शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

‘हर हर महादेव’च्या गजरात टिकाव..

By admin | Updated: April 8, 2017 21:43 IST

माण तालुका : पहिल्या दिवशी १५ हजारांवर ग्रामस्थांचे वॉटर कप स्पर्धेअंतर्गत श्रमदान

दहिवडी : माण तालुक्यात शनिवारी वॉटर कप स्पर्धा-२ सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ हजारांचा आकडा पार करीत लोकांनी उत्साहात श्रमदान केले. राजवडी ग्रामस्थांनी पहिला टिकाव ‘हर हर महादेव’च्या गजरात मध्यरात्री १२ वाजता मारला आणि कामाला सुरुवात केली, हे विशेष. माण तालुक्यातील एकूण ३२ गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. शनिवारी पहिलाच दिवस होता. पुरुष, महिला सकाळ-सकाळी लवकर घरचे काम आटोपून कामाच्या ठिकाणी पोहोचले. तर शिंगणापूरच्या महादेवाला वंदन करून मध्यरात्रीच्या १२ वाजता राजवडीमधील युवकांनी श्रमदानाला सुरुवात केली. मार्डी येथे फलटणवरून लोकांनी येऊन श्रमदान केले. तर पिंगळीमध्ये अभिषेक करून श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी ‘तुफान आलया’ या गाण्याच्या आवाजात श्रमदान केले गेले. माण तालुक्यात यात्रांचा हंगाम असूनही या ३२ गावांत पहिल्याच दिवशी १५ हजारांच्यावर लोकांनी श्रमदान केले. अनेक ठिकाणी लुज बोल्डर, सीसीटी बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येकी ८ या प्रमाणे प्रांताधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी ३२ गावे दत्तक घेतली आहेत. शनिवारी लोकांचा उत्साह वाढावा, यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी गोंदवले खुर्द, तहसीलदार सुरेखा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पोळ, सभापती रमेश पाटोळे यांनी पर्यंती येथे श्रमदान केले. दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी थदाळे येथे, गटविकास अधिकारी आर. जी. सांगळे यांनी कुळकजाई, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर यांनी कोळेवाडी येथे श्रमदान केले.पाणी समन्वयक अजित पवार मनकर्णवाडी, डॉ. प्रदीप पोळ शिरवली, डॉ. माधवराव पोळ, अलका पोळ, पांडुरंग पोळ यांनी मार्डी तर अनुराधा देशमुख, रवींद्र खोमणे यांनी लोधवडेत श्रमदान केले. शांतिगिरी महाराज, दादा जगदाळे यांनी परकंदीत तर माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी कुलाळ, तालुका शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ, अरुण गोरे, डॉ. संदीप पोळ यांनी बिदालमध्ये जाऊन श्रमदान केले. त्यामुळे लोकांचा उत्साह वाढला होता. शांतिगिरी महाराज जनसेवा प्रतिष्ठान, डॉ. संदीप पोळ, बबनशेठ वीरकर यांनी काही ठिकाणी मोफत साहित्याचे वाटप केले. अनेक गावांमध्ये मुंबईकर पुणेकर मंडळी श्रमदानासाठी दाखल झाली आहेत. शनिवारी कुळकजाई ५८०, परकंदी ३१०, शिरवली २०० , श्रीपालवण २०५, कोळेवाडी १००, स्वरुपखानवाडी ३२५, पिंगळी ३५०, गोंदवले ८०, लोधवडे १२००, जाशी ६४०, वाकी २७५, पर्यंती ६०५, कारखेल ५५०, किरकसाल ६७५, मनकर्णवाडी १२५, अनभुलेवाडी ३१०, शेवरी २५, इंजबाव ३१०, खुंटबाव २८५, मार्डी ५७५, बिदाल २०००, पांगरी २०५, राजवडी १५० लोकांनी श्रमदान केले. त्याचबरोबर मोगराळे, दानवलेवाडी, थदाळे सोकासन, पिंगळी, शिंदी गावानेही श्रमदान केले. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. (प्रतिनिधी) बिदालचे अनोखे नियोजन...अनेक गावाने कामाचे नियोजन केले होते. विशेषत: बिदालने मुख्य ठिकाणी भोंगे बसवले होते. शनिवरी पहिला भोंगा पहाटे ५.३० चा झाला. त्यानंतर लोक उठून घरगुती कामे करू लागले. दुसरा भोंगा ६:३० वाजता झाला. त्यामुळे सर्वांचीच कामाच्या ठिकाणी निघण्याची तयारी झाली. तिसऱ्या ६ : ४५ च्या भोंग्याला लोक जमले. चौथा ७ चा भोंगा झाला आणि लोक कामाला लागले. दरम्यान, सकाळी ६ ते ९ या कालावधीमध्ये काही गावांतील दुकाने बंद ठेवली होती. काही गावांत पाणीपुरवठा हा सकाळऐवजी सायंकाळी करण्यात आला होता. आज सहभाग आणखी वाढणार...गेली १ महिना प्रशासकीय अधिकारी, समन्वय समिती यांनी भाग घेतलेल्या गावात ग्रामसभा घेऊन जनजागृती केली होती. तर दुसरीकडे आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून डॉ. माधवराव पोळ, डॉ. अलका पोळ यांनी नवचेतना शिबिरे घेऊन लोकांचा उत्साह वाढवला होता. तर ३२ गावांतील लोकांनी सर्व राजकीय मतभेद विसरून श्रमदान केल्याने पहिल्याच दिवशी १५ हजार लोकांनी श्रमदान केले. रविवार सुटीचा दिवस असल्याने आणखी लोकसहभाग वाढण्याची शक्यता आहे.