शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

जयंतरावांना घेरण्याची खेळी

By admin | Updated: January 28, 2017 23:25 IST

सांगलीत खिचडी : भाजपाची भिस्त आयात ‘स्वयंभू’ नेत्यांवरच

श्रीनिवास नागे-- सांगली --पडझडीमुळे रडकुंडीला आलेली राष्ट्रवादी, मुसंडी मारण्याच्या तयारीतील भाजपा आणि त्याचा फायदा उठवत जिल्हा परिषदेची सत्ता खेचण्यासाठी आसुसलेली काँग्रेस यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वत्र रंगतदार लढती होतील. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना घेरण्यासाठी झाडून सगळे विरोधक एकवटले आहेत, मात्र कोठे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली छुपी हातमिळवणी, तर कोठे गड सांभाळण्यासाठी बनवलेल्या स्थानिक आघाड्या यामुळे साऱ्या राजकारणाची खिचडी झाली आहे.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सुत्रे जयंतरावांच्या हाती एकवटले असली तरी आर. आर. यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांना यश आलेले नाही. योग्य समन्वयाअभावी जत, खानापूर आणि पलूस, कडेगाव या तालुक्यांतील नेत्यांनी भाजपला जवळ केले. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील पंधरा वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी जयंतरावांना आटापिटा करावा लागत आहे. महिन्यापूर्वी काँग्रेसची खुमखुमी जिरवण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांनी या आठवड्यात काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी दोन पावले मागे जात नमते घेतले! कारण काँग्रेससह सगळ्यांनीच त्यांना घेरण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वत:चा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ वाळवा व मिरज तालुक्यांत विभागला आहे. या दोन्ही तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा आहेत. नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांना घेरण्याची चाल यशस्वी झाल्यानंतर जि.प., पंचायत समिती निवडणुकीतही विरोधकांनी तीच खेळी खेळण्याचे पक्के केले आहे. त्यासाठी वाळवा आणि मिरज पूर्वभागात काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, शिवसेनेसह वाळव्याच्या नायकवडी गटाची हुतात्मा आघाडी एकत्र आली.काही दिवसांपूर्वी सांगलीच्या ‘बीजेपी’ला ‘जेजेपी’ (जयंत जनता पार्टी) असे हिणवले जात होते. मात्र आता ‘जेजेपी’तील मंडळीच जयंत पाटील यांच्याविरोधात उघड बोलू लागली आहेत. त्यातील काहींनी तसा शड्डूच ठोकल्याने शिराळा, पलूस, कडेगाव, जत, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांतील जागा मिळवून भाजप जिल्हा परिषदेत खाते उघडण्याच्या तयारीत आहे. अशी झाली आहे खिचडी!स्वबळावर लढण्याची भाषा करणारी काँग्रेस वाळवा आणि मिरज पूर्वभागात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा, शिवसेनेला सोबत घेणार आहे, तर शेजारच्या शिराळ्यात चक्क राष्ट्रवादीशी केलेली गट्टी कायम ठेवणार आहे. खानापूर-आटपाडीतही आघाडीची बोलणी सुरू आहेत. जतमध्ये काँग्रेसचा एक गट भाजपा आणि जनसुराज्य शक्तीसोबत निघाला आहे.पलूस-कडेगावमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा गळ्यात गळे घालण्याची शक्यता दिसत आहे. मिरज पश्चिममध्ये भाजपाच्या अजितराव घोरपडे गटाशी त्यांची सोयरीक झाली आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसच्या पतंगराव गटाशी त्यांनी संधान सांधले आहे.वाळवा, शिराळा, पलूस, कडेगावमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तासगाव-कवठेमहांकाळमध्ये त्यांच्याशी पंगा घेतला आहे.