शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

‘स्वाभिमानी’चा १३ रोजी चक्काजाम

By admin | Updated: December 7, 2015 00:52 IST

राजू शेट्टी : शेतकऱ्यांचे नुकसान कराल तर सोडणार नाही; सरकारला इशारा

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’ देण्यासाठी साखर कारखानदार व सरकारला दिलेला अल्टीमेटम संपला असून, शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी १३ डिसेंबरला ऊसपट्ट्यात एक दिवसाचे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात दिली. या दिवशी ऊस वाहतूकही बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजू शेट्टी म्हणाले, जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत एकरकमी ‘एफआरपी’बाबत एक महिन्याची मुदत दिली होती. महिन्याभरात सहकारमंत्र्यांनी बैठका घेऊन काही निर्णय घेतले. मुख्यमंत्र्यांनीही २ डिसेंबरला बैठक घेऊन ऊस खरेदी कर माफ केला. खरेदी कर माफ केल्याने प्रतिटन ८३ ते ११० रुपये, मळीचे निर्बंध उठवल्याने त्यातून २४० रुपये, तसेच साखरेच्या मूल्यांकनात वाढ झाली; पण त्याचबरोबर ८५ ऐवजी ९० टक्के उचल देण्याचे आदेश सरकारने दिल्याने त्यातून प्रतिटन ११५ ते १२० रुपये, असे एकूण राज्य सरकारच्या सहकार्याने प्रतिटन ५०० ते ५५० रुपये साखर कारखान्यांना उपलब्ध झाले आहेत. तरीही १२०० आणि १४०० रुपये दराची भाषा कारखानदार सोडण्यास तयार नाहीत. टॅगिंग व प्रक्रिया खर्च वेगवेगळे दाखवून कारखानदार मखलाशी करत आहेत. सरकारने कारखानदारांना आणखी मदत करावी; पण एकरकमी ‘एफआरपी’ द्यावी. संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन आम्ही संयम पाळला आहे. आमचा संयम कोणी कमजोरी समजत असेल तर त्यांना सोडणार नाही. गेल्या महिन्याभरात ऊस गाळपास पाठविलेले शेतकरी प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार आहेत. संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी, यासाठी एकदिवसीय चक्काजाम आंदोलन करणार असून, त्या दिवशी ऊस वाहतूकही बंद केली जाणार आहे. यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते.‘आरआरसी’च्या नोटिसा काढासाखर आयुक्तांनी कायद्याची अंमलबजावणी करत महिन्याभरात उत्पादन झालेल्या साखर जप्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत. ही साखर खुल्या बाजारात विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत व उर्वरित रक्कम कारखान्यांना द्यावी. एक-दोन कारखान्यांवर कारवाई करा, इतर सुतासारखे सरळ होतील, असे शेट्टी यांनी सांगितले.सरकारची नरमाईची भूमिकाकारखानदार कायदा मोडत असताना सरकारने कान धरून त्यांना सांगणे गरजेचे होते. परंतु, मुख्यमंत्री, सहकारमंत्री याबाबत कोणतीच कडक कारवाई करत नाहीत. सरकार नरमाईची भूमिका का घेत आहे? यामागील गौडबंगाल कळले नसल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. प्रवाशांनी सहकार्य करावेचक्काजाम आंदोलनाचा सामान्य माणसांना त्रास होणार आहे; पण सरकारला सरळ भाषा समजत नसल्याने जाग आणण्यासाठी हे आंदोलन करावे लागत आहे. ज्यांचा शेतीशी संबंध नसला तरी सहानुभूती म्हणून त्यादिवशी प्रवास करू नये, असे आवाहन शेट्टी यांनी केले.