शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांना घेरण्याची खेळी

By admin | Updated: January 28, 2017 23:25 IST

सांगलीत खिचडी : भाजपाची भिस्त आयात ‘स्वयंभू’ नेत्यांवरच

श्रीनिवास नागे-- सांगली --पडझडीमुळे रडकुंडीला आलेली राष्ट्रवादी, मुसंडी मारण्याच्या तयारीतील भाजपा आणि त्याचा फायदा उठवत जिल्हा परिषदेची सत्ता खेचण्यासाठी आसुसलेली काँग्रेस यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वत्र रंगतदार लढती होतील. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना घेरण्यासाठी झाडून सगळे विरोधक एकवटले आहेत, मात्र कोठे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली छुपी हातमिळवणी, तर कोठे गड सांभाळण्यासाठी बनवलेल्या स्थानिक आघाड्या यामुळे साऱ्या राजकारणाची खिचडी झाली आहे.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सुत्रे जयंतरावांच्या हाती एकवटले असली तरी आर. आर. यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांना यश आलेले नाही. योग्य समन्वयाअभावी जत, खानापूर आणि पलूस, कडेगाव या तालुक्यांतील नेत्यांनी भाजपला जवळ केले. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील पंधरा वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी जयंतरावांना आटापिटा करावा लागत आहे. महिन्यापूर्वी काँग्रेसची खुमखुमी जिरवण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांनी या आठवड्यात काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी दोन पावले मागे जात नमते घेतले! कारण काँग्रेससह सगळ्यांनीच त्यांना घेरण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वत:चा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ वाळवा व मिरज तालुक्यांत विभागला आहे. या दोन्ही तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा आहेत. नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांना घेरण्याची चाल यशस्वी झाल्यानंतर जि.प., पंचायत समिती निवडणुकीतही विरोधकांनी तीच खेळी खेळण्याचे पक्के केले आहे. त्यासाठी वाळवा आणि मिरज पूर्वभागात काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, शिवसेनेसह वाळव्याच्या नायकवडी गटाची हुतात्मा आघाडी एकत्र आली.काही दिवसांपूर्वी सांगलीच्या ‘बीजेपी’ला ‘जेजेपी’ (जयंत जनता पार्टी) असे हिणवले जात होते. मात्र आता ‘जेजेपी’तील मंडळीच जयंत पाटील यांच्याविरोधात उघड बोलू लागली आहेत. त्यातील काहींनी तसा शड्डूच ठोकल्याने शिराळा, पलूस, कडेगाव, जत, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांतील जागा मिळवून भाजप जिल्हा परिषदेत खाते उघडण्याच्या तयारीत आहे. अशी झाली आहे खिचडी!स्वबळावर लढण्याची भाषा करणारी काँग्रेस वाळवा आणि मिरज पूर्वभागात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा, शिवसेनेला सोबत घेणार आहे, तर शेजारच्या शिराळ्यात चक्क राष्ट्रवादीशी केलेली गट्टी कायम ठेवणार आहे. खानापूर-आटपाडीतही आघाडीची बोलणी सुरू आहेत. जतमध्ये काँग्रेसचा एक गट भाजपा आणि जनसुराज्य शक्तीसोबत निघाला आहे.पलूस-कडेगावमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा गळ्यात गळे घालण्याची शक्यता दिसत आहे. मिरज पश्चिममध्ये भाजपाच्या अजितराव घोरपडे गटाशी त्यांची सोयरीक झाली आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसच्या पतंगराव गटाशी त्यांनी संधान सांधले आहे.वाळवा, शिराळा, पलूस, कडेगावमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तासगाव-कवठेमहांकाळमध्ये त्यांच्याशी पंगा घेतला आहे.