शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

फायनान्सच्या कर्जदारांवर पुन्हा दंडाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 15:21 IST

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबँका बंद असल्याचा फटका, एटीएम सेंटरवर पैसे जमा करावे लागणारसहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला लागणार कात्री

विनोद सावंत कोल्हापूर : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना कहर सुरू आहे. रोज दोनशेच्यावर नव्याने रुग्णांत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २० ते २६ जुलै कडक लॉकडाऊन केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये बँका सुरू होत्या. परंतु बँकेतील कर्मचारी कोरोनाबाधित सापडत आहेत. तसेच ग्राहकांची बंद दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बँकेत गर्दी होते.

या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने सात दिवस बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे, अशांना फटका बसत आहे. काहींकडून सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेमधून फायनान्सचे हप्ते ईसीएसच्या (इलेक्ट्रिक क्लिअरन्स सर्व्हिस) माध्यमातून जमा केले जातात.

कर्जाच्या तारखेच्या अगोदर एक दिवस खात्यावर पैशाची तजवीज केली जाते. मात्र, सध्या बँका बंद असल्याने अनेकांना पैसे जमा करता आले नाहीत. अशा बहुतांशी कर्जदारांना दंडाला सामोरे जावे लागणार आहे.सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्जदारांना दिलासा२० ते २६ जुलै दरम्यान ज्यांचे कर्जाचे ईएमआय हप्ते आहेत, त्या तारखेला भरणे बंधनकारक आहे. अन्यथा कर्जानुसार दंड लावला जातो. सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेतही वाहन तारण, गृहतारण, घरबांधणी, घर दुरुस्ती असे कर्ज वाटप केले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकने 30 ऑगस्टपर्यंत अशाप्रकारे दंड वसूल करू नये, असे आदेश या बँकांना दिले आहेत.हे पर्याय....

  • तत्काळ फायनान्स कंपनीला मेल करून ईसीएस न करण्याची सूचना करणे
  • संबंधित खात्यावर ऑनलाईनने पैसे जमा करणे
  • कर्ज हप्ता वर्ग होत असलेल्या बँकेच्या एटीएम सेंटरवर जाऊन जमा मशीनच्या साहाय्याने हप्त्याएवढे पैसे जमा करणे

बँका बंद असल्या तरी एटीएम सेंटर सुरू आहेत. याठिकाणी खात्यावर पैसे जमा करण्याची सुविधा आहे. फायनान्स कंपनीला धनादेश अथवा ईसीएस केला असेल. त्यांनी सेंटरवर जाऊन पैसे जमा करणे योग्य ठरणार आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार सहकारी बँकेतील कर्जदारांना दंड लागणार नाही.सत्यजित जगदाळे,बँक अधिकारी

दुहेरी दंडखात्यावर बॅलन्स न ठेवल्यामुळे संबंधित बँका किमान शंभर रुपये दंड आकारणार आहेत. तसेच फायनान्स कंपनीही हप्ता तारखेला जमा केला नसल्यामुळे पाचशे ते हजार रुपये दंड वसूल करणार आहे. मागील लॉकडाऊननंतर कर्जदार फायनान्स कंपनी यांच्यामध्ये यावरून वादाचे प्रसंग घडले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर