शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांना घेरण्याची खेळी

By admin | Updated: January 28, 2017 23:25 IST

सांगलीत खिचडी : भाजपाची भिस्त आयात ‘स्वयंभू’ नेत्यांवरच

श्रीनिवास नागे-- सांगली --पडझडीमुळे रडकुंडीला आलेली राष्ट्रवादी, मुसंडी मारण्याच्या तयारीतील भाजपा आणि त्याचा फायदा उठवत जिल्हा परिषदेची सत्ता खेचण्यासाठी आसुसलेली काँग्रेस यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वत्र रंगतदार लढती होतील. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना घेरण्यासाठी झाडून सगळे विरोधक एकवटले आहेत, मात्र कोठे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली छुपी हातमिळवणी, तर कोठे गड सांभाळण्यासाठी बनवलेल्या स्थानिक आघाड्या यामुळे साऱ्या राजकारणाची खिचडी झाली आहे.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सुत्रे जयंतरावांच्या हाती एकवटले असली तरी आर. आर. यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांना यश आलेले नाही. योग्य समन्वयाअभावी जत, खानापूर आणि पलूस, कडेगाव या तालुक्यांतील नेत्यांनी भाजपला जवळ केले. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील पंधरा वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी जयंतरावांना आटापिटा करावा लागत आहे. महिन्यापूर्वी काँग्रेसची खुमखुमी जिरवण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांनी या आठवड्यात काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी दोन पावले मागे जात नमते घेतले! कारण काँग्रेससह सगळ्यांनीच त्यांना घेरण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वत:चा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ वाळवा व मिरज तालुक्यांत विभागला आहे. या दोन्ही तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा आहेत. नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांना घेरण्याची चाल यशस्वी झाल्यानंतर जि.प., पंचायत समिती निवडणुकीतही विरोधकांनी तीच खेळी खेळण्याचे पक्के केले आहे. त्यासाठी वाळवा आणि मिरज पूर्वभागात काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, शिवसेनेसह वाळव्याच्या नायकवडी गटाची हुतात्मा आघाडी एकत्र आली.काही दिवसांपूर्वी सांगलीच्या ‘बीजेपी’ला ‘जेजेपी’ (जयंत जनता पार्टी) असे हिणवले जात होते. मात्र आता ‘जेजेपी’तील मंडळीच जयंत पाटील यांच्याविरोधात उघड बोलू लागली आहेत. त्यातील काहींनी तसा शड्डूच ठोकल्याने शिराळा, पलूस, कडेगाव, जत, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांतील जागा मिळवून भाजप जिल्हा परिषदेत खाते उघडण्याच्या तयारीत आहे. अशी झाली आहे खिचडी!स्वबळावर लढण्याची भाषा करणारी काँग्रेस वाळवा आणि मिरज पूर्वभागात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा, शिवसेनेला सोबत घेणार आहे, तर शेजारच्या शिराळ्यात चक्क राष्ट्रवादीशी केलेली गट्टी कायम ठेवणार आहे. खानापूर-आटपाडीतही आघाडीची बोलणी सुरू आहेत. जतमध्ये काँग्रेसचा एक गट भाजपा आणि जनसुराज्य शक्तीसोबत निघाला आहे.पलूस-कडेगावमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा गळ्यात गळे घालण्याची शक्यता दिसत आहे. मिरज पश्चिममध्ये भाजपाच्या अजितराव घोरपडे गटाशी त्यांची सोयरीक झाली आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसच्या पतंगराव गटाशी त्यांनी संधान सांधले आहे.वाळवा, शिराळा, पलूस, कडेगावमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तासगाव-कवठेमहांकाळमध्ये त्यांच्याशी पंगा घेतला आहे.