शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

‘ताई-माई’मुळे भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराला ऊत

By admin | Updated: July 3, 2015 00:43 IST

भाई जगताप : गेल्या सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कोपार्डे : ‘अच्छे दिन’ची वल्गना करणाऱ्या भाजप सरकारमधील ‘ताई-माई’च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांना ऊत आला आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यातील १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेसच शेतकऱ्यांचे तारणहार असून, कॉँग्रेस सत्तेत असताना कर्जमुक्त करण्यासाठी केंद्राने ७२ हजार, तर राज्यातील अशोक चव्हाण यांच्या सरकारने सहा हजार २०० कोटी दिले. मात्र, आता भूमिअधिग्रहण कायदा आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप कॉँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केला.यवलूज (ता. पन्हाळा) येथे नागरिका स्पिनिंग मिल येथील कर्मचारी व प्रशासनामधील वाद मिटविण्यासाठी ते मुंबईहून आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर ताशेरे ओढले.जगताप म्हणाले, सध्या साखर कारखाने अडचणीत असल्याने चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे थकीत आहेत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेण्यासाठी पैसा नाही, अशावेळी शेती कर्जाचे पुणर्गठण करायला निघाले आहे. हा प्रकार पुन्हा शेतकऱ्यांचीमान कर्जाच्या कचाट्यात घालण्याचा हा प्रकार आहे. भाजप सरकारच्या काळात केवळ सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्या भाजपने शेतकऱ्यांच्या कॉँग्रेसच्या कार्यकाळातील आत्महत्येचे भांडवल केले ते आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला.भूमिअधिग्रहणाचा १८९४ चा कायदा अंमलात आणण्यासाठी ११२ वर्षे लागली. मात्र, सुषमा स्वराज व अरुण जेटली या सरकारच्या वकील जोडगळीने तो एका वर्षात अंमलात आणण्यास घाई करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप केला.