शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

By admin | Updated: May 22, 2017 01:10 IST

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असणाऱ्या ‘आत्मक्लेश’ यात्रेला आज, सोमवारपासून पुण्यातून सुरुवात होत आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी रविवारी पुण्याकडे रवाना झाले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा, शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, आदी मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या फुले वाड्यापासून ‘आत्मक्लेश’ यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला आज, सोमवारी सकाळी प्रारंभ होणार आहे. पुणे-खोपोली-पनवेल-वाशी ते मंत्रालय या मार्गावरून ही यात्रा जाणार असून, तब्बल नऊ दिवस राजू शेट्टींसह हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.रविवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यातील शेतकरी पुण्याकडे रवाना झाले. नवव्या दिवशी, ३० मे रोजी मंत्रालयावर धडक देऊन राज्यपालांना निवेदन दिले जाणार आहे. या यात्रेची तयारी गेले महिनाभर राज्यातील गावा-गावांत सुरू आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी ताकदीने घराबाहेर पडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून मोर्चेकऱ्यांसाठी रोज भाकऱ्या पाठविण्याचे नियोजनही केले आहे. कार्यकर्ते रात्रीच रवानास्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडीचे कार्यकर्ते रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वेने पुण्याला रवाना झाले. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. यात्रेत इचलकरंजीतील नाभिकांची सेवा शेतकऱ्यांच्या आत्मक्लेश यात्रेला पाठबळ देण्यासाठी समाजातील सर्वच घटक सरसावले आहेत. इचलकरंजीमध्ये रविवारी नागरिकांनी वर्गणी काढून खासदार राजू शेट्टी यांच्याकडे दिली तर यात्रेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इचलकरंजीतील नाभिक समाजही पुढे आला आहे. काय आहेत मागण्या...शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा.उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या.शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा.शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा.स्वामिनाथन कमिटीचा अहवाल स्वीकारा.