शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारले

By admin | Updated: May 10, 2017 18:11 IST

बी. जी. कोळसे-पाटील; प्रबोधनवादी साहित्य संमेलन

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारण्याचे काम केले आहे. इतिहासाचे संशोधन करून त्याची मांडणी करण्यासह ते ऐकलेही पाहिजे. प्रबोधनवाद्यांची सर्व बाजूंनी कोंडी केली जात आहे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी बुधवारी येथे केले. बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रबोधन सेवाभावी संस्था आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित सातव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामधील या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, आदी प्रमुख उपस्थित होते.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, गौतम बुद्ध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही वैचारिक धन देणारे आहे. खरा धर्म संतांनी शिकविला असून, संतवचनांतील ओळी आजही आपल्या मेंदूची स्वच्छता करतात.

ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, धर्माचे नाव घेऊन लोक सत्तेत येताहेत. एका विशिष्ट विचारसरणीचा उदय होत आहे. धर्मनिरपेक्ष व समतावादी राज्य असण्याची गरज आहे. परंपरांच्या ओझ्याखाली आपण दबत आहोत. बुद्धिवादी लोकांची हत्या होत असून तो घातक प्रकार आहे.

कार्यक्रमात मीरासाहेब मगदूम यांना उत्कृष्ट प्रबोधन कार्यकर्ता, डॉ. सुभाष देसाई यांना उत्कृष्ट प्रबोधन साहित्यिक, तर प्रा. टी. आर. गुरव यांना उत्कृष्ट प्रबोधन वक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनात डॉ. राजेंद्र कुंभार, टी. आर. गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव शिरसाट, बाळासाहेब गवाणी, संजय साळोखे, प्रा. अनिल घस्ते, सुजय पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. जे. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र रत्नाबाई यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा जितकर यांनी आभार मानले.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले,

भांडवलदार आणि धर्मांध शक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेथे सर्वसामान्यांचा विकास खुंटतो. सध्याचे सरकार नेमके हेच करीत आहे. 

माणसांची विचार करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा आजच्या सरकारचा घाट आहे.

संघपरिवार देशाला अस्थिर करण्याचे काम करीत आहे.  

‘अच्छे दिन’चा आभास निर्माण करणाऱ्या मोदी सरकारविरोधात देशपातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज.

संमेलनातील ठराव

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या लोकआंदोलनाबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या विचारांना पाठिंबा.

 डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारचा निषेध.

 देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करावे. धर्माच्या नावावरच्या काळ्या पैशांचा विनियोग जनतेच्या विविध विकासकामांसाठी करावा.

 पुरोगामी प्रबोधन साहित्य हे शासनाने ग्रंथालय संचालनालयातर्फे खरेदी करून त्याचे राज्यातील सर्व ग्रंथालयांना वितरण करावे.

 ‘जोतीराव फुले समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ ५० रुपयांत उपलब्ध करून द्यावा.