुन्हा शेतकऱ्यांचीमान कर्जाच्या कचाट्यात घालण्याचा हा प्रकार आहे. भाजप सरकारच्या काळात केवळ सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्या भाजपने शेतकऱ्यांच्या कॉँग्रेसच्या कार्यकाळातील आत्महत्येचे भांडवल केले ते आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला.भूमिअधिग्रहणाचा १८९४ चा कायदा अंमलात आणण्यासाठी ११२ वर्षे लागली. मात्र, सुषमा स्वराज व अरुण जेटली या सरकारच्या वकील जोडगळीने तो एका वर्षात अंमलात आणण्यास घाई करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप केला.