शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

By admin | Updated: May 22, 2017 01:10 IST

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असणाऱ्या ‘आत्मक्लेश’ यात्रेला आज, सोमवारपासून पुण्यातून सुरुवात होत आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी रविवारी पुण्याकडे रवाना झाले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा, शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, आदी मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या फुले वाड्यापासून ‘आत्मक्लेश’ यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला आज, सोमवारी सकाळी प्रारंभ होणार आहे. पुणे-खोपोली-पनवेल-वाशी ते मंत्रालय या मार्गावरून ही यात्रा जाणार असून, तब्बल नऊ दिवस राजू शेट्टींसह हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.रविवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यातील शेतकरी पुण्याकडे रवाना झाले. नवव्या दिवशी, ३० मे रोजी मंत्रालयावर धडक देऊन राज्यपालांना निवेदन दिले जाणार आहे. या यात्रेची तयारी गेले महिनाभर राज्यातील गावा-गावांत सुरू आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी ताकदीने घराबाहेर पडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून मोर्चेकऱ्यांसाठी रोज भाकऱ्या पाठविण्याचे नियोजनही केले आहे. कार्यकर्ते रात्रीच रवानास्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडीचे कार्यकर्ते रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वेने पुण्याला रवाना झाले. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. यात्रेत इचलकरंजीतील नाभिकांची सेवा शेतकऱ्यांच्या आत्मक्लेश यात्रेला पाठबळ देण्यासाठी समाजातील सर्वच घटक सरसावले आहेत. इचलकरंजीमध्ये रविवारी नागरिकांनी वर्गणी काढून खासदार राजू शेट्टी यांच्याकडे दिली तर यात्रेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इचलकरंजीतील नाभिक समाजही पुढे आला आहे. काय आहेत मागण्या...शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा.उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या.शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा.शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा.स्वामिनाथन कमिटीचा अहवाल स्वीकारा.