शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

‘स्वाभिमानी’चा १३ रोजी चक्काजाम

By admin | Updated: December 7, 2015 00:52 IST

राजू शेट्टी : शेतकऱ्यांचे नुकसान कराल तर सोडणार नाही; सरकारला इशारा

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’ देण्यासाठी साखर कारखानदार व सरकारला दिलेला अल्टीमेटम संपला असून, शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी १३ डिसेंबरला ऊसपट्ट्यात एक दिवसाचे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात दिली. या दिवशी ऊस वाहतूकही बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजू शेट्टी म्हणाले, जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत एकरकमी ‘एफआरपी’बाबत एक महिन्याची मुदत दिली होती. महिन्याभरात सहकारमंत्र्यांनी बैठका घेऊन काही निर्णय घेतले. मुख्यमंत्र्यांनीही २ डिसेंबरला बैठक घेऊन ऊस खरेदी कर माफ केला. खरेदी कर माफ केल्याने प्रतिटन ८३ ते ११० रुपये, मळीचे निर्बंध उठवल्याने त्यातून २४० रुपये, तसेच साखरेच्या मूल्यांकनात वाढ झाली; पण त्याचबरोबर ८५ ऐवजी ९० टक्के उचल देण्याचे आदेश सरकारने दिल्याने त्यातून प्रतिटन ११५ ते १२० रुपये, असे एकूण राज्य सरकारच्या सहकार्याने प्रतिटन ५०० ते ५५० रुपये साखर कारखान्यांना उपलब्ध झाले आहेत. तरीही १२०० आणि १४०० रुपये दराची भाषा कारखानदार सोडण्यास तयार नाहीत. टॅगिंग व प्रक्रिया खर्च वेगवेगळे दाखवून कारखानदार मखलाशी करत आहेत. सरकारने कारखानदारांना आणखी मदत करावी; पण एकरकमी ‘एफआरपी’ द्यावी. संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन आम्ही संयम पाळला आहे. आमचा संयम कोणी कमजोरी समजत असेल तर त्यांना सोडणार नाही. गेल्या महिन्याभरात ऊस गाळपास पाठविलेले शेतकरी प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार आहेत. संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी, यासाठी एकदिवसीय चक्काजाम आंदोलन करणार असून, त्या दिवशी ऊस वाहतूकही बंद केली जाणार आहे. यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते.‘आरआरसी’च्या नोटिसा काढासाखर आयुक्तांनी कायद्याची अंमलबजावणी करत महिन्याभरात उत्पादन झालेल्या साखर जप्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत. ही साखर खुल्या बाजारात विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत व उर्वरित रक्कम कारखान्यांना द्यावी. एक-दोन कारखान्यांवर कारवाई करा, इतर सुतासारखे सरळ होतील, असे शेट्टी यांनी सांगितले.सरकारची नरमाईची भूमिकाकारखानदार कायदा मोडत असताना सरकारने कान धरून त्यांना सांगणे गरजेचे होते. परंतु, मुख्यमंत्री, सहकारमंत्री याबाबत कोणतीच कडक कारवाई करत नाहीत. सरकार नरमाईची भूमिका का घेत आहे? यामागील गौडबंगाल कळले नसल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. प्रवाशांनी सहकार्य करावेचक्काजाम आंदोलनाचा सामान्य माणसांना त्रास होणार आहे; पण सरकारला सरळ भाषा समजत नसल्याने जाग आणण्यासाठी हे आंदोलन करावे लागत आहे. ज्यांचा शेतीशी संबंध नसला तरी सहानुभूती म्हणून त्यादिवशी प्रवास करू नये, असे आवाहन शेट्टी यांनी केले.