शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारले

By admin | Updated: May 10, 2017 18:11 IST

बी. जी. कोळसे-पाटील; प्रबोधनवादी साहित्य संमेलन

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारण्याचे काम केले आहे. इतिहासाचे संशोधन करून त्याची मांडणी करण्यासह ते ऐकलेही पाहिजे. प्रबोधनवाद्यांची सर्व बाजूंनी कोंडी केली जात आहे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी बुधवारी येथे केले. बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रबोधन सेवाभावी संस्था आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित सातव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामधील या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, आदी प्रमुख उपस्थित होते.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, गौतम बुद्ध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही वैचारिक धन देणारे आहे. खरा धर्म संतांनी शिकविला असून, संतवचनांतील ओळी आजही आपल्या मेंदूची स्वच्छता करतात.

ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, धर्माचे नाव घेऊन लोक सत्तेत येताहेत. एका विशिष्ट विचारसरणीचा उदय होत आहे. धर्मनिरपेक्ष व समतावादी राज्य असण्याची गरज आहे. परंपरांच्या ओझ्याखाली आपण दबत आहोत. बुद्धिवादी लोकांची हत्या होत असून तो घातक प्रकार आहे.

कार्यक्रमात मीरासाहेब मगदूम यांना उत्कृष्ट प्रबोधन कार्यकर्ता, डॉ. सुभाष देसाई यांना उत्कृष्ट प्रबोधन साहित्यिक, तर प्रा. टी. आर. गुरव यांना उत्कृष्ट प्रबोधन वक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनात डॉ. राजेंद्र कुंभार, टी. आर. गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव शिरसाट, बाळासाहेब गवाणी, संजय साळोखे, प्रा. अनिल घस्ते, सुजय पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. जे. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र रत्नाबाई यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा जितकर यांनी आभार मानले.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले,

भांडवलदार आणि धर्मांध शक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेथे सर्वसामान्यांचा विकास खुंटतो. सध्याचे सरकार नेमके हेच करीत आहे. 

माणसांची विचार करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा आजच्या सरकारचा घाट आहे.

संघपरिवार देशाला अस्थिर करण्याचे काम करीत आहे.  

‘अच्छे दिन’चा आभास निर्माण करणाऱ्या मोदी सरकारविरोधात देशपातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज.

संमेलनातील ठराव

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या लोकआंदोलनाबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या विचारांना पाठिंबा.

 डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारचा निषेध.

 देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करावे. धर्माच्या नावावरच्या काळ्या पैशांचा विनियोग जनतेच्या विविध विकासकामांसाठी करावा.

 पुरोगामी प्रबोधन साहित्य हे शासनाने ग्रंथालय संचालनालयातर्फे खरेदी करून त्याचे राज्यातील सर्व ग्रंथालयांना वितरण करावे.

 ‘जोतीराव फुले समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ ५० रुपयांत उपलब्ध करून द्यावा.