शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

कारागीर विद्यापीठ शासनमान्यतेसाठी प्रयत्न - सुरेश हाळवणकर : सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:31 IST

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’ मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले.

ठळक मुद्देकारागिरांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’ मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपºयांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाविक, नागरिकांच्या गर्दीत समारोप झाला.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे हा कारागीर महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री विश्वकर्मा कारागीर नगरीतील या कार्यक्रमास राममंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांत, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, बेळगांवच्या मितान फौंडेशनचे गोपीकृष्णन, कोल्हापूर विभागाचे माहिती संचालक सतीश लळीत, प्रमुख उपस्थित होते.

आमदार हाळवणकर म्हणाले, सिद्धगिरी महासंस्थानचे काम भव्य-दिव्य आहे. हजारो वर्षांची कारागीर, कलांच्या जपण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून पडले आहे. देशभरातील विश्वकर्मांना एकत्रित करून राबविलेला हा उपक्रम श्रमशक्तीचा महाकुंभ ठरला. सिद्धगिरी कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी सिद्धगिरीवरील ‘लखपती शेती’चे तंत्रज्ञान देशभरात जाण्याची गरज आहे. त्यासह येथील गुरुकुल शिक्षणपद्धती ही देश बळकट करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अशा गुरुकुल पद्धतीवरील शाळा शासनाने सुरू कराव्यात.

या कार्यक्रमात महाकुंभातील सहभागी कारागीरांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कारागीरांना ‘कोल्हापुरी फेटा’ बांधून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, बसंतकुमार सिंग, योगीप्रभू, रामबाबू, सुरेश पाटील, नाना पठारे, हिंदुराव शेळके, प्रताप कोंडेकर, आर. डी. शिंदे, डॉ. संदीप पाटील, आदी उपस्थित होते.महाकुंभाला आठ लाख लोकांची भेटया महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यांतील १२० कारागीर सहभागी झाले. त्यांच्या माध्यमातून पाचशे कला, कारागिरीचे दर्शन घडले. दोनशेहून अधिक गायी, बैलजोड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महाकुंभाला पाच दिवसांत सुमारे आठ लाख लोकांनी भेट दिली. शंभर साधू-संत सिद्धगिरी मठावर आले. दरवर्षी कारागीर महाकुंभ भरविण्याचा विचार सिद्धगिरी महासंस्थान करत असल्याचे अमित हुक्केरीकर यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांना ‘पॉलीहाऊस’द्वारे मदतीचा हातसेंद्रिय भाजीपाला उत्पादनातून रोजगार निर्मितीसाठी श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे मदतीचा हात दिला जात आहे. शेतकऱ्यांना चौदा पॉलीहाऊस बांधून दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकºयांची स्वत: जमीन आणि पाणी, विजेची उपलब्धता असणे आवश्यक आहे.

या पॉलीहाऊसमध्ये उत्पादित होणारा सेंद्रिय भाजीपाल्याला बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या शेतकºयांना पॉलीहाऊस बांधून दिले आहे. त्यांनी पॉलीहाऊस बांधणीतील निम्मा खर्च परत करावयाचा आहे. शेतकऱ्यांकडून परत येणाऱ्या पैशांतून अन्य शेतकऱ्यांना पॉलीहाऊस बांधून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.च्त्यातील पहिल्या पॉलीहाऊसची किल्ली कणेरी (ता. करवीर) येथील मनीषा पाटील यांना आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सिद्धगिरी हॉस्पिटल येथे लवकरच कार्डियॉक सेंटर सुरू केले जाणार आहे.