शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

‘स्वाभिमानी’ची तलवार म्यान

By admin | Updated: April 27, 2016 01:02 IST

एफआरपीचा प्रश्न : नुसत्या आश्वासनासाठीच आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराबाबत घेतलेल्या भूमिकेने शेतकऱ्यांमध्येच संभ्रमावस्था आहे. साखर कारखान्यांनी बैठक घेऊन १ मेपासून उर्वरित एफआरपी देण्याचे मान्य केले असतानाही १५ एप्रिलचा आग्रह धरत पालकमंत्र्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करू न देण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर ३० एप्रिलची डेडलाईन देत १ मेपासून मंत्र्यांच्या गाड्या राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीने दिला. मात्र, सहकारमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची ‘तलवारच म्यान’ केल्याने इशाऱ्यामागून इशारे देऊन स्वाभिमानीने नेमके काय साधले, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यंदाच्या हंगामात ‘स्वाभिमानी’ने घेतलेल्या भूमिकाांमुळे त्यांच्यावर सुरुवातीपासूनच टीका होत राहिली. जिल्ह्यातील कारखानदारांनी बैठक घेऊन १ मेपासून उर्वरित एफआरपी शेतकऱ्यांना आदा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत कारखान्यांनी पैसे दिले नाही तर कारखानदार व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण करू न देण्याचा इशाराही दिला होता. पुन्हा ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली आणि ३० एप्रिलपर्यंत पैसे दिले नाही तर १ मेपासून राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला. मंत्री पाटील यांनी मुंबईतील बैठकीत ३० एप्रिलपर्यंत एफआरपी नाही दिली तर साखर जप्तीचा इशारा आणि ‘स्वाभिमानी’ने आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केली. कारखानदारांनी १ मे पासून एफआरपी देण्याचे मान्य केले होते, मग सततच्या इशाऱ्यांतून ‘स्वाभिमानी’ने काय साधले. मग ही आदळाआपट नेमकी कशासाठी होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेचे राजकारण अवघड जागेवरील दुखणंदोन्ही कॉँग्रेसवर हल्ला चढवत ‘स्वाभिमानी’ने प्रत्येक वर्षी रस्त्यावरची लढाई केली. त्यामध्ये किती यश-अपयश आले हे महत्त्वाचे नसले तरी तत्कालीन सरकारविरोधात जनमत तयार करण्यात ते यशस्वी ठरले होते; पण आता तेच सत्तेत असल्याने त्यांना कोणत्याही एका भूमिकेवर ठाम राहता येईना. सत्तेचे राजकारण त्यांच्यासाठी अवघड जागेचे दुखणे झाल्याची चर्चा आहे.