शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

‘स्वाभिमानी’ची तलवार म्यान

By admin | Updated: April 27, 2016 01:02 IST

एफआरपीचा प्रश्न : नुसत्या आश्वासनासाठीच आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराबाबत घेतलेल्या भूमिकेने शेतकऱ्यांमध्येच संभ्रमावस्था आहे. साखर कारखान्यांनी बैठक घेऊन १ मेपासून उर्वरित एफआरपी देण्याचे मान्य केले असतानाही १५ एप्रिलचा आग्रह धरत पालकमंत्र्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करू न देण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर ३० एप्रिलची डेडलाईन देत १ मेपासून मंत्र्यांच्या गाड्या राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीने दिला. मात्र, सहकारमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची ‘तलवारच म्यान’ केल्याने इशाऱ्यामागून इशारे देऊन स्वाभिमानीने नेमके काय साधले, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यंदाच्या हंगामात ‘स्वाभिमानी’ने घेतलेल्या भूमिकाांमुळे त्यांच्यावर सुरुवातीपासूनच टीका होत राहिली. जिल्ह्यातील कारखानदारांनी बैठक घेऊन १ मेपासून उर्वरित एफआरपी शेतकऱ्यांना आदा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत कारखान्यांनी पैसे दिले नाही तर कारखानदार व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण करू न देण्याचा इशाराही दिला होता. पुन्हा ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली आणि ३० एप्रिलपर्यंत पैसे दिले नाही तर १ मेपासून राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला. मंत्री पाटील यांनी मुंबईतील बैठकीत ३० एप्रिलपर्यंत एफआरपी नाही दिली तर साखर जप्तीचा इशारा आणि ‘स्वाभिमानी’ने आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केली. कारखानदारांनी १ मे पासून एफआरपी देण्याचे मान्य केले होते, मग सततच्या इशाऱ्यांतून ‘स्वाभिमानी’ने काय साधले. मग ही आदळाआपट नेमकी कशासाठी होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेचे राजकारण अवघड जागेवरील दुखणंदोन्ही कॉँग्रेसवर हल्ला चढवत ‘स्वाभिमानी’ने प्रत्येक वर्षी रस्त्यावरची लढाई केली. त्यामध्ये किती यश-अपयश आले हे महत्त्वाचे नसले तरी तत्कालीन सरकारविरोधात जनमत तयार करण्यात ते यशस्वी ठरले होते; पण आता तेच सत्तेत असल्याने त्यांना कोणत्याही एका भूमिकेवर ठाम राहता येईना. सत्तेचे राजकारण त्यांच्यासाठी अवघड जागेचे दुखणे झाल्याची चर्चा आहे.