शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

कळंब्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST

कळंबा : एप्रिलच्या मध्यावर कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीपातळी तेरा फुटांवर आली असून, तलावपात्रातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर ...

कळंबा : एप्रिलच्या मध्यावर कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीपातळी तेरा फुटांवर आली असून, तलावपात्रातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कळंबा परिसरातील पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

तलावातील जैवविविधता कायम राहावी यासाठी किमान दहा फूट मृत पाणीसाठा शिल्लक ठेवावा लागणार असल्याने मे महिन्यात पाणी प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत. यंदा एप्रिल महिन्यात तापमानात उच्चांकी वाढ झाल्याने पाणी बाष्पीभवनाचा वेग वाढला. त्यात प्रतिवर्षी पाणीवाटपाचे नियोजन करण्यात पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता पावसाळ्यापूर्वीच जाणवत असल्याचे चित्र आहे. कळंबा, पाचगावमधील नागरिकांची पाण्याची गरज भागवत जनावरांसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनास पडला आहे.

ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न जटिल बनणार, हे लक्षात येताच कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पालिका पाणीपुरवठा विभागास तलावातून कमी पाणीउपसा करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

चौकट : प्रशासनाची तारेवरची कसरत

पाणीटंचाईचा विचार करता उपलब्ध पाणीसाठ्यातून उपनगरांची गरज भागवतानाच पालिका प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागते.

आजमितीला कळंबा ग्रामपंचायत दररोज एक एमएलडी, तर पालिका पाणीपुरवठा विभाग बी वॉर्डला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज सहा एमएलडी पाणीउपसा करते. सध्या उपलब्ध पाणीसाठ्यापैकी केवळ तीन फूट पाणीउपसा करता येणे शक्य असल्याने ऐन मे महिन्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

चौकट: शाहूकालीन विहीर गाळात

ऐन उन्हाळ्यात तलावातील पाणीसाठा कमी झाल्यास पाणीटंचाई भासू नये यासाठी तलाव पात्रात चाळीस फूट रुंद व साठ फूट खोल विहीर काढली होती. ऐन पाणीटंचाई काळात ती उपयुक्त ठरते; पण प्रदूषण व गाळात विहिरीचे अस्तित्व हरवले आहे. दरम्यान, भविष्यात पाणीटंचाईची भीषणता विचारात घेऊन पुणे पालिकेने बांधकाम परवान्यासोबत रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. शिवाय एक दिवस आड पाणीपुरवठा कायम ठेवल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यात यश मिळवले आहे. पुणे पालिकेचा हा पॅटर्न कोल्हापूर महापालिकेनेही राबविण्याची गरज आहे.

फोटो: १७ कळंबा तलाव

ओळ

ऐन एप्रिल महिन्यात कळंबा तलावाची पाणीपातळी अवघी तेरा फुटांवर येऊन पोहोचल्याने मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.