शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

स्थलांतरितांच्या मुला-मुलींचे ‘युनिसेफ’तर्फे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:42 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यासह कर्नाटकातून हंगामी काम करण्यासाठी जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या ऊसतोड व वीटभट्टीवरील ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यासह कर्नाटकातून हंगामी काम करण्यासाठी जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या ऊसतोड व वीटभट्टीवरील कामगारांच्या शून्य ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण ‘युनिसेफ’च्या माध्यमातून होत आहे. ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात ही मोहीम राबवून जिल्ह्यातील साखर कारखाने व वीटभट्ट्यांवर जाऊन माहिती घेतली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत जवळपास २३ कारखाने व ६०० वीटभट्ट्यांवर भेट दिली जाणार आहे.विशेषत: मराठवाड्यातील कुटुंबे ऊसतोड करण्यासाठी व इतर जिल्ह्यांतील कुटुंबे ही वीटभट्टीवर कामाला येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासोबत त्यांची अल्पवयीन मुले-मुलीही स्थलांतरित होत असतात. या शून्य ते १८ वयोगटातील बालकांची निश्चित आकडेवारी कोणत्याही यंत्रणेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ‘युनिसेफ’च्या पुढाकारातून याचे सर्वेक्षण होणार आहे. स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्य, संरक्षण, पोषण आहार, यांसह अनेक मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष होत असते. शिवाय बालविवाह, बाल कामगार, लैंगिक अत्याचार अशा समस्याही येत असतात. एका बाजूला प्रत्येक मुलाला त्याचे हक्क मिळावेत यासाठी शासनाचे विविध विभाग कार्यरत असताना दुसरीकडे अशी हजारो मुले या हक्कांपासून वंचित राहत आहेत. त्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘युनिसेफ’च्या महाराष्टÑ विभागाने लक्ष घातले आहे. डिसेंबर महिन्यात ‘युनिसेफ’चे सल्लागार विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला आणि बालविकास, शिक्षण विभाग, कामगार विभाग, सायबर महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यातील ऊसतोड व वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी समन्वयक म्हणून महिला व बालकांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते अतुल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या समन्वयाने ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान सर्वेक्षण होणार आहे. या माध्यमातून संख्या निश्चित करून त्यानंतर बालकांची काळजी, संरक्षण, शिक्षण आणि विकासात्मक मुद्द्यांवर योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.हे विभागकरणार सर्वेक्षणजिल्ह्यातील महिला आणि बालविकास, शिक्षण विभाग, कामगार विभाग, सायबर महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाचा एन.एस.एस. विभाग, अवनि संस्था, उमेद फौंडेशन, प्रथम संस्था यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील साखर कारखाने, वीटभट्ट्यांवर जाऊन मुलांचे सर्वेक्षण करणार आहेत.