शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व * पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक * राज्यभरातून मिळाला मोर्चाला पाठिंबा शिरोळ / कुरुंदवाड / ...

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व

* पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक

* राज्यभरातून मिळाला मोर्चाला पाठिंबा

शिरोळ / कुरुंदवाड / नृसिंहवाडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा नृसिंहवाडी येथे येणार असल्याने सकाळपासूनच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती. नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नृसिंहवाडी-कुरुंदवाड पुलावर कडे करून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. राज्यातील विविध भागातून संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होते. ऊस परिषदेप्रमाणेच पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी निघालेल्या पदयात्रेलादेखील तितकाच प्रतिसाद मिळाल्याने हा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

पूरग्रस्तांना २०१९ च्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी, शासनाने जाहीर केलेली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळावेत या मागणीसाठी प्रयाग चिखली येथून गेले पाच दिवस सुरू असलेला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चाला सकाळी अब्दुललाट येथून प्रारंभ झाला. हेरवाड (ता. शिरोळ) येथे दुपारचे जेवण करून नृसिंहवाडीच्या दिशेने मोर्चा आगेकूच झाला. मोर्चामध्ये हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. गावागावात रांगोळी घालून मोर्चाचे जंगी स्वागत करण्यात येत होते. राजू शेट्टी यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करत व फुलांच्या पाकळ्या डोक्यावर उधळून स्वागत करत होते.

दुपारी साडेतीन वाजता मोर्चा कुरुंदवाड शहरात आला. यावेळी ओंकार चौकात सभा झाली. त्यानंर मोर्चा नृसिंहवाडीच्या दिशेने सुरू झाला. कुरुंदवाड ते नृसिंहवाडी या रस्त्यावर दुतर्फा पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुरूंदवाड नदी घाटाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले होते. अग्निशमन दल व रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली होती.

राजू शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देत हलगीच्या निनादात सायंकाळी पाचच्या सुमारास मोर्चा नृसिंवाडीत दाखल झाला. पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार निर्णय न घेतल्याने स्वाभिमानीचे आंदोलन हाताळण्याचा ताण पोलीस प्रशासनावर होता. त्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलिसांना रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करावा लागला.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानीने आक्रोश मोर्चा काढला होता. चार दिवस चाललेल्या या मोर्चात मर्यादित संख्या होती. मात्र, अखेरच्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे अभूतपूर्व मोर्चा झाला.

आक्रोश मोर्चाला रविवारी सकाळी अब्दुललाट येथील ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिरात दर्शनाने सुरुवात झाली. लाट ते हेरवाड असा ७ किलोमीटरचा प्रवास करून हेरवाड येथे दुपारच्या भोजनासाठी दाखल झाला. हेरवाड येथे मोर्चा येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत व महिलांनी औंक्षण करत शेट्टी यांचे स्वागत केले. चार वाजता कुरुंदवाड शहरात मोर्चा आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा दिनकरराव यादव पंचगंगा पुलावरून सायंकाळी पाचच्या सुमारास नृसिंहवाडीत पोहोचला.