शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

‘स्वाभिमानी’ची मागणी : प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे निवेदन

By admin | Updated: October 19, 2016 00:36 IST

मंत्री समितीने डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री समितीचा निर्णय हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांना बंधनकारक असतो.

कोल्हापूर : मंत्री समितीचा निर्णय धुडकावत तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने हंंगाम सुरू केला आहे. बेकायदेशीर सुरू असलेला हंगाम सुरू केल्याबद्दल प्रतिटन पाचशे रुपये दंडाची रक्कम संचालकांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. मंत्री समितीने डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री समितीचा निर्णय हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांना बंधनकारक असतो. डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असला तरी याबाबत मंत्री समितीला अधिकृत भूमिका जाहीर करावी लागणार आहे. यासाठी आज, बुधवारी मंत्री समितीची बैठक आहे, यामध्ये जो निर्णय होईल, तो सर्वांनाच बंधनकारक राहील; पण निर्णय होण्याआधीच हुकूमशाही पद्धतीने वारणा साखर कारखान्याने हंगाम सुरू केला आहे. तो बेकायदेशीर असून मंत्री समितीचा अपमान करणारा आहे. मंत्री समितीच्या परवानगीशिवाय कारखाना चालविल्यास गाळप होणाऱ्या प्रतिटनास पाचशे रुपये दंड आकारला जातो. हा दंड ऊस पुरवठा करणारे शेतकरी, कारखान्याचे संचालक मंडळ यांच्याकडून वसूल करून घ्यावा; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’च्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना दिला. यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, हरिश पाटील, किरण पाटील, आनंदराव शेळके, धनंजय सवदत्ती, राजाराम किरुळेकर, वैभव कांबळे, रमेश भोजकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)