शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

स्विफ्ट झाडावर आदळून दाम्पत्य ठार

By admin | Updated: June 9, 2016 01:21 IST

वालूरजवळ अपघात : मृत रत्नागिरीचे

रत्नागिरी : आंबा घाटात अपघाती निधन झालेले सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दत्ता तथा डी. के. कुरतडकर यांच्या निधनामुळे रत्नागिरीत हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या अनेक परिचितांनी आंबा घाटाकडे धाव घेतली.विद्युत मंडळामध्ये (महावितरण कंपनीमध्ये) ३२ वर्षे उत्कृष्ट सेवा केल्यानंतर जून २०११ मध्ये ते लातूर येथे अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले. रत्नागिरीहून २००९ साली त्यांची लातूर येथे बदली झाली होती. रत्नागिरी येथे सेवेत असताना जिल्हानियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरीत पथदीप योजना राबविली. याची दखल घेत राज्यसरकारने २००७ -२००८ साली ही योजना संपूर्र्ण राज्यात अंमलात आणली. आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव पर्यटन स्थळ म्हणून जाहीर होण्यासाठी त्यांनी जिल्'ातील सर्व धार्मिक संघटनांना एकत्र आणून पाठपुरावा केला होता. रत्नागिरीतील थिबाकालीन बुद्धविहार प्रशस्त बुद्धविहार होण्यासाठीही मागणी उचलून धरली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जिल्ह्ातील बौद्ध अधिकारी व कर्मचारी यांना एकत्र आणून सामाजिक स्तरावर कार्य करण्यासाठी ‘बुद्धिस्ट अधिकारी व कर्मचारी महासंघाची’ स्थापना केली. या महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष होते. तसेच शाहू, फुले, आंबेडकर विचारमंचाचे कार्याध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी आरपीआय आठवले गटाचे ते जिल्हा संघटक होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. समाजातील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आदी उपक्रम राबवितानाच हुशार विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी पत्नी वृषाली यांच्यासमवेत त्यांनी मोफत मार्गदर्शनही देऊ केले. सध्या ते आपल्या मूळगावी कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे बुद्धविहार बांधण्यासाठी प्रयत्नशील होते. पत्नी वृषाली येथील अ. के. देसाई हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गेल्याचवर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मोठा मुलगा कुणाल हा सध्या महावितरणमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असून दीड महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला. दुसरा मुलगा सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्न करीत आहे.