शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तुटपुंज्या पगारासाठी जीवरक्षकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:56 IST

आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.

ठळक मुद्देअग्निशमन दलातील ठोक मानधन कर्मचाऱ्याची स्थिती जीव धोक्यात : कायम करण्याची मागणी

विनोद सावंतकोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.महापालिकेमध्ये सर्वांत प्रभावीपणे काम करणारा विभाग म्हणून अग्निशमन दलाची ओळख आहे. मात्र, या विभागात कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेलेली नाही. यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. केवळ ३० कर्मचारी कायम असून, ठोक मानधन, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलाचा डोलारा आहे.पगार कमी, जोखमीचे काम११८ पैकी ५८ कर्मचारी ठोक मानधनावरील आहेत. भविष्यात कायम होईल, या आशेने ते जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी महापूर आल्यानंतर १७ जणांचा जीव वाचविला. चांगले काम केल्याबद्दल ठोक मानधनावरील कर्मचाºयांना वेतनवाढ करण्याचा निर्णय झाला. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. पगार कमी आणि जोखमीचे काम अशी त्यांची स्थिती आहे. पद                          मंजूर पदे      रिक्त पदे

  • स्थानक अधिकारी        ३               २
  • वाहनचालक                 ३२            २५
  • टेक्निकल इन्स्ट्रक्टर   १               १
  • तांडेल                          २१             ५
  • फायरमन                  १०८            ७९
  • अटेंडंट                         १४            ११

ठोक मानधनावरील कर्मचारी

  • फायरमन - ४०
  • वर्कशॉपकडील ठोक मानधन - ६
  • केएमटीकडील ठोक मानधनावरील वाहनचालक - १२

 

रिक्त जागांवर कायम करण्यासाठी साकडेअग्निशमन दलाकडे १२२ रिक्त जागा असून या जागेवर ठोक मानधनावरील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी मागणी जोर धरत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे कायम करण्यासाठी साकडे घातले.

किमान वेतनही नाहीअग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. केवळ १० हजार रुपये पगार असून कपात होऊन आठ हजार रुपयेच त्यांच्या हातात मिळतात. यामध्ये घरखर्च चालविणार कसा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. कमी कर्मचारी असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना डबल ड्यूटीही करावी लागते. कायम करण्याची मागणी केल्यास आस्थापनावर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलkolhapurकोल्हापूर