शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पेपरफुटीतील पाचजण निलंबित

By admin | Updated: December 26, 2015 00:12 IST

दिलीप पाटील यांची माहिती : उर्वरित दोषींचा अहवाल येताच त्यांच्यावरही कारवाई

सांगली : जिल्हा परिषद आरोग्यसेविका आणि औषध निर्माता पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे. दोन्ही परीक्षांचा पेपर फोडणारी कर्मचाऱ्यांची टोळी जिल्हा परिषदेतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील अशा पाच कर्मचाऱ्यांना अटक झाली असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोघांना तर सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली. यामध्ये आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यांचा पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरही तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.पेपर फोडणाऱ्या टोळीमधील रामदास आनंदा फुलारे (वय ४२, रा. हुबालवाडी, ता. वाळवा), शशांक श्रीकांत जाधव (२५, वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सतीश शिवाजी मोरे (३६, कवलापूर, ता. मिरज), अशोक शामराव माने (३५, कामेरी, ता. वाळवा), शिवाजी पांडुरंग गायकवाड (३३, म्हाळुंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. हे संशयित पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्तीस आहेत. यातील फुलारे सध्या तरी मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. अन्य चार संशयितांना गुरुवारी सकाळीच अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे अटक केलेल्या पाचजणांना जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी सिध्द झाल्यास त्यांना सेवेतूनही बडतर्फ करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणात दहा ते बाराजणांच्या नावाची चर्चा आहे. या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर तत्काळ निलंबित करून त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेची भरतीच वादातआरोग्यसेविका, औषध निर्माता परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची छपाई जिल्हा परिषदेच्या छापखान्यात झाली होती. त्यामुळे दोन्ही प्रश्नपत्रिका फुलारे याने बाहेर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित प्रश्नपत्रिकाही तेथेच छापल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेकडील सर्व नोकरभरतीच वादात सापडली आहे. कंत्राटी ग्रामसेवक परीक्षेचाही पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.