शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व * पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक * राज्यभरातून मिळाला मोर्चाला पाठिंबा शिरोळ / कुरुंदवाड / ...

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व

* पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक

* राज्यभरातून मिळाला मोर्चाला पाठिंबा

शिरोळ / कुरुंदवाड / नृसिंहवाडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा नृसिंहवाडी येथे येणार असल्याने सकाळपासूनच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती. नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नृसिंहवाडी-कुरुंदवाड पुलावर कडे करून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. राज्यातील विविध भागातून संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होते. ऊस परिषदेप्रमाणेच पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी निघालेल्या पदयात्रेलादेखील तितकाच प्रतिसाद मिळाल्याने हा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

पूरग्रस्तांना २०१९ च्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी, शासनाने जाहीर केलेली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळावेत या मागणीसाठी प्रयाग चिखली येथून गेले पाच दिवस सुरू असलेला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चाला सकाळी अब्दुललाट येथून प्रारंभ झाला. हेरवाड (ता. शिरोळ) येथे दुपारचे जेवण करून नृसिंहवाडीच्या दिशेने मोर्चा आगेकूच झाला. मोर्चामध्ये हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. गावागावात रांगोळी घालून मोर्चाचे जंगी स्वागत करण्यात येत होते. राजू शेट्टी यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करत व फुलांच्या पाकळ्या डोक्यावर उधळून स्वागत करत होते.

दुपारी साडेतीन वाजता मोर्चा कुरुंदवाड शहरात आला. यावेळी ओंकार चौकात सभा झाली. त्यानंर मोर्चा नृसिंहवाडीच्या दिशेने सुरू झाला. कुरुंदवाड ते नृसिंहवाडी या रस्त्यावर दुतर्फा पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुरूंदवाड नदी घाटाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले होते. अग्निशमन दल व रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली होती.

राजू शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देत हलगीच्या निनादात सायंकाळी पाचच्या सुमारास मोर्चा नृसिंवाडीत दाखल झाला. पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार निर्णय न घेतल्याने स्वाभिमानीचे आंदोलन हाताळण्याचा ताण पोलीस प्रशासनावर होता. त्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलिसांना रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करावा लागला.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानीने आक्रोश मोर्चा काढला होता. चार दिवस चाललेल्या या मोर्चात मर्यादित संख्या होती. मात्र, अखेरच्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे अभूतपूर्व मोर्चा झाला.

आक्रोश मोर्चाला रविवारी सकाळी अब्दुललाट येथील ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिरात दर्शनाने सुरुवात झाली. लाट ते हेरवाड असा ७ किलोमीटरचा प्रवास करून हेरवाड येथे दुपारच्या भोजनासाठी दाखल झाला. हेरवाड येथे मोर्चा येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत व महिलांनी औंक्षण करत शेट्टी यांचे स्वागत केले. चार वाजता कुरुंदवाड शहरात मोर्चा आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा दिनकरराव यादव पंचगंगा पुलावरून सायंकाळी पाचच्या सुमारास नृसिंहवाडीत पोहोचला.