शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या पगारासाठी जीवरक्षकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:56 IST

आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.

ठळक मुद्देअग्निशमन दलातील ठोक मानधन कर्मचाऱ्याची स्थिती जीव धोक्यात : कायम करण्याची मागणी

विनोद सावंतकोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.महापालिकेमध्ये सर्वांत प्रभावीपणे काम करणारा विभाग म्हणून अग्निशमन दलाची ओळख आहे. मात्र, या विभागात कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेलेली नाही. यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. केवळ ३० कर्मचारी कायम असून, ठोक मानधन, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलाचा डोलारा आहे.पगार कमी, जोखमीचे काम११८ पैकी ५८ कर्मचारी ठोक मानधनावरील आहेत. भविष्यात कायम होईल, या आशेने ते जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी महापूर आल्यानंतर १७ जणांचा जीव वाचविला. चांगले काम केल्याबद्दल ठोक मानधनावरील कर्मचाºयांना वेतनवाढ करण्याचा निर्णय झाला. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. पगार कमी आणि जोखमीचे काम अशी त्यांची स्थिती आहे. पद                          मंजूर पदे      रिक्त पदे

  • स्थानक अधिकारी        ३               २
  • वाहनचालक                 ३२            २५
  • टेक्निकल इन्स्ट्रक्टर   १               १
  • तांडेल                          २१             ५
  • फायरमन                  १०८            ७९
  • अटेंडंट                         १४            ११

ठोक मानधनावरील कर्मचारी

  • फायरमन - ४०
  • वर्कशॉपकडील ठोक मानधन - ६
  • केएमटीकडील ठोक मानधनावरील वाहनचालक - १२

 

रिक्त जागांवर कायम करण्यासाठी साकडेअग्निशमन दलाकडे १२२ रिक्त जागा असून या जागेवर ठोक मानधनावरील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी मागणी जोर धरत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे कायम करण्यासाठी साकडे घातले.

किमान वेतनही नाहीअग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. केवळ १० हजार रुपये पगार असून कपात होऊन आठ हजार रुपयेच त्यांच्या हातात मिळतात. यामध्ये घरखर्च चालविणार कसा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. कमी कर्मचारी असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना डबल ड्यूटीही करावी लागते. कायम करण्याची मागणी केल्यास आस्थापनावर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलkolhapurकोल्हापूर