शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारले

By admin | Updated: May 10, 2017 18:11 IST

बी. जी. कोळसे-पाटील; प्रबोधनवादी साहित्य संमेलन

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारण्याचे काम केले आहे. इतिहासाचे संशोधन करून त्याची मांडणी करण्यासह ते ऐकलेही पाहिजे. प्रबोधनवाद्यांची सर्व बाजूंनी कोंडी केली जात आहे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी बुधवारी येथे केले. बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रबोधन सेवाभावी संस्था आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित सातव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामधील या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, आदी प्रमुख उपस्थित होते.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, गौतम बुद्ध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही वैचारिक धन देणारे आहे. खरा धर्म संतांनी शिकविला असून, संतवचनांतील ओळी आजही आपल्या मेंदूची स्वच्छता करतात.

ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, धर्माचे नाव घेऊन लोक सत्तेत येताहेत. एका विशिष्ट विचारसरणीचा उदय होत आहे. धर्मनिरपेक्ष व समतावादी राज्य असण्याची गरज आहे. परंपरांच्या ओझ्याखाली आपण दबत आहोत. बुद्धिवादी लोकांची हत्या होत असून तो घातक प्रकार आहे.

कार्यक्रमात मीरासाहेब मगदूम यांना उत्कृष्ट प्रबोधन कार्यकर्ता, डॉ. सुभाष देसाई यांना उत्कृष्ट प्रबोधन साहित्यिक, तर प्रा. टी. आर. गुरव यांना उत्कृष्ट प्रबोधन वक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनात डॉ. राजेंद्र कुंभार, टी. आर. गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव शिरसाट, बाळासाहेब गवाणी, संजय साळोखे, प्रा. अनिल घस्ते, सुजय पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. जे. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र रत्नाबाई यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा जितकर यांनी आभार मानले.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले,

भांडवलदार आणि धर्मांध शक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेथे सर्वसामान्यांचा विकास खुंटतो. सध्याचे सरकार नेमके हेच करीत आहे. 

माणसांची विचार करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा आजच्या सरकारचा घाट आहे.

संघपरिवार देशाला अस्थिर करण्याचे काम करीत आहे.  

‘अच्छे दिन’चा आभास निर्माण करणाऱ्या मोदी सरकारविरोधात देशपातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज.

संमेलनातील ठराव

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या लोकआंदोलनाबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या विचारांना पाठिंबा.

 डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारचा निषेध.

 देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करावे. धर्माच्या नावावरच्या काळ्या पैशांचा विनियोग जनतेच्या विविध विकासकामांसाठी करावा.

 पुरोगामी प्रबोधन साहित्य हे शासनाने ग्रंथालय संचालनालयातर्फे खरेदी करून त्याचे राज्यातील सर्व ग्रंथालयांना वितरण करावे.

 ‘जोतीराव फुले समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ ५० रुपयांत उपलब्ध करून द्यावा.