शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारले

By admin | Updated: May 10, 2017 18:11 IST

बी. जी. कोळसे-पाटील; प्रबोधनवादी साहित्य संमेलन

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारण्याचे काम केले आहे. इतिहासाचे संशोधन करून त्याची मांडणी करण्यासह ते ऐकलेही पाहिजे. प्रबोधनवाद्यांची सर्व बाजूंनी कोंडी केली जात आहे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी बुधवारी येथे केले. बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रबोधन सेवाभावी संस्था आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित सातव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामधील या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, आदी प्रमुख उपस्थित होते.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, गौतम बुद्ध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही वैचारिक धन देणारे आहे. खरा धर्म संतांनी शिकविला असून, संतवचनांतील ओळी आजही आपल्या मेंदूची स्वच्छता करतात.

ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, धर्माचे नाव घेऊन लोक सत्तेत येताहेत. एका विशिष्ट विचारसरणीचा उदय होत आहे. धर्मनिरपेक्ष व समतावादी राज्य असण्याची गरज आहे. परंपरांच्या ओझ्याखाली आपण दबत आहोत. बुद्धिवादी लोकांची हत्या होत असून तो घातक प्रकार आहे.

कार्यक्रमात मीरासाहेब मगदूम यांना उत्कृष्ट प्रबोधन कार्यकर्ता, डॉ. सुभाष देसाई यांना उत्कृष्ट प्रबोधन साहित्यिक, तर प्रा. टी. आर. गुरव यांना उत्कृष्ट प्रबोधन वक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनात डॉ. राजेंद्र कुंभार, टी. आर. गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव शिरसाट, बाळासाहेब गवाणी, संजय साळोखे, प्रा. अनिल घस्ते, सुजय पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. जे. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र रत्नाबाई यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा जितकर यांनी आभार मानले.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले,

भांडवलदार आणि धर्मांध शक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेथे सर्वसामान्यांचा विकास खुंटतो. सध्याचे सरकार नेमके हेच करीत आहे. 

माणसांची विचार करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा आजच्या सरकारचा घाट आहे.

संघपरिवार देशाला अस्थिर करण्याचे काम करीत आहे.  

‘अच्छे दिन’चा आभास निर्माण करणाऱ्या मोदी सरकारविरोधात देशपातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज.

संमेलनातील ठराव

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या लोकआंदोलनाबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या विचारांना पाठिंबा.

 डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारचा निषेध.

 देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करावे. धर्माच्या नावावरच्या काळ्या पैशांचा विनियोग जनतेच्या विविध विकासकामांसाठी करावा.

 पुरोगामी प्रबोधन साहित्य हे शासनाने ग्रंथालय संचालनालयातर्फे खरेदी करून त्याचे राज्यातील सर्व ग्रंथालयांना वितरण करावे.

 ‘जोतीराव फुले समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ ५० रुपयांत उपलब्ध करून द्यावा.